शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

लॉकडाऊनमुळे धंदा बुडाला, कराचे ओझे तरी कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक गोष्टी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक गोष्टी सोडता इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत. बाजारात पेठेतील व्यापाऱ्यांपासून फेरीवाल्यांचे अर्थचक्र थांबले आहे. गेल्या वर्षभरापासून व्यापारी कोरोनाविरोधात लढा देत आहेत, त्यामुळे आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. व्यापारी थकला तर अर्थव्यवस्था मंदावेल. अशी भीती शहरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली, असून करात सूट मिळण्याची मागणी केली आहे.

बाजारपेठेतल्या दैनंदिन आर्थिक उलाढालीमुळे अर्थचक्र फिरते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे चक्र अडखळले आहे. वर्षभरातले लॉकडाऊन आणि कडक निर्बंध यामुळे खेळणी, प्लॅस्टिकच्या वस्तू, सजावटीचे साहित्य, पत्रावळी, शोभेच्या वस्तू, कपडे तसेच सणवारांनुसार मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंचे व्यापारी, उत्पादक विक्रेते आर्थिक संकटात आहेत. किरकोळ विक्रेत्यांची दुकाने बंद असल्याने मालाला मागणी नाही. आहे तो माल दुकानात आणि गोडाऊनमध्ये पडून आहे.

उत्पन्न थांबले असले, तरी दैनंदिन खर्च फार कमी झालेले नाहीत. जागा भाडे, बँकेचे हप्ते, विजेचे बिल, घरगुती खर्च, सरकारी कर हे खर्च सुरूच आहे. त्यामुळे व्यापारी आता थकू लागला आहे. सरकार त्याला कोणत्याही प्रकारे मदत करत नसले, तरी किमान करात सूट मिळावी. तसेच व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना आर्थिक आधार देण्याची आता गरज आहे. असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सांगली, पंढरपूर, भिगवण, इंदापूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर आदी भागातील ६० टक्के किरकोळ विक्रेते शहरातून माल खरेदी करतात. पुण्याच्या उपनगरातील सुमारे ८० टक्के विक्रेते मध्यवस्तीतील बाजारपेठेतून खरेदी करतात. हातावर पोट असलेले, फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेते, छोटे दुकानदार आर्थिक संकटात आहेत. अनेकांनी व्यवसाय बंद केले आहेत. त्यांना पाठबळ देण्याची गरज असल्याचे व्यापारी सांगतात.

कोट

व्यापाऱ्यांचा पाय खोलात

“व्यापारी कधी नव्हता, तेवढा आता आर्थिक संकट सापडला आहे. व्यापाऱ्यांकडे आता सहानुभूतीने बघण्याची वेळ आली आहे. व्यापारी नेहमीच आर्थिक संकटांशी लढला आहे. मात्र आत्ताची वेळ खूपच वाईट आहे. अनेकांच्या भिशा ठप्प आहेत. पैसा खेळत नाही आणि असलेला धंद्याच्या गुंतवणुकीत अडकून पडला आहे. सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.”

- सुरेश जैन, अध्यक्ष, पुणे शहर व्यापारी असोसिएशन.