शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

‘चार’ गुणांसाठी आयुष्य संपविले...

By admin | Updated: June 1, 2017 03:56 IST

‘आई, बाबा सॉरी’ असे म्हणत, अवघ्या ‘चार’ गुणांमुळे बारावीत नापास झालेल्या विद्यार्थिनीने आयुष्यच संपविल्याची दु:खद घटना मंगळवारी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘आई, बाबा सॉरी’ असे म्हणत, अवघ्या ‘चार’ गुणांमुळे बारावीत नापास झालेल्या विद्यार्थिनीने आयुष्यच संपविल्याची दु:खद घटना मंगळवारी सायन परिसरात घडली. दीप्ती दीपक मोरे, असे तिचे नाव होते. तिला दहावीत ८६ टक्के मिळाले होते. बारावीत चार गुण कमी पडले म्हणून ती नापास झाली. याच नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. याप्रकरणी वडाळा टी.टी. पोलीस अधिक तपास करत आहेत.सायन येथील पंचशीलनगर झोपडपट्टीत दीप्ती आई, बाबा, भाऊ आणि बहिणीसोबत राहायची. बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही दीप्तीने अभ्यासावर अथक मेहनत घेऊन, दहावीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळविले. त्यानंतर तिने सिद्धार्थ कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. मात्र, अवघ्या चार गुणांमुळे ती नापास झाल्याचे तिला समजले. हे ऐकूण कुटुंबीयांसह तिलाही धक्का बसला. खरंतर तिला जास्त गुणांची अपेक्षा होती. नापास झाल्यामुळे तिने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ दीप्तीच्या खोलीतून आवाज येत नसल्याने कुटुंबीय तेथे गेले. त्या वेळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला सायन रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वडाळा टी.टी. पोलीस तेथे दाखल झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाइड नोटही ताब्यात घेतली आहे. त्यात, ‘नापास झाल्यामुळे आत्महत्या करत असून, यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये,’ असे तिने म्हटले आहे. शिवाय, ‘आई, बाबा सॉरी’ असेही नमूद केले आहे. हुशार, तसेच सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या दीप्तीने आत्महत्या केल्यामुळे मोरे कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनाही मोठा धक्का बसला आहे.