शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘चार’ गुणांसाठी आयुष्य संपविले...

By admin | Updated: June 1, 2017 03:56 IST

‘आई, बाबा सॉरी’ असे म्हणत, अवघ्या ‘चार’ गुणांमुळे बारावीत नापास झालेल्या विद्यार्थिनीने आयुष्यच संपविल्याची दु:खद घटना मंगळवारी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘आई, बाबा सॉरी’ असे म्हणत, अवघ्या ‘चार’ गुणांमुळे बारावीत नापास झालेल्या विद्यार्थिनीने आयुष्यच संपविल्याची दु:खद घटना मंगळवारी सायन परिसरात घडली. दीप्ती दीपक मोरे, असे तिचे नाव होते. तिला दहावीत ८६ टक्के मिळाले होते. बारावीत चार गुण कमी पडले म्हणून ती नापास झाली. याच नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. याप्रकरणी वडाळा टी.टी. पोलीस अधिक तपास करत आहेत.सायन येथील पंचशीलनगर झोपडपट्टीत दीप्ती आई, बाबा, भाऊ आणि बहिणीसोबत राहायची. बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही दीप्तीने अभ्यासावर अथक मेहनत घेऊन, दहावीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळविले. त्यानंतर तिने सिद्धार्थ कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. मात्र, अवघ्या चार गुणांमुळे ती नापास झाल्याचे तिला समजले. हे ऐकूण कुटुंबीयांसह तिलाही धक्का बसला. खरंतर तिला जास्त गुणांची अपेक्षा होती. नापास झाल्यामुळे तिने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ दीप्तीच्या खोलीतून आवाज येत नसल्याने कुटुंबीय तेथे गेले. त्या वेळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला सायन रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वडाळा टी.टी. पोलीस तेथे दाखल झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाइड नोटही ताब्यात घेतली आहे. त्यात, ‘नापास झाल्यामुळे आत्महत्या करत असून, यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये,’ असे तिने म्हटले आहे. शिवाय, ‘आई, बाबा सॉरी’ असेही नमूद केले आहे. हुशार, तसेच सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या दीप्तीने आत्महत्या केल्यामुळे मोरे कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनाही मोठा धक्का बसला आहे.