शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीचा लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदीसारखे कडक पाऊल उचलले असले, तरी त्याची अंमलबजावणी करताना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदीसारखे कडक पाऊल उचलले असले, तरी त्याची अंमलबजावणी करताना नागरिकांना त्याचा कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये, याविषयीच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. या बाबीकडे पोलीस अधिक संवेदनशीलतेने पाहणार आहेत. महापालिकेच्या आदेशात जोपर्यंत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत कोणाचीही अडवणूक करण्यात येणार नाही, असे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

पुणे शहरात शनिवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, त्याविषयी महापालिकेच्या आदेशात पुरेशी स्पष्टता दिसून येत नाही. सायंकाळी ६ ते सकाळी ६ याकाळात बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांनी नेमके काय करायचे, त्याचबरोबर पुण्यातून बाहेर जाणाऱ्र्यांनी काय करायचे. याविषयी स्पष्टता नसल्याने लोकांचा गोंधळ उडाला आहे. बाहेर गावाहून येणाऱ्र्यांना घरी जाण्यासाठी वाहन मिळेल का, त्यांना घेऊन येण्यासाठी जर कोणी घरातून बाहेर पडला तर त्याला अडविणार का असे असंख्य प्रश्न पुणेकरांच्या मनात महापालिकेच्या आदेशाने निर्माण झाले आहेत.

याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, शहरात ज्या वेगाने शहरात कोरोनाचा प्रसार होतोय, तो रोखण्यासाठी, त्याला अटकाव घालण्यासाठी संचारबंदीचा पर्याय निवडला आहे. आज पहिल्या दिवशी बहुतांश पुणेकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. बहुतांश दुकाने, व्यापारी पेठा सायंकाळी ६ वाजण्याच्या आत बंद झाल्या.

पोलिसांनी सायंकाळी ४ वाजल्यापासूनच संचारबंदीबाबत पोलीस व्हॅनवरील पी ए सिस्टिमद्वारे अनाऊसमेंट करायला सुरुवात केली होती. तसेच शहरातील ९६ महत्वाच्या चौकात बॅरिकेड लावून नाकाबंदी सुरु केली आहे.

या संचारबंदीचा उद्देश विफल करणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना संचारबंदीची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची, याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामावरुन घरी परत जाणाऱ्यांची कोणतीही अडवणूक करण्यात येणार नाही़ मात्र, त्याने स्वत: जवळ योग्य ओळखपत्र, जेथे काम करतात, त्या ठिकाणचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे.

हॉटेल, रेस्ट्रॉरंट बंद असल्याने एकत्र येण्याचे प्रमाण सायंकाळी सहानंतर कमी असणार आहे. तातडीच्या कामासाठी लोकांना बाहेर पडायला परवानगी देण्यात येणार असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले.

मेट्रो, बांधकाम साईटवर अनेक असंघटित मजूर, कामगार काम करीत असतात, त्यांनी आपल्या कामगारांना पत्र द्यावे, असे आवाहन आम्ही केले आहे. तसेच आज पहिलाच दिवस असल्याने लोकांना समजावून सांगणे, जनजागृती करणे यावर भर देण्यात येणार असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले.

......

सायंकाळी ६ नंतर बाहेर पडायचे असेल तर हे जवळ बाळगा

* अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जवळ बाळगा.

* रुग्णालयात जायचे असेल, रुग्णाला भेटायचे असेल तर त्याच्याशी संबंधित कागदपत्र, डॉक्टरांचे, हॉस्पिटलचे पत्र जवळ ठेवा

* बाहेरगावी जायचे असेल तर संबंधित गाडीचे तिकीट जवळ बाळगा.

* कामावरुन उशिरा घरी जावे लागणार असेल तर जेथे काम करता त्या ठिकाणचे ओळख पत्र, कंपनीचे उशिरापर्यंत कामावर थांबावे लागत असल्याचे पत्र जवळ ठेवा.

* पत्र नसेल तर वरिष्ठांचा व्हॉटसअ‍ॅप मेसेज चौकशी केली तर दाखवा.

* जवळच्या गावातून कामानंतर घरी परत येत असाल, तसे कंपनीचे पत्र जवळ बाळगा.

..........

प्रसंगी पोलीस वाहनांनी घरी पोहोचवू

संचारबंदी काळात वैध कारणासाठी लोकांना बाहेर पडायला परवानगी देण्यात येणार आहे. अगदीच कोणाची अडचण असेल तर प्रसंगी पोलीस वाहनांमधून त्यांना योग्य त्या ठिकाणी पोहचवले जाईल. मात्र, कोणाची अडचण होऊ देणार नाही, अशी ग्वाही डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.