शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींवर करडी नजर

By admin | Updated: July 4, 2015 00:03 IST

जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या बैैठकीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेऊन आता

बारामती : जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या बैैठकीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेऊन आता कामकाजावर आपण लक्ष ठेवणार असल्याचे सूतोवाच केले आहे. बैठकीत त्यांनी विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्याच्या सूचनाही दिल्या. बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमधील अंतर्गत गटबाजी, मागील आठवड्यात विशेष सर्वसाधारण सभा काही मिनिटांत गुंडाळण्याच्या प्रकाराची त्यांनी दखल घेतली. शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असे पवार यांच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यांनी तत्काळ त्याची दखल घेऊन बारामती महावितरणचे परिमंडल मुख्य अभियंता रामराव मुंडे यांना या कामाची माहिती घेण्याचे आदेश दिले. बारामती शहरातील गणेश मंडईचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे रिंगरोडलगत तात्पुरती मंडई सुरू करण्यात आली आहे. बारामती शहराचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे तातडीने बाजार समिती आवार, सूर्यनगरी भागात मंडई सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्याचबरोबर एकाच ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे भविष्यात आणखी चार ते पाच ठिकाणी मंडई सुरू कराव्यात, असे त्यांनी सांगितले. त्यामध्ये कसबा, पाटस रोड, जळोची, तांदूळवाडी आदी भागांत त्याचे नियोजन करावे, असे सांगितले. पालखी सोहळ्यासाठी राज्य शासनाने २ कोटी रुपये नगरपालिकेला मंजूर केले आहेत. त्याचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करायचा आहे. त्यावर स्वतंत्र मीटिंग आयोजित करण्यात आली आहे. मात्र, विशेष सर्वसाधारण सभेतच या विषयाला मंजुरी दिल्याचे दाखविण्यात आले होते. याबाबत काही नगरसेवकांनी अजित पवार यांना पत्राद्वारे कळविले होते. त्यावर पवार यांनी एकहाती सत्ता असतानादेखील असे प्रकार होता कामा नयेत, असे सांगितले. शहरातील विविध विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. रेल्वे उड्डाणपूल १५ आॅगस्टपर्यंत सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेतील गटबाजीमुळे पवार यांनी नगरसेवकांची बैठक घेतली. एकत्रित काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)बारामती शहरातील विकासकामांच्या आढाव्याबरोबरच शहरातील पत्रकार, डॉक्टर, वकील, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपणाची मोहीम जोरात हाती घ्यावी, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यानुसार पालखी सोहळ्याच्या आढाव्याची बैठक झाल्यानंतर सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून नियोजन करण्यात येणार आहे.- सुभाष सोमाणी, नगराध्यक्ष, बारामती