शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

साहित्य संमेलन १५ जानेवारीपासून

By admin | Updated: November 27, 2015 03:37 IST

पिंपरी-चिंचवड येथे होत असलेले ८९वे अखिल भारतीय साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारीदरम्यान होणार आहे. ‘ज्ञानपीठकारांशी संवाद’ हे या वर्षीच्या संमेलनाचे वैशिष्ट्य राहील

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेले ८९वे अखिल भारतीय साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारीदरम्यान होणार आहे. ‘ज्ञानपीठकारांशी संवाद’ हे या वर्षीच्या संमेलनाचे वैशिष्ट्य राहील, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.१५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. ‘उद्योग आणि साहित्य’ असा मध्यवर्ती विषय असलेल्या या दिंडीत पिंपरी-चिंचवड येथील कंपन्यांमधील उद्योजक व कामगारही सहभागी होणार आहेत. सायंकाळी संमेलनाचे मावळते अध्यक्ष सदानंद मोरे ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करतील. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. १८ रोजी संमेलनाची सांगता होईल.यंदाच्या साहित्य संमेलनात स्त्रीसाहित्यावर आधारित ४-५ परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. १९८०नंतरची मराठी कविता स्त्रीकेंद्रित आहे, माध्यमातील स्त्रीप्रतिमा आणि भारतीय संस्कृती, श्रमिक महिलांच्या व्यथा आणि लेखकांच्या कथा, हे परिसंवाद होणार आहेत. ‘मराठी समीक्षा किती संपन्न, किती थिटी?’, ‘मराठी वाङ्मयातील पुरस्कारांचे सांस्कृतिक आणि सामाजिक स्थान’, ‘आजची तरुणाई काय वाचते, काय लिहिते?’, ‘अभिरुचीसंपन्न विनोद आणि आजचे मराठी साहित्य’, ‘मराठी साहित्यातील उद्योगजगताचे चित्र आणि महाराष्ट्रातील उद्योजक’, ‘बालसाहित्य आणि बालरंगभूमी सकस आहे का?’ हेही परिसंवाद होतील.सासवडमधील साहित्य संमेलनामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेला ‘अभिजात कथांचे वाचन’ हा आगळावेगळा कार्यक्रम रसिकांच्या मागणीस्तव यंदाही संमेलनात समाविष्ठ करण्यात आला आहे. ह. ना. आपटे यांच्या पहिल्या कथेला १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दोन विशेष कार्यक्रम सादर करण्यात येतील. कथाकथनाचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. आशा भोसले, अशोक हांडे, गुलजार, शरद पवार, रघुनाथ माशेलकर यांची संमेलनाला विशेष उपस्थिती असणार आहे.संमेलनास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या रसिकांची चार दिवसांची भोजन तसेच निवास व्यवस्था संयोजकांतर्फे केली जाणार आहे. त्यासाठी १,२०० व २,००० रुपये प्रतिनिधी शुल्क असून, नोंदणी अर्जाची शेवटची मुदत ३० डिसेंबर असेल.प्रतिनिधी शुल्क आणि ग्रंथप्रदर्शनातून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्तांसाठी दिला जाणार आहे.