शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

नेत्यांच्या दुर्लक्षामुळे शहर काँग्रेसचे नुकसान

By admin | Updated: December 29, 2016 03:16 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजू लागले आहेत. काँगे्रसच्या विद्यमान सात नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला खिंडार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजू लागले आहेत. काँगे्रसच्या विद्यमान सात नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला खिंडार पडले आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना ताकत न दिल्याने, लक्ष न दिल्याने गेल्या अनेक वर्षांत काँग्रेस पिछाडीवर गेली आहे. शहराच्या राजकारणात, विकासात काँग्रेसचे योगदान वादातीत आहे. दिवंगत सांस्कृतिक कार्यमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी शहरविकासावर आपला ठसा उमटविला. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चिंचवड प्रेक्षागृह आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्यामुळेच शहरात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतरही प्रा. मोरेंमुळेच काँग्रेसचे महापालिकेतील वर्चस्व, ताकत कायम ठेवली होती. सत्तेत समान भागीदार असत. मात्र, सरांच्या निधनानंतर काँग्रेसची ताकत विखुरली गेली. त्यानंतर काँग्रेसला खिळखिळे करण्याचे प्रयत्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आले. २००२च्या निवडणूकीत ३२ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यानंतर २००७ च्या निवडणूकीत १९ जागा आणि २०१२ च्या निवडणूकीत १४ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. गौतम चाबुकस्वार शिवसेनेत गेल्याने काँग्रेसचे महापालिकेतील संख्याबळ १३वर आले. प्रा. मोरेंचे वारसदार माजी शहराध्यक्ष हनुमंत गावडे यांच्यासह ११ जणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले, तर तत्कालीन शहराध्यक्ष श्रीरंग बारणे शिवसेनेत गेले. त्यानंतर भाऊसाहेब भोईर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची सूत्रे आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या जागावाटपात २००९च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला. पक्षाची उमेदवारी भोईरांना देऊन अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना राष्ट्रवादीने निवडून आणले. पवारनीतीमुळे भोईरांचा पराभव झाला. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाही केवळ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा गड म्हणून पिंपरी-चिंचवडमधील प्राधिकरण समितीही निवडली गेली नाही. विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्याही नियुक्त्या न केल्यानंतर भोईर यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सचिन साठे यांची शहराध्यक्षपदी निवड झाली. मात्र, भोईर आणि साठे यांच्या समर्थकांत अधूनमधून धुसफूस सुरू असते. वर्चस्ववादाची लढाई सुरूच होती. पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर काही नगरसेवक राष्ट्रवादीत येणार असल्याचे सूचित केले होते. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते. त्यामुळे भोईर गटाने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.(प्रतिनिधी)भोईरांचे पवारांशी गुफ्तगू१पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पवार यांनी भोईरांशी गुफ्तगू केले. त्यामुळे महिनाभरात १० नगरसेवकांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करेल, अशी चर्चा होती. एक एक करून विद्यमान आणि माजी नगरसेवक आणि पदाधिकारी इतर पक्षांत जात आहेत. पदाधिकारी पक्ष सोडून का जाताहेत, हेही पक्षश्रेष्ठींनी समजून घ्यायला हवे. मात्र, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून लक्ष दिले जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. राज्यातील किंवा देशातील काँग्रेसच्या नेत्यांचेही शहराकडे दुर्लक्ष झाले आहे. याचाच फायदा पवारांनी घेतला. गटबाजीलाही उधाण२१५ वर्षांत शहरातील राजकारणात बदल झाला आहे. पक्षापेक्षा व्यक्तिगत राजकारण करण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पूर्वी या शहरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे असे प्रमुख गट मानले जायचे. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अजित पवार यांनी लक्ष घातल्यानंतर साहेब, दादा आणि सर असे तीन गट मानले जायचे. मात्र, पक्ष आणि नेत्यांच्या नावावर चालणारे राजकारण संपले आहे. स्थानिक नेत्यांच्या नावाने गटबाजी सुरू झाली आहे. अशाच प्रकारचे गट काँग्रेस आणि इतर पक्षांतही निर्माण झाले आहेत. ‘लोकमत’मध्ये वृत्त३पुणे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीत बिघाडी झाल्याने दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले. या निकालावर फेब्रुवारीत होणाऱ्या महापालिका निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे. त्यावरूनच आघाडी होणार की नाही, हे निश्चित आहे. काँग्रेस फोडण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने व्यूहरचनाकेली आहे. पुढील महिना काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानला जात आहे, याबाबत लोकमतने मागील आठवड्यात काँग्रेसला धोक्याची घंटा हे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते, हे वृत्त खरे ठरले आहे.