शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

माऊलींच्या पालखीस खांदेकऱ्यांची मर्यादा

By admin | Updated: June 26, 2016 04:37 IST

संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्यात प्रत्येक जण हिरीरीने सहभागी होत असतो. काही माऊलींबरोबर पंढरपूरपर्यंत जातात, तर काही प्रस्थान सोहळ्यात सेवा देऊन आपली माऊलींप्रती

आळंदी : संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्यात प्रत्येक जण हिरीरीने सहभागी होत असतो. काही माऊलींबरोबर पंढरपूरपर्यंत जातात, तर काही प्रस्थान सोहळ्यात सेवा देऊन आपली माऊलींप्रती श्रद्धा व्यक्त करतात. या सहभागात कोणत्याही प्रकारचा भेद होणार नसला, तरी सुरक्षेच्या कारणास्तव यंदाच्या वारीत सेवेकरीच्या संख्येत काही मर्यादा घालण्यात येणार आहे. पालखी प्रस्थानवेळी माऊलींची पालखी खांद्यावर मिरवत मंदिराबाहेर घेऊन येण्याचा मान मिळावा याकरिता इच्छुक असलेल्या स्थानिक तरुणांवर काही प्रमाणात निर्बंध येणार आहेत. आपल्या खांद्यावर पालखी घेऊन जाण्यासाठी आतुर असलेल्या तरुणांचा पोलीस प्रशासन व देवस्थानने घेतलेल्या निर्णयामुळे पुरता हिरमोड होणार आहे. त्याबाबत नुकत्याच घेण्यात आलेल्या खांदेकऱ्यांच्या बैठकीत हे स्पष्ट झाले आहे. या बैठकीत खांदेकऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले व ही संख्या १०० ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. ही संख्या कमी असल्याने उपस्थित खांदेकऱ्यांनी त्याला विरोध केला व संख्या वाढविण्याची मागणी केली असता प्रशासनाने ही खांदेकऱ्यांच्या मतांची कदर करत ही संख्या दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान ठेवली आहे. मात्र, ही संख्या अपुरी असून, यामुळे तरुणांचा हिरमोड होणार असल्याचे खांदेकऱ्यांचे मत आहे. माऊलींच्या पालखीला खांदा देऊन ती पालखी नाचवत मंदिराबाहेर काढत संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा घालण्याचे काम हे खांदेकऱ्यांकडे असते, हे अधिकृत पद नसले तरी पालखीला खांदा देणारी म्हणून खांदेकरी अशी या वेळी मुलांची ओळख केली जाते. या खांदेकऱ्यांसाठी प्रशासनाने पासेस उपलब्ध करून दिले असून, या पासेसशिवाय त्यांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (वार्ताहर) माऊलींच्या मंदिरास चारही बाजंूनी दिंड्यांचा वळसा असतो. या दिंड्या पालखीपुढे २० व मागे २७ अशा संख्येने उभ्या असतात. यातील वारकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यात खांदेकऱ्यांची संख्या मर्यादित न केल्यास खांदेकरी म्हणून असंख्य स्थानिक तरुण मंदिरात दाखल होतात. यामुळे अगोदरच झालेल्या गर्दीत भरच पडते. यामुळेच यंदापासून ही संख्या मर्यादित करण्यात आल्याचे आळंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.