शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

दीड महिना पुरेल इतकाच साठा

By admin | Updated: April 9, 2016 01:47 IST

पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यातील काही भागास पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणात ७ एप्रिलपर्यंत ३३ टक्के पाणीसाठा आहे. धरण बांधल्यानंतरच्या ४५ वर्षांत एप्रिलमधील हा नीचांकी साठा आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यातील काही भागास पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणात ७ एप्रिलपर्यंत ३३ टक्के पाणीसाठा आहे. धरण बांधल्यानंतरच्या ४५ वर्षांत एप्रिलमधील हा नीचांकी साठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी १६ टक्के कमी साठा असून, तो जेमतेम दीड महिनाभर पुरेल इतका आहे.जपून पाणी वापरल्यास दोन महिन्यांचे नियोजन व्यवस्थित होईल अन्यथा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाणीकपात करावी लागण्याची शक्यता आहे. या वर्षी पाऊस कमी पडल्याने पवना धरण १०० टक्के भरलेच नाही. सध्या असलेला ३३ टक्के पाणीसाठा ४०-४५ दिवस पुरेल. त्यामुळे पुरवठ्यात कपात करण्याशिवाय पर्याय नाही. काटकसरीने वापर केल्यास पावसाळ्यापूर्वीचे दोन महिने पाणी पुरेल. गतवर्षी ७ एप्रिलअखेर धरणात ४९ टक्के साठा होता. या वर्षी मेपासून पिंपरी-चिंचवड शहरासह मावळला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे अपेक्षित आगमन न झाल्यास या भागात पाण्याबाबतची बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. पवना पाटबंधारे विभागाचे अधिकारी मनोहर खाडे म्हणाले, ‘‘सध्या धरणातून १२०० क्युसेसने साडेपाच तास पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आणखी पाणीकपात केली जाणार असून, मेमध्ये शेतीच्या पंपांचा पाणीपुरवठा बंद करून केवळ पिण्यासाठी पाणी दिले जाणार आहे. या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्के साठा कमी होता. आतापर्यंत १० टक्के पाणीकपात केली आहे. सर्वांनी आजपासूनच काटकसरीने पाण्याचा वापर करायला हवा.’’