शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जिल्ह्यातील १ हजार ६७0 शाळांना कुलूप

By admin | Updated: February 6, 2016 01:43 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या १ ते ६ फेब्रुवारीदरम्यान नवी मुंबई येथे होत असलेल्या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक शिक्षक रजेवर गेल्याने

पुणे : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या १ ते ६ फेब्रुवारीदरम्यान नवी मुंबई येथे होत असलेल्या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक शिक्षक रजेवर गेल्याने सोमवारपासून १ हजार ६७0 शाळांना कुलूप लागले होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या रजाप्रकरणी ताशेरे ओढल्यानंतर यातील काही शिक्षक शुक्रवारी शाळेत दाखल झाल्याने यातील काही शाळा सुरू झाल्याचा दावा शिक्षणाधिकारी मुश्ताख शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. अधिवेशनासाठी प्रवासाच्या दिवसासह कमाल ६ दिवसांची (१ ते ६ फेब्रुवारी २०१६ पर्यंतची) विशेष नैमित्तिक रजा शासनाने २९ जानेवारीच्या परिपत्रकाद्वारे मंजूर केली होती. याचा फायदा घेत शिक्षकांनी रजा टाकल्या. जिल्ह्यात ३ हजार ७२९ जिल्हा परिषदेच्या शाळा असून, त्यांच्यासाठी १२ हजार ६0 शिक्षक मंजूर आहेत. यातील ११ हजार ५00 शिक्षक सध्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. यातील ६ हजार ८६७ शिक्षक या परिपत्रकाचा आधार घेत रजेवर गेले. त्यामुळे १ हजार ६७0 शाळा बंद ठेवाव्या लागल्या. या शिक्षकांनी गटशिक्षक अधिकाऱ्यांना रजेचा अर्ज दिला असून, त्यांच्याकडूनच रजा मंजूर करून घेतल्या. मुळात गटशिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यात किती शाळा आहेत, यात एकशिक्षकी किती, दोनशिक्षकी किती, या शाळांवरील किती शिक्षकांनी रजा घेतली आहे याचा आढावा घेणे गरजेचे होते. मात्र सरसकट रजा मंजूर केल्याने शाळा बंद ठेवाव्या लागल्या.शिक्षक मात्र, प्रत्यक्षात ६ दिवस अधिवेशनाला न जाता अनेक शिक्षक घरीच राहून सुट्टी ‘एन्जॉय’ करीत असल्याची चर्चा शाळेत उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांमध्ये आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये सध्या अघोषित सुट्टी आहे. (प्रतिनिधी)जवळपास अर्धे शिक्षक उपस्थित नसल्याने अनेक शाळा उर्वरित शिक्षक चालवीत आहेत. प्रत्यक्षात अधिवेशन २ दिवस आहे; पण त्यापूर्वीच ४ दिवस सुट्टी दिली गेली आहे.अधिवेशनासाठी उपस्थित शिक्षकांना उपस्थितीचे प्रमाणपत्र दिले जाते; पण सहकाऱ्यांची प्रमाणपत्रे प्रत्यक्ष उपस्थित राहणारे आणतात किंवा ती त्यांना पोहोचविली जातात, असे सांगितले जाते.यातील काही शिक्षक अधिवेशनाला गेले नाहीत, पण शाळेतील अनेक जण सुटीवर जाणार असतील, तर जबाबदारी आपल्यावर येईल, या धास्तीने त्यांनीही अधिवेशनाची सुट्टी घेतली. अधिवेशन सुट्टीच्या कालावधीत घेता येऊ शकते; पण त्या वेळच्या हक्काच्या सुट्टीवर गदा शिक्षकांना नको असते. म्हणून शालेय कामकाजाच्या दिवसात अशी अधिवेशने आयोजित केली जातात.