शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण मंडळाचा प्रकल्पांना खो

By admin | Updated: April 27, 2017 05:16 IST

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तब्बल १४०० टन क्षमता असणारे ४६ कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि दोन

पुणे : शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तब्बल १४०० टन क्षमता असणारे ४६ कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि दोन कॅपिंगचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेचे अधिकारी ना हरकत मिळण्यासाठी एमपीसीबीकडे हेलपाटे घालत आहेत.फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्याने शहरातील कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी बंद पडलेले व नव्याने सुरू होणारे कचरा प्रक्रिया प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरात वेगवेगळे प्रकल्प उभारणीचे काम सुरू होते. त्याअंतर्गत ४८ प्रकल्प सुरू करण्यासाठी मान्यता मिळावी, यासाठी आॅक्टोबर २०१६ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे प्रस्ताव पाठविला आहे. सहा महिन्यांपासून यासाठी महापालिकेचे अधिकारी एमपीसीबीकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी चकरा मारत आहेत. परंतु अद्यापही या प्रकल्पांना मान्यता दिली नाही. दरम्यान, शहरातील कचऱ्याचा प्रश्न आणखीनच चिघळला आहे. ग्रामस्थ कचरा टाकू देणार नाही म्हणून ठाम आहेत. महापौरांनीही त्यांच्याबरोबर दोन वेळा चर्चा केली; मात्र मार्ग निघू शकला नाही. कचरा डेपोमध्ये वाहने येऊच दिली जात नसल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न आता गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे. प्रशासन कचरा साचू नये म्हणून पूर्ण प्रयत्न करीत आहे. दरम्यान, शहराभोवतालच्या गावांमुळे कचऱ्याच्या समस्येत आणखी वाढ झाली असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिका हद्दीत नसलेली ही गावे त्यांच्याकडील सर्व कचरा महापालिकेच्या हद्दीत आणून टाकतात. रोज अशा किमान २०० टन कचऱ्याच्या निर्मूलनाची जबाबदारी महापालिकेला पार पाडावी लागत आहे. संबंधित गावांना नोटिसा दिल्या, काही वेळा दंडात्मक कारवाई केली तरीही हे प्रमाण कमी होत नाही. या भागातील ग्रामपंचायतींनीच कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची गरज आहे. मात्र आर्थिक स्थितीमुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातूनच गावांमध्ये साठलेला कचरा एकत्र करून रात्रीच्या सुमारास शहरात आणला जात आहे. प्रशासनाची शहरात साठत असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी धावपळ होत आहे. (प्रतिनिधी)