शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

मोबाईलच्या शोधापेक्षा क्रमांकावर प्रेम अधिक

By admin | Updated: February 25, 2015 00:42 IST

दर दिवशी मोबाईल हरविल्या बाबतच्या किमान दोन तक्रारींची नोंद प्रत्येक पोलीस ठाण्यात होत आहे. तक्रारीनंतर मोबाईलऐवजी त्यातील त्याच

मंगेश पांडे, पिंपरीदर दिवशी मोबाईल हरविल्या बाबतच्या किमान दोन तक्रारींची नोंद प्रत्येक पोलीस ठाण्यात होत आहे. तक्रारीनंतर मोबाईलऐवजी त्यातील त्याच क्रमांकाचे दुसरे सिम कार्ड घेता यावे यासाठीच पोलिसांकडील तक्रारीची प्रत मिळविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. तक्रार करूनही हरविलेले मोबाईल सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सध्या मोबाईल फोनचा वापर वाढला आहे. मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये तरुण-तरुणींची संख्या अधिक आहे. मात्र, मोबाईल हाताळताना आवश्यक ती दक्षता घेतली जात नाही. त्यामुळेच अनेकांचे मोबाईल चोरीला जातात, काहींंचे हरवितात. मोबाईल चोरीला गेला अथवा खरोखरच हरविला, तरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर त्याबाबत ‘प्रॉपर्टी मिसिंग’ अशी नोंद केली जाते. मोबाईल कंपनीचे नाव, मोबाईलचा आयएमईआय क्रमांक, त्यातील सिमकार्डचा क्रमांक याची नोंद केली जाते. त्यानंतर ठाण्यातील तपास अधिकारी याबाबतचा अहवाल परिमंडळ तीनच्या कार्यालयात पाठवितात. येथून हरविलेल्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक संबंधित मोबाईल कंपनीला कळविला जातो. त्यानंतर अन्य व्यक्तीने मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकल्यास ताबडतोब मोबाईल ज्या क्षेत्रात आहे, त्या स्थळाची (लोकेशन) कंपनीला माहिती मिळते. यासह त्यामध्ये कोणत्या क्रमांकाचे सिमकार्ड आहे याचीही माहिती उपलब्ध होते. यावरून मोबाईला शोध घेणे शक्य होते. मोबाईल बंद असल्यास अडचण निर्माण होते. तसेच त्याचा शोध घेणे कठीण होते. अनेकदा चोरलेल्या मोबाईलधील सिमकार्ड चोरटा काढून टाकतो. त्यामुळे ‘आयएमईआय’ क्रमांकाच्या आधारावरही शोध घेणे शक्य होत नाही. अनेकांना मोबाईलपेक्षाही त्यातील सिमकार्ड महत्त्वाचे असते. त्यामुळे मोबाईल हरविल्याबाबत ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याचा शोध लागला का, याबाबतची विचारणा करण्यासाठी संबंधित व्यक्ती ठाण्यात फेऱ्या मारत असते. मात्र, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे तक्रारदाराच्या पदरी निराशाच पडते. यामुळे अनेक तक्रारदार मोबाईल पुन्हा मिळण्याची आशाच सोडून देतात. परंतु नातेवाईक, व्यावसायिक यांच्यामध्ये प्रचलित असलेला मोबाईल क्रमांक मिळविण्याचा आग्रह असतो. पुन्हा त्याच क्रमांकाचे सिमकार्ड मिळवायचे असल्यास सिमकार्ड कंपनीला तक्रारीची प्रत देणे बंधनकारक असते.