शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

नीरा डावा कालव्याचे पाणी पेटले

By admin | Updated: May 29, 2017 02:19 IST

इंदापूर तालुक्यात नीरा डावा कालव्याचे पाणी पेटले आहे. कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. ५४ फाटा, लासुर्णेपाठोपाठ

लोकमत न्यूज नेटवर्कभवानीनगर : इंदापूर तालुक्यात नीरा डावा कालव्याचे पाणी पेटले आहे. कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. ५४ फाटा, लासुर्णेपाठोपाठ रविवारी (दि. २८) ३६ फाट्यावरील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.नीरा डावा कालव्यावरील वितरिका क्रमांक ३६वर अवलंबून असणाऱ्या सणसर, हिंगणेवाडी, सपकळवाडी, कुरवली आदी भागातील शेतकऱ्यांनी रविवारी सणसर पाटबंधारे वसाहत येथे रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या या आंदोलनामुळे बारामती- इंदापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा’ आदी घोषणांनी या वेळी सणसर परिसर दुुमदुमला. चेहरे पाहून पाणी दिले जाते, तीन महिन्यांपासून सोडण्यात आलेले पाणी नेमके कुठे गेले, बारमाही पाणीपट्टी भरणारा शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहतो. मात्र, सायफनद्वारे ठराविक जणांना मुबलक पाणी मिळते. त्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी मदत करतात, अशा तक्रारी या वेळी शेतकऱ्यांनी मांडल्या. दिलीप पांढरे, दीपक कदम, नंदकुमार सपकळ आदींनी या वेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या वेळी आंदोलनात आबासाहेब निंबाळकर, शिवाजी सपकळ, किरण गायकवाड, संजय सपकळ, रवींद्र कदम, दत्तात्रय सपकळ आदी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर येथील आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, पाणी सोडण्याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. दोन तासांहून अधिक वेळ शेतकरी या ठिकाणी बसून होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत...या वेळी छत्रपती कारखान्याचे संचालक प्रदीप निंबाळकर यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना जाब विचारला. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या आवर्तनाची केवळ सणसर परिसरात अंमलबजावणी होत नाही. या ठीकाणी उन्हाळ्यातील पहिले आवर्तन अद्याप सुरु आहे. तेदेखील पाणी मिळाले नाही. याच कालव्यावर इतरत्र मात्र, दुसरे उन्हाळी आवर्तन सुरु आहे. हा येथील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. कार्यकारी अभियंता कार्यालयदेखील शेतकऱ्यांना अधिकारी सहज उपलब्ध होतील, अशा ठिकाणी असावे. त्यांचे पुणे येथील कार्यालय शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी आहे.धरण १०० टक्के भरूनदेखील शेतकऱ्यांवर ही वेळ आली. नियोजन करता येत नसल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, अशी संतप्त प्रतिक्रिया निंबाळकर यांनी व्यक्त केली.या भागात शेतकरी आत्महत्या करतील...नीरा डावा कालव्याच्या पाण्यापासून ३६ फाट्यावरील शेतकऱ्यांना सातत्याने वंचित ठेवले जात आहे. पाण्याअभावी शेती जळून जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. वेळेत पाणी न मिळाल्यास या भागातदेखील शेतकरी आत्महत्या करतील, अशी भीती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्रामसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केली.जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार करणार...शेतकरी पाणीपट्टी भरतात. पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पाणी न मिळाल्याने आता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत इंदापूरच्या वतीने जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती इंदापूर तालुका संघटक प्रशांत साळुंके , सणसरचे संघटक संजय निंबाळकर यांनी दिली.