शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

चला, गाव पाणीदार करू या !

By admin | Updated: April 10, 2017 02:06 IST

सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली असून

जेजुरी : सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली असून, पुरंदर तालुक्यात चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. साकुर्डे (ता. पुरंदर) येथे सुमारे दोनशे ग्रामस्थांनी श्रमदानाचा शुभारंभ करीत गाव पाणीदार करण्याचा निश्चय केला आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे निवडलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि पुरंदर हे दोन तालुके स्पर्धेसाठी निवडलेले आहेत. पुरंदर तालुक्यातील अनेक गावे या स्पर्धेत सहभागी झालेली आहेत. दुष्काळमुक्त गाव करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन करण्यात आले असून, यात लोकसहभागाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. राज्यात प्रथम येणाऱ्या गावाला ५० लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या गावांसाठी अनुक्रमे ३० लाख व २० लाखांचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यात प्रथम येणाऱ्या गावासाठी १० लाखांचे बक्षीस असून, या स्पर्धेत पुरंदर तालुक्यातील एकूण ३३ गावांनी सहभाग घेतला आहे. शनिवारपासून २० गावांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याची माहिती पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक सुरेश सस्ते यांनी सांगितली. पाणी फाउंंडेशनचे पुरंदरचे समन्वयक सुरेश सस्ते यांच्या उपस्थितीत श्रमदानाला सुरुवात केली. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती नीलेश जगताप, खरेदी-विक्री संघाचे संचालक संग्राम सस्ते, सरपंच तृप्ती जगताप, माजी सरपंच माईसाहेब सस्ते, सदस्या सविता जगताप, सदस्य सचिन थोपटे, माजी उपसरपंच राजेंद्र सस्ते, सदाशिव सस्ते, सुरेशनना सस्ते, वामन सस्ते, राजेंद्र जाधव, पोपट जगताप, किसन देशमुख एकनाथ सस्ते आदी उपस्थित होते. गावातील मतभेद, हेवेदावे, राजकारण बाजूला ठेवून आम्ही सर्वजण एक दिलाने गाव पाणीदार बनवू, अशी प्रतिज्ञा यावेळी ग्रामस्थांनी घेतली. संपूर्ण तालुक्यात साधारणपणे २००० जणांनी श्रमदानास सुरुवात केली आहे. आज ३००० ग्रामस्थांचा सहभाग दिसला. येत्या आठवडाभरात संपूर्ण तालुक्यात २५ हजारांवर लोकांचा गावा-गावांतून सहभाग दिसेल.  दररोज श्रमदानाला प्रतिसाद वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. यात साकुर्डे येथील ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदवला.  पहिल्या दिवशी दोनशे ग्रामस्थांनी सहभाग घेतला, तर आज सुमारे सुमारे चारशे ग्रामस्थांनी हजेरी लावली. यात महिलांचा सहभाग मोठा होता.