शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

चला भीमा नदीला प्रदूषणापासूून वाचवू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:11 IST

सह्याद्री पर्वतांमधून महाराष्ट्राची भूमी सुजलाम् सुफलाम् करणारी अमृतवाहिनी भीमानदी बाहेर पडली आहे. भीमाशंकर येथून उगम पावलेली ही नदी कृष्णेपर्यंत वाहात जाते. मात्र तिला ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा झाल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभीमाशंकर : सह्याद्री पर्वतांमधून महाराष्ट्राची भूमी सुजलाम् सुफलाम् करणारी अमृतवाहिनी भीमानदी बाहेर पडली आहे. भीमाशंकर येथून उगम पावलेली ही नदी कृष्णेपर्यंत वाहात जाते. मात्र तिला ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा झाल्याचे वास्तव आहे. भविष्यात या प्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम जाणवणार असून नदीकाठच्या लोकांना जलसाक्षर करण्यासाठी जल बिरादरीच्या पुढाकाराने सोमवारपासून भीमाशंकर येथून जलसाक्षरता मोहीम सुरू होणार आहे. त्यानिमित्त पर्यावरणतज्ज्ञांनी चला भीमेला प्रदूषणापासून वाचवूया, असे आवाहन केले आहे.या नदीवरील अतिक्रमणं, शोषण आणि प्रदूषण यातुन तिला मुक्त करण्यासाठी तसेच पुढच्या पिढीची आणि सामान्य माणसांची नदीप्रती जबाबदारी निश्चित व्हावी, या दृष्टीने ‘नमामी चंद्रभागा जलसाक्षरता यात्रा’ सुरू होत आहे.ही नदी प्राचीन असून तिच्या साक्षीने इतिहास घडला, लोकसंस्कृती फुलली, राजकारण रंगले. मात्र आज या भीमेचे स्वरूप पूर्वीसारखे राहिले नाही. भीमाशंकरमधून उगम पावलेल्या या नदीचे रूपडे राजगुरुनगरपासून बदलत गेले आहे. मुळा, मुठा नद्यांतून येणाºया दूषित पाण्यामूळे निरभ्र स्वच्छ दिसणारे पाणी काळे होत चालले आहे, पूर्ण विळखा दिला आहे. खराब पाण्यामुळे मासे टिकत नाही, नुसते अस्वच्छ व घाण पाण्याने नदी दूषित झाली आहे.उजनीमध्ये भीमा कमालीची अस्वच्छ व प्रदूषित झाली आहे. अनेक उद्योगधद्यांचे खराब पाणी भीमेत सोडले जाते. तसेच शेतीसाठी पाण्याच्या अतिरिक्त उपसा होत असतो. वाळूउपाशाचा मोठा फटका भीमेला बसला आहे. नदीचे पात्रच बदलले आहे. धोक्याच्या बाहेर गेलेल्या भीमा नदीला वाचविण्यासाठी ही यात्रा काढली आहे. जल बिरादरीने काश्मीर ते कन्याकुमारी या कार्यक्षेत्रात १०१ ठिकाणी नदीसंवाद, जलसाक्षरता यात्रा आयोजित केल्या होत्या. विजापूर येथे देशभरातून निघालेल्या १०१ यात्रांचे समायोजन होणार असून तेथे दि. १६ ते १८ आॅगस्ट २०१७ कालावधीत डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय जल संमेलन होणार असल्याचे जल बिरादरीच्या वतीने सांगण्यात आले.या यात्रेचा शुभारंभ आज भीमाशंकर येथून सकाळी १० वाजता होत असून या दरम्यान नमामी चंद्रभागा उपक्रमाच्या कृती नियोजनाबाबत लोकसंवाद, विद्यार्थी संवाद, संत वारकारी संप्रदाय प्रतिनिधींशी चर्चा असे कार्यक्रम होणार आहेत. ८ आॅगस्ट रोजी मंचर, राजगुरूनगर, ९ रोजी देहू, आळंदी , १० रोजी पुणे, ११ रोजी यवत, केडगाव, पाटस व दौंड, १२ रोजी कुरकुंभ, भिगवण, पळसदेव, रांजणी, अकोले, नीरा नरसिंहपूर, १३ रोजी पंढरपूर, दि.१४ रोजी सोलापूर येथे यात्रा पोहचणार असल्याचे पुणे वन्यजीव विभागाच्या सहायक वनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे यांनी सांगितले.काय आहे भीमा नदीचा इतिहास?सध्या भीमाशंकर मंदिराकडे जाताना पायºयांपासून डाव्या बाजुला उंच टेकडीवर एक मंदिर व मंदिराच्या बाजुला कुंड आहे. या कुंडाला भीमकुंड म्हणतात. हे कुंड पुरूषभर खोल असून त्यामध्ये जिवंत पाझर आहे. याच ठिकाणी भीमेचा मूळ उगम आहे.भीमाशंकरमधून निघालेल्या भीमेच्या प्रवाहाला अनेक लहान मोठे ओढे, नद्या मिळतात व हळुहळू भीमेचे पात्र मोठे होत जाते. पुण्यापासून ईशान्य दिशेला तुळापूर या ठिकाणी देहू आळंदीच्या संतभूमीतून आलेली इंद्रायणी भीमेला मिळते. भीमेच्या तेजस्वी पाण्यावर चासकमान, उजनीसारखी मोठी धरणे झाली आहेत. या पाण्याने लाखो हेक्टर शेती आज ओलीता खाली आली आहे.