शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

साहित्य संमेलन १५ जानेवारीपासून

By admin | Updated: November 27, 2015 03:37 IST

पिंपरी-चिंचवड येथे होत असलेले ८९वे अखिल भारतीय साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारीदरम्यान होणार आहे. ‘ज्ञानपीठकारांशी संवाद’ हे या वर्षीच्या संमेलनाचे वैशिष्ट्य राहील

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेले ८९वे अखिल भारतीय साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारीदरम्यान होणार आहे. ‘ज्ञानपीठकारांशी संवाद’ हे या वर्षीच्या संमेलनाचे वैशिष्ट्य राहील, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.१५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. ‘उद्योग आणि साहित्य’ असा मध्यवर्ती विषय असलेल्या या दिंडीत पिंपरी-चिंचवड येथील कंपन्यांमधील उद्योजक व कामगारही सहभागी होणार आहेत. सायंकाळी संमेलनाचे मावळते अध्यक्ष सदानंद मोरे ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करतील. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. १८ रोजी संमेलनाची सांगता होईल.यंदाच्या साहित्य संमेलनात स्त्रीसाहित्यावर आधारित ४-५ परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. १९८०नंतरची मराठी कविता स्त्रीकेंद्रित आहे, माध्यमातील स्त्रीप्रतिमा आणि भारतीय संस्कृती, श्रमिक महिलांच्या व्यथा आणि लेखकांच्या कथा, हे परिसंवाद होणार आहेत. ‘मराठी समीक्षा किती संपन्न, किती थिटी?’, ‘मराठी वाङ्मयातील पुरस्कारांचे सांस्कृतिक आणि सामाजिक स्थान’, ‘आजची तरुणाई काय वाचते, काय लिहिते?’, ‘अभिरुचीसंपन्न विनोद आणि आजचे मराठी साहित्य’, ‘मराठी साहित्यातील उद्योगजगताचे चित्र आणि महाराष्ट्रातील उद्योजक’, ‘बालसाहित्य आणि बालरंगभूमी सकस आहे का?’ हेही परिसंवाद होतील.सासवडमधील साहित्य संमेलनामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेला ‘अभिजात कथांचे वाचन’ हा आगळावेगळा कार्यक्रम रसिकांच्या मागणीस्तव यंदाही संमेलनात समाविष्ठ करण्यात आला आहे. ह. ना. आपटे यांच्या पहिल्या कथेला १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दोन विशेष कार्यक्रम सादर करण्यात येतील. कथाकथनाचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. आशा भोसले, अशोक हांडे, गुलजार, शरद पवार, रघुनाथ माशेलकर यांची संमेलनाला विशेष उपस्थिती असणार आहे.संमेलनास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या रसिकांची चार दिवसांची भोजन तसेच निवास व्यवस्था संयोजकांतर्फे केली जाणार आहे. त्यासाठी १,२०० व २,००० रुपये प्रतिनिधी शुल्क असून, नोंदणी अर्जाची शेवटची मुदत ३० डिसेंबर असेल.प्रतिनिधी शुल्क आणि ग्रंथप्रदर्शनातून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्तांसाठी दिला जाणार आहे.