शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

प्रादुर्भाव कमी होत असताना लॉकडाऊन नुकसान करणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:09 IST

तालुक्यात दि. ११ मे ते १७ मे सात दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर करून प्रशासनाने शेतकऱ्यांची गळचेपी केली आहे. शेती व ...

तालुक्यात दि. ११ मे ते १७ मे सात दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर करून प्रशासनाने शेतकऱ्यांची गळचेपी केली आहे. शेती व शेतीविषयक कामांशी संबंधित औषधे, बी-बियाणे खते, अवजारे यांची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच उत्पादित फळे, फुले व भाजीपाला, आडते दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यामुळे उत्पादित मालांचे नुकसान होणार आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बँकांचे कामकाजही ग्राहकांसाठी या आदेशाने बंद ठेवण्यात आल्याने शेती व पूरक व्यावसायासाठी कर्जपुरवठा ठप्प होणार आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेला जगाचा पोशिंदा शेतकरी मोठा अडचणीत आला आहे.

प्रशासनाने किमान काही तासांचा कालावधी देऊन दुकाने व बँका सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो रुपयांचा फळे व भाजीपाला या लॉकडाऊनमुळे कुठे विकायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या विसंगत निर्णयामुळे गरीब शेतकऱ्यांना हे नुकसान सोसावे लागत आहे. विक्रीसाठी आलेला लाखो रुपये किमतीचा भाजीपाला उन्हामुळे खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांना अखेर तो फेकून द्यावा लागणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती आणि किरकोळ भाजी मार्केट बंद ठेवणे हा निर्णय पूर्णपणे प्रशासनाची चूक आहे. एकीकडे राज्यात मोफत रेशन धान्य वाटप करण्यात शासन सांगत आहे, मात्र रोजगार बंद असलेल्या सर्वसामान्य लोकांना रेशन दुकानेही बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत कळस येथील बँकेत चौकशी केली असता, ग्राहकांसाठी बँका बंद आहेत असे सांगण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लाॅकडाऊन जाहीर केले आहे. सर्व बँका या कालावधीत ग्राहकांसाठी बंद असणार आहेत. त्याचप्रमाणे रेशन दुकानेही बंद राहतील. नागरिकांनी सात दिवसांच्या कालावधीकरिता घरीच थांबून सहकार्य करावे.

अनिल ठोंबरे, तहसीलदार, इंदापूर