शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

साहित्य महामंडळ ‘सेन्सॉरबोर्ड’ नाही

By admin | Updated: December 26, 2016 03:37 IST

लेखकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते, त्यामुळे त्यांच्या लेखनाला कात्री लावण्याचा अधिकार साहित्य महामंडळाला नाही.

पुणे : लेखकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते, त्यामुळे त्यांच्या लेखनाला कात्री लावण्याचा अधिकार साहित्य महामंडळाला नाही. जर संमेलनाध्यक्षांच्या लेखी भाषणात काही वादग्रस्त अथवा अक्षेपार्ह मुद्दे असतील, तर त्या विधानाशी महामंडळ नक्कीच सहमत नसेल. मात्र त्यात काटछाट करण्याचा कोणताही अधिकार महामंडळाला नाही. महामंडळ केवळ प्रकाशकाच्या भूमिकेत असते, सेन्सॉरबोर्डाच्या नाही आणि त्याने असता कामाही नये, अशा शब्दांत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी संमेलनाध्यक्षाच्या भाषणाबाबतची भूमिका अधोरेखित केली. गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान अध्यक्षीय भाषणावरून साहित्य महामंडळ आणि संंमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यात कलगीतुरा रंगला होता. महामंडळाने जाणीवपूर्वक भाषण प्रसिद्ध होऊ दिले नाही, त्यातील वाटणारे आक्षेपार्ह मुद्दे वगळल, असा आरोप सबनीस यांनी महामंडळावर केला होता. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांचे भाषण एका प्रकाशकाच्या भूमिकेतून नजरेखालून घालणार का? याविषयी विचारले असता महामंडळाला भाषणात बदल करण्याचा कोणताही अधिकार नाही. राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, ती पूर्णपणे लेखकाची वैयक्तिक मते असतात. अध्यक्षाचे भाषण वेळेत महामंडळाकडे आले पाहिजे, या मताशी सहमत आहे. मात्र अध्यक्षाचे भाषण वाचूनच प्रकाशित केले पाहिजे. अथवा त्यातील काही विधाने वगळण्याचा कोणताच अधिकार महामंडळाला नाही. कारण संमेलनाध्यक्ष असणे, हा लेखकाचा सन्मान आहे. त्यांच्या अभिव्यक्तीवर गदा आणणे ही निषेधार्थ गोष्ट आहे. अध्यक्षाच्या लेखी भाषणातील काही विधानांबाबत मतभेद असू शकतात. मात्र त्यावरून महामंडळाने नाराज होण्याचे काही कारण नाही. सबंधित विधानाबाबत फारतर महामंडळ सहमत नसल्याची भूमिका जाहीरपणे घेऊ शकते, असेही जोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)