शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अकरावी ‘रेस्ट इयर’ समजलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:08 IST

इयत्ता बारावीचा निकाल कसा जाहीर केला जाणार, याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, सीबीएसईने स्वीकारलेले सूत्रच ...

इयत्ता बारावीचा निकाल कसा जाहीर केला जाणार, याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, सीबीएसईने स्वीकारलेले सूत्रच राज्य मंडळाने स्वीकारले आहे. त्यामुळे दहावी, अकरावीचे गुण आणि बारावीचे अंतर्गत परीक्षांचे गुण विचारात घेऊन बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. पुणे विभागातून बारावीच्या कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या तब्बल २ लाख ३० हजार ९८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात १ लाख २६ हजार ६०६ मुलांची तर १ लाख ४ हजार ३३७ मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षांचे गुण कसे देणार असा प्रश्न उपस्थित होतो.

--------------

केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर प्रत्येक राज्यातील विद्यार्थी इयत्ता अकरावीला रेस्ट इयर समजतात. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फटका बसेल असे नाही. सीबीएसईने स्वीकारलेले सूत्र राज्य शासनाने स्वीकारले आहे. हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे.

- डॉ. वसंत काळपांडे , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

----------------

दहावी- बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी या परीक्षांकडे अधिक लक्ष देतात. मात्र, अकरावीकडे अनेक विद्यार्थी रेस्ट इयर म्हणूनच पाहतात. परिणामी मध्यम वर्गीय विद्यार्थ्यांना अकरावीत कमी गुण मिळण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे मागील वर्षी अकरावीची परीक्षा झाली नाही. त्यामुळे सध्याच्या सूत्रामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- अविनाश ताकवले, माजी प्राचार्य

-------------------

विद्यार्थ्यांनी दहावीत चांगले गुण मिळवले. मात्र, कोरोनामुळे अकरावीत प्रत्यक्ष वर्गात जाता आले नाही. त्यामुळे बारावीचा निकाल अनपेक्षित आहे. बोर्डाने जाहीर केलेला निकाल स्वीकारावा लागणार आहे. परंतु, तो कसा असेल याबाबत चिंता आहे.

- तन्वी पवार, विद्यार्थी

-------------

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिक शास्त्र या विषयांसाठी ३० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा आहे. तर उर्वरित विषयासाठी २० गुणांची तोंडी किंवा अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा आहे. कोरोनामुळे प्रात्यक्षिक परीक्षा झाल्याच नाहीत. बोर्डाचे मुल्यमापन ८०/२० पॅटर्ननुसार केले जाते. मात्र, कोणतेचे मुल्यमापन योग्य पध्दतीने झाले नाही.

-----------------------------------

पुणे विभागात बारावीच्या परीक्षेस नोंदणी केलेले विद्यार्थ्यांची आकडेवारी

एकूण विद्यार्थी : २ लाख ३० हजार ९८३

मुलांची संख्या : १ लाख २६ हजार ६०६

मुलींची संख्या: १ लाख ४ हजार ३३७