शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

चला, गाव पाणीदार करू या !

By admin | Updated: April 10, 2017 02:06 IST

सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली असून

जेजुरी : सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली असून, पुरंदर तालुक्यात चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. साकुर्डे (ता. पुरंदर) येथे सुमारे दोनशे ग्रामस्थांनी श्रमदानाचा शुभारंभ करीत गाव पाणीदार करण्याचा निश्चय केला आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे निवडलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि पुरंदर हे दोन तालुके स्पर्धेसाठी निवडलेले आहेत. पुरंदर तालुक्यातील अनेक गावे या स्पर्धेत सहभागी झालेली आहेत. दुष्काळमुक्त गाव करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन करण्यात आले असून, यात लोकसहभागाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. राज्यात प्रथम येणाऱ्या गावाला ५० लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या गावांसाठी अनुक्रमे ३० लाख व २० लाखांचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यात प्रथम येणाऱ्या गावासाठी १० लाखांचे बक्षीस असून, या स्पर्धेत पुरंदर तालुक्यातील एकूण ३३ गावांनी सहभाग घेतला आहे. शनिवारपासून २० गावांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याची माहिती पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक सुरेश सस्ते यांनी सांगितली. पाणी फाउंंडेशनचे पुरंदरचे समन्वयक सुरेश सस्ते यांच्या उपस्थितीत श्रमदानाला सुरुवात केली. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती नीलेश जगताप, खरेदी-विक्री संघाचे संचालक संग्राम सस्ते, सरपंच तृप्ती जगताप, माजी सरपंच माईसाहेब सस्ते, सदस्या सविता जगताप, सदस्य सचिन थोपटे, माजी उपसरपंच राजेंद्र सस्ते, सदाशिव सस्ते, सुरेशनना सस्ते, वामन सस्ते, राजेंद्र जाधव, पोपट जगताप, किसन देशमुख एकनाथ सस्ते आदी उपस्थित होते. गावातील मतभेद, हेवेदावे, राजकारण बाजूला ठेवून आम्ही सर्वजण एक दिलाने गाव पाणीदार बनवू, अशी प्रतिज्ञा यावेळी ग्रामस्थांनी घेतली. संपूर्ण तालुक्यात साधारणपणे २००० जणांनी श्रमदानास सुरुवात केली आहे. आज ३००० ग्रामस्थांचा सहभाग दिसला. येत्या आठवडाभरात संपूर्ण तालुक्यात २५ हजारांवर लोकांचा गावा-गावांतून सहभाग दिसेल.  दररोज श्रमदानाला प्रतिसाद वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. यात साकुर्डे येथील ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदवला.  पहिल्या दिवशी दोनशे ग्रामस्थांनी सहभाग घेतला, तर आज सुमारे सुमारे चारशे ग्रामस्थांनी हजेरी लावली. यात महिलांचा सहभाग मोठा होता.