शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

माऊलींच्या पालखीस खांदेकऱ्यांची मर्यादा

By admin | Updated: June 26, 2016 04:37 IST

संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्यात प्रत्येक जण हिरीरीने सहभागी होत असतो. काही माऊलींबरोबर पंढरपूरपर्यंत जातात, तर काही प्रस्थान सोहळ्यात सेवा देऊन आपली माऊलींप्रती

आळंदी : संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्यात प्रत्येक जण हिरीरीने सहभागी होत असतो. काही माऊलींबरोबर पंढरपूरपर्यंत जातात, तर काही प्रस्थान सोहळ्यात सेवा देऊन आपली माऊलींप्रती श्रद्धा व्यक्त करतात. या सहभागात कोणत्याही प्रकारचा भेद होणार नसला, तरी सुरक्षेच्या कारणास्तव यंदाच्या वारीत सेवेकरीच्या संख्येत काही मर्यादा घालण्यात येणार आहे. पालखी प्रस्थानवेळी माऊलींची पालखी खांद्यावर मिरवत मंदिराबाहेर घेऊन येण्याचा मान मिळावा याकरिता इच्छुक असलेल्या स्थानिक तरुणांवर काही प्रमाणात निर्बंध येणार आहेत. आपल्या खांद्यावर पालखी घेऊन जाण्यासाठी आतुर असलेल्या तरुणांचा पोलीस प्रशासन व देवस्थानने घेतलेल्या निर्णयामुळे पुरता हिरमोड होणार आहे. त्याबाबत नुकत्याच घेण्यात आलेल्या खांदेकऱ्यांच्या बैठकीत हे स्पष्ट झाले आहे. या बैठकीत खांदेकऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले व ही संख्या १०० ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. ही संख्या कमी असल्याने उपस्थित खांदेकऱ्यांनी त्याला विरोध केला व संख्या वाढविण्याची मागणी केली असता प्रशासनाने ही खांदेकऱ्यांच्या मतांची कदर करत ही संख्या दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान ठेवली आहे. मात्र, ही संख्या अपुरी असून, यामुळे तरुणांचा हिरमोड होणार असल्याचे खांदेकऱ्यांचे मत आहे. माऊलींच्या पालखीला खांदा देऊन ती पालखी नाचवत मंदिराबाहेर काढत संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा घालण्याचे काम हे खांदेकऱ्यांकडे असते, हे अधिकृत पद नसले तरी पालखीला खांदा देणारी म्हणून खांदेकरी अशी या वेळी मुलांची ओळख केली जाते. या खांदेकऱ्यांसाठी प्रशासनाने पासेस उपलब्ध करून दिले असून, या पासेसशिवाय त्यांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (वार्ताहर) माऊलींच्या मंदिरास चारही बाजंूनी दिंड्यांचा वळसा असतो. या दिंड्या पालखीपुढे २० व मागे २७ अशा संख्येने उभ्या असतात. यातील वारकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यात खांदेकऱ्यांची संख्या मर्यादित न केल्यास खांदेकरी म्हणून असंख्य स्थानिक तरुण मंदिरात दाखल होतात. यामुळे अगोदरच झालेल्या गर्दीत भरच पडते. यामुळेच यंदापासून ही संख्या मर्यादित करण्यात आल्याचे आळंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.