शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

प्रदूषण मंडळाचा प्रकल्पांना खो

By admin | Updated: April 27, 2017 05:16 IST

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तब्बल १४०० टन क्षमता असणारे ४६ कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि दोन

पुणे : शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तब्बल १४०० टन क्षमता असणारे ४६ कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि दोन कॅपिंगचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेचे अधिकारी ना हरकत मिळण्यासाठी एमपीसीबीकडे हेलपाटे घालत आहेत.फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्याने शहरातील कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी बंद पडलेले व नव्याने सुरू होणारे कचरा प्रक्रिया प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरात वेगवेगळे प्रकल्प उभारणीचे काम सुरू होते. त्याअंतर्गत ४८ प्रकल्प सुरू करण्यासाठी मान्यता मिळावी, यासाठी आॅक्टोबर २०१६ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे प्रस्ताव पाठविला आहे. सहा महिन्यांपासून यासाठी महापालिकेचे अधिकारी एमपीसीबीकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी चकरा मारत आहेत. परंतु अद्यापही या प्रकल्पांना मान्यता दिली नाही. दरम्यान, शहरातील कचऱ्याचा प्रश्न आणखीनच चिघळला आहे. ग्रामस्थ कचरा टाकू देणार नाही म्हणून ठाम आहेत. महापौरांनीही त्यांच्याबरोबर दोन वेळा चर्चा केली; मात्र मार्ग निघू शकला नाही. कचरा डेपोमध्ये वाहने येऊच दिली जात नसल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न आता गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे. प्रशासन कचरा साचू नये म्हणून पूर्ण प्रयत्न करीत आहे. दरम्यान, शहराभोवतालच्या गावांमुळे कचऱ्याच्या समस्येत आणखी वाढ झाली असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिका हद्दीत नसलेली ही गावे त्यांच्याकडील सर्व कचरा महापालिकेच्या हद्दीत आणून टाकतात. रोज अशा किमान २०० टन कचऱ्याच्या निर्मूलनाची जबाबदारी महापालिकेला पार पाडावी लागत आहे. संबंधित गावांना नोटिसा दिल्या, काही वेळा दंडात्मक कारवाई केली तरीही हे प्रमाण कमी होत नाही. या भागातील ग्रामपंचायतींनीच कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची गरज आहे. मात्र आर्थिक स्थितीमुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातूनच गावांमध्ये साठलेला कचरा एकत्र करून रात्रीच्या सुमारास शहरात आणला जात आहे. प्रशासनाची शहरात साठत असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी धावपळ होत आहे. (प्रतिनिधी)