शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

लॉकडाऊनमध्ये ६८ टक्के व्यक्तींच्या ताटातून डाळ, भाजी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अन्न अधिकार अभियानाने ‘हंगर वॉच’ अंतर्गत महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नंदुरबार, सोलापूर, पालघर, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अन्न अधिकार अभियानाने ‘हंगर वॉच’ अंतर्गत महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नंदुरबार, सोलापूर, पालघर, नाशिक आणि धुळे या ९ जिल्ह्यांतील वंचित आणि उपेक्षित समाजाच्या अन्नसुरक्षेची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. लॉकडाऊन काळात अन्नाची पोषण गुणवत्ता कमी झाल्याचे मत ६८ % व्यक्तींनी नोंदवले. त्यापैकी ३०% लोकांनी पोषण गुणवत्ता ‘खूपच वाईट’ असल्याचे नोंदवले आहे. कमी उत्पन्न गटांवर लॉकडाऊनचा परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. ६०% पेक्षा अधिक व्यक्तींनी लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत अन्नाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे किंवा बरेच कमी झाले असल्याचे नोंदवले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, देशाच्या विविध भागातील वंचित आणि उपेक्षित समाज घटकाची भुकेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी अन्न अधिकार अभियानाने सप्टेंबर २०२० मध्ये अभ्यास केला. यासाठी या जिल्ह्यांतील २५० लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला.

लॉकडाऊन संपल्याच्या पाच महिन्यांनंतरही भुकेची परिस्थिती गंभीर असल्याचे ‘हंगर वॉच’च्या प्राथमिक निष्कर्षांवरून दिसून येते. ९६ टक्के लोकांंचे रोजगार व व्यवसायाचे नुकसान झाले. उत्पन्न कमी झाल्याने ६३ टक्के लोकांच्या आहारातून धान्याचे, तर ७१ टक्के लोकांच्या आहारातून डाळी खाण्याचे. ७६ टक्के लोकांच्या आहारातून भाज्यांचे प्रमाण कमी झाले. ६८ टक्के लोकांनी त्यांची पोषणस्थिती खालावल्याचे नमूद केले. अन्नधान्य खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यायची गरज पडल्याचे ४९ टक्के लोकांनी नोंदवले.

अभ्यासात सहभागी लोकांपैकी सुमारे ४३% लोकांना एप्रिल-मे मध्ये कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नव्हते. एप्रिल-मे मध्ये कसलेही उत्पन्न नसलेल्यांपैकी ३४% लोक हे नोकरी व स्वयंरोजगार गमावल्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये देखील कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळवत नव्हते. लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये उत्पन्न कमी झाल्याचे ९०% पेक्षा जास्त लोकांनी नोंदवले आहे.

चौकट

उसनवारी, दागदागिने व जमीन विक्रीत वाढ

सुमारे ४९% व्यक्तींनी लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत अन्नासाठी पैसे उसने घेण्याची गरज वाढल्याचे सांगितले. १२% लोकांनी भूक भागविण्यासाठी आणि आरोग्याच्या समस्येवर उपाययोजनेसाठी दागिने विकल्याची नोंद आहे. आणखी १२% लोकांच्या मते, त्यांच्याकडे दागिने असते, तर त्यांनी ते सर्व विकले असते असे नोंदवले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ३% लोकांनी लॉकडाऊन दरम्यान त्यांची जमीनदेखील विकली.