शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

साखर कारखान्यांकडील कर्जाचे १० वर्षांसाठी पुनर्गठन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:11 IST

- इंदापूर : राज्यातील साखर कारखान्याकडे असलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाचे १० वर्षांसाठी पुनर्गठन करणे आवश्यक आहे. या राज्यातील ...

-

इंदापूर : राज्यातील साखर कारखान्याकडे असलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाचे १० वर्षांसाठी पुनर्गठन करणे आवश्यक आहे. या राज्यातील साखर कारखान्यांचे शिष्टमंडळ पुढील आठवड्यात नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेणार आहे. अशी माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी दिली.

पुणे येथे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाची आज बैठक झाली. या बैठकीत साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या कर्जाच्या पुनर्गठनाच्या निकषाच्या अटीत साखर कारखान्यांकडील कर्ज समाविष्ट होण्यास अडचणी येत असल्याने राज्यातील साखर कारखानदारी समोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांचे कर्ज पुनर्गठनासाठी प्रस्ताव येत्या ७ दिवसांत तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारमण व मान्यवरांची भेट घेऊन त्यांचेसमोर कर्ज पुनर्गठनासाठीसाठी सादरीकरण केले जाणार आहे.

साखर कारखान्यांनी एनसीडीसी, एसडीएफ, राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका यांचेकडून घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, अशी मागणी महासंघाची बैठकीत करण्यात आली. देशातील व राज्यातील साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी कर्जाचे पुनर्गठन करणे आवश्यक आहे, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. बैठकीला साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व मान्यवर उपस्थित होते.

______________________________

फोटो क्रमांक : २१ इंदापूर साखर कारखाना

फोटो ओळ : पुणे येथे राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या झालेल्या बैठकीत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर