शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

‘लिव्ह-इन’मधून ज्येष्ठ नागरिकांचे बहरतेय प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:11 IST

लक्ष्मण मोरे पुणे : तारुण्याच्या ऐन भरात विवाह झाल्यानंतर वार्धक्य येईपर्यंत माणूस संसार फुलवित राहतो. परंतु, आयुष्यभराचा जोडीदार मध्येच ...

लक्ष्मण मोरे

पुणे : तारुण्याच्या ऐन भरात विवाह झाल्यानंतर वार्धक्य येईपर्यंत माणूस संसार फुलवित राहतो. परंतु, आयुष्यभराचा जोडीदार मध्येच साथ सोडून गेल्यानंतर कोलमडून पडायला होते. एकटेपणाची भावना जीवावर उठते. जेवणाखाण्यापासून ते औषधांपर्यंतचे हाल होऊ लागतात. अशा काळात पुन्हा सोबत चालणा-या पावलांची आवश्यकता भासू लागते. सप्तपदी न चालताही ‘लिव्ह-इन-रिलेशीप’मधून शेकडो ज्येष्ठांचे प्रेम पुन्हा बहरास आले आहे. एकमेकांना समजून घेत एकमेकांची काळजी घेत या जोडप्यांच्या आयुष्याची सांज पुन्हा सुरम्य झाली आहे.

लिव्ह इनकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन अद्यापही बदलेलेला नाही. ज्येष्ठांचे वयोमान साधारणपणे ८० ते ९० च्या दरम्यान आलेले आहे. त्यामुळे खूप मोठा काळ त्यांना एकट्याने कंठावा लागतो. त्यांनाही जोडीदाराची आवश्यकता असते.

सुख-दु:खात, संघर्षात, यशापशात साथ देणारा जोडीदार मध्यातूनच सोडून गेल्यामुळे आयुष्य खडतर होते. मुलांचे होणारे दुर्लक्ष आणि एकटेपणाची भावना या ज्येष्ठांना मानसिक यातना देत राहते. त्यांच्या या समस्येवर ‘लिव्ह इन’चा उतारा लागू पडला आहे.

कोणी डॉक्टर आहे तर, कोणी व्यावसायिक, कोणी प्राध्यापक आहे तर कोणी गृहीणी, कोणी राजकारणी आहे तर कोणी निवृत्त सरकारी अधिकारी. सामाजिकदृष्ट्या ते विवाहीत नसले तरी त्यांची अंतर्मने जुळलेली आहेत. एकमेकांच्या काळजातलं दु:ख, डोळ्यातली वेदना, दुखणं-खुपणं, आनंद त्यांना समजतो. एकाला वेदना झाली तर दुसरा कळवळतो एवढे उत्तम ‘बॉंडिंग’ या ज्येष्ठांमध्ये लिव्ह-इनमधून तयार झाले आहे.

===

सकारात्मक बाजू

- दोघांच्या राजीखुशीने करारनामा करणे

- काही काळ एकत्र व्यतित केल्यावर दोघांची इच्छा असल्यास लग्नही

- जो-तो आपापला आर्थिक भार उचलतो. संपत्तीला कोणताही धोका नाही. (त्यामुळे मुलांकडून सकारात्मक प्रतिसाद)

- जेवणाची व औषधांची पथ्ये पाळली जातात.

- योग्य जोडीदार मिळाल्यास दोघेही एकमेकांची काळजी घेतात.

- संवाद साधायला, मोकळं व्हायला हक्काचं माणूस मिळतं.

====