शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातून पत्रे गायब?

By admin | Updated: October 15, 2015 01:07 IST

विद्यापीठाच्या परिक्षेत्र विद्याशाखांच्या अधिष्ठात्याकडून देण्यात येणाऱ्या बेकायदेशीर ‘डिन्स ग्रेस’ मार्कासंदर्भात सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्याकडे तक्रार दाखल केल्यावर

पुणे : विद्यापीठाच्या परिक्षेत्र विद्याशाखांच्या अधिष्ठात्याकडून देण्यात येणाऱ्या बेकायदेशीर ‘डिन्स ग्रेस’ मार्कासंदर्भात सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्याकडे तक्रार दाखल केल्यावर शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे याबाबतचा सविस्तर व वस्तुनिष्ठ अहवाल मागिवला होता. माहिती अधिकारात या अहवालाची प्रत मिळावी, अशी विचारणा केल्यानंतर विद्यापीठाने आपल्याला शासनाचे पत्रच मिळाले नसल्याचे उत्तर दिले आहे. त्यामुळे मंत्रालयातून आलेली पत्रे विद्यापीठातून गायब कशी होतात, असा प्रश्न सजग नागरिक मंचाने उपस्थित केला आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान काही गुणांनी होऊ नये, यासाठी ग्रेस मार्क देण्याबाबतचा नियम आहे. हा नियम विद्यापीठ अध्यादेश १ ते ४ मध्ये विस्ताराने नमूद आहे. या अध्यादेशाप्रमाणे विद्यार्थ्याला परीक्षेत जास्तीत जास्त १० गुण अथवा त्याने मिळविलेल्या एकूण गुणांच्या १ टक्के गुण यापैकी जे कमी असतील तेवढेच ग्रेस मार्क मिळू शकतात. मात्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठात अनेक वर्षांपासून विद्याशाखेच्या अधिष्ठाते त्यांच्या इच्छेनुसार २ ते १५ मार्क वाढवतात. याला डिन्स ग्रेस या नावाने ओळखले जाते. ही पद्धत मनमानी व बेकायदेशीर असल्याने सजग नागरिक मंचाने याविरुद्ध मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यासंदर्भातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १२ आॅगस्ट २०१५ रोजी विद्यापीठाकडे सविस्तर व वस्तुनिष्ठ अहवाल आठ दिवसांत पाठविण्याचे पत्र पाठविले होते. अहवाल न मिळाल्याने शासनाने १० सप्टेंबर रोजी स्मरणपत्रही पाठविले. या दोन्ही पत्रांच्या प्रती सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर व प्रा. अतुल बागुल यांच्याकडे आहेत. या पत्रांच्या अनुषंगाने वेलणकर यांनी विद्यापीठाकडे डिन्स ग्रेस संदर्भातील शासनाला सादर केलेला अहवाल माहिती अधिकारात मागितला. यावर विद्यापीठाने शासनाची पत्रे कुलसचिव कार्यालयात व परीक्षा विभागाकडे प्राप्त झाल्याची नोंद नसल्याचे उत्तर पाठविले. यावरून मंत्रालयातून आलेली पत्रे विद्यापीठातून गायब झालेल्या पत्रांची व एकूण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.