शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

‘लाटलेले’ पैैसे शिक्षक परत करेनात

By admin | Updated: June 29, 2017 03:35 IST

आंबेगाव तालुक्यातील ८२ शिक्षकांनी आदिवासी भागात राहत असल्याचा बनाव करत लाटलेले एकस्तरचे वेतन वसुलीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कतळेघर : आंबेगाव तालुक्यातील ८२ शिक्षकांनी आदिवासी भागात राहत असल्याचा बनाव करत लाटलेले एकस्तरचे वेतन वसुलीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, या आदेशाला संबंधित शिक्षकांकडून केराची टोपली दाखवली आहे. ‘लोकमत’ने या विषयाला वाचा फोडली होती. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात राहून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांना त्यांच्या कामामध्ये काम करताना प्रोत्साहन मिळावे म्हणून, शासनाने प्रोत्साहनपर भत्ता म्हणजेच एकस्तर वेतनश्रेणी लाभ देण्याचे ठरविले. मात्र शिक्षकांनी ग्रामसेवक, केंद्रप्रमुख यांना हाताशी धरून कामाच्या ठिकाणी राहत असल्याबाबतची खोटी प्रमाणपत्रे शासनाकडे सादर केली. या वेतनश्रेणीचा आर्थिक लाभ घेतला. या विषयाला ‘लोकमत’ने प्रथम वाचा फोडली. १ जून रोजी ‘एकस्तरचे वेतन लाटले’ असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. जिल्हा परिषद प्रशासनही या वृत्ताने जागे होत, शिक्षण अधिकारी (प्राथमिक) डॉ. मुश्ताक शेख यांनी आदेश काढून लाभ घेतलेल्या शिक्षकांचा व उर्वरित मागणी करणाऱ्या शिक्षकांचा सविस्तर अहवाल मागविला. याबाबतची सविस्तर चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी दाल्ौत देसाई व शेख यांनी गटशिक्षणाधिकारी यांना लेखी आदेश देऊन सर्व रक्कम वसूल करण्यास सांगितली. रक्कम न भरल्यास संबंधित शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु अजूनपर्यंत एकाही शिक्षकाने रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा न करता संबंधित शिक्षकांनी या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.आंबेगाव तालुक्यातील ८२ शिक्षकांनी आदिवासी भागात राहत असल्याचा बनाव करत शासनाचा प्रोत्साहनपर भत्ता म्हणजेच एकस्तर वेतनश्रेणी लाभ घेत शासनाचे १ कोटी ६२ लाख ५२ हजार ३०७ रुपये रक्कम घेतली आहे. ही रक्कम एकरकमी शासनाकडे पुन्हा जमा करावी व दिलेल्या मुदतीत रक्कम न भरल्याने वरिष्ठांनी आदेशाचे पालन न केल्याचे दिसून आल्याने आपणाविरुद्ध प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई करण्यार येणार असल्याचा असा आदेश आंबेगाव तालुका गटशिक्षणाधिकारी पोपट महाजन यांनी दिला. यावर संमंधित शिक्षकांनी कोणतेही कारण न सांगता एकरकमी परत शासनाला करणार असल्याचे हमीपत्र दिले आहे.