शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

नीरा डावा कालव्याचे पाणी पेटले

By admin | Updated: May 29, 2017 02:19 IST

इंदापूर तालुक्यात नीरा डावा कालव्याचे पाणी पेटले आहे. कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. ५४ फाटा, लासुर्णेपाठोपाठ

लोकमत न्यूज नेटवर्कभवानीनगर : इंदापूर तालुक्यात नीरा डावा कालव्याचे पाणी पेटले आहे. कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. ५४ फाटा, लासुर्णेपाठोपाठ रविवारी (दि. २८) ३६ फाट्यावरील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.नीरा डावा कालव्यावरील वितरिका क्रमांक ३६वर अवलंबून असणाऱ्या सणसर, हिंगणेवाडी, सपकळवाडी, कुरवली आदी भागातील शेतकऱ्यांनी रविवारी सणसर पाटबंधारे वसाहत येथे रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या या आंदोलनामुळे बारामती- इंदापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा’ आदी घोषणांनी या वेळी सणसर परिसर दुुमदुमला. चेहरे पाहून पाणी दिले जाते, तीन महिन्यांपासून सोडण्यात आलेले पाणी नेमके कुठे गेले, बारमाही पाणीपट्टी भरणारा शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहतो. मात्र, सायफनद्वारे ठराविक जणांना मुबलक पाणी मिळते. त्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी मदत करतात, अशा तक्रारी या वेळी शेतकऱ्यांनी मांडल्या. दिलीप पांढरे, दीपक कदम, नंदकुमार सपकळ आदींनी या वेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या वेळी आंदोलनात आबासाहेब निंबाळकर, शिवाजी सपकळ, किरण गायकवाड, संजय सपकळ, रवींद्र कदम, दत्तात्रय सपकळ आदी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर येथील आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, पाणी सोडण्याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. दोन तासांहून अधिक वेळ शेतकरी या ठिकाणी बसून होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत...या वेळी छत्रपती कारखान्याचे संचालक प्रदीप निंबाळकर यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना जाब विचारला. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या आवर्तनाची केवळ सणसर परिसरात अंमलबजावणी होत नाही. या ठीकाणी उन्हाळ्यातील पहिले आवर्तन अद्याप सुरु आहे. तेदेखील पाणी मिळाले नाही. याच कालव्यावर इतरत्र मात्र, दुसरे उन्हाळी आवर्तन सुरु आहे. हा येथील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. कार्यकारी अभियंता कार्यालयदेखील शेतकऱ्यांना अधिकारी सहज उपलब्ध होतील, अशा ठिकाणी असावे. त्यांचे पुणे येथील कार्यालय शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी आहे.धरण १०० टक्के भरूनदेखील शेतकऱ्यांवर ही वेळ आली. नियोजन करता येत नसल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, अशी संतप्त प्रतिक्रिया निंबाळकर यांनी व्यक्त केली.या भागात शेतकरी आत्महत्या करतील...नीरा डावा कालव्याच्या पाण्यापासून ३६ फाट्यावरील शेतकऱ्यांना सातत्याने वंचित ठेवले जात आहे. पाण्याअभावी शेती जळून जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. वेळेत पाणी न मिळाल्यास या भागातदेखील शेतकरी आत्महत्या करतील, अशी भीती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्रामसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केली.जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार करणार...शेतकरी पाणीपट्टी भरतात. पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पाणी न मिळाल्याने आता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत इंदापूरच्या वतीने जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती इंदापूर तालुका संघटक प्रशांत साळुंके , सणसरचे संघटक संजय निंबाळकर यांनी दिली.