शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
5
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
6
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
7
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
8
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
9
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
10
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
11
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
12
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
13
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
14
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
15
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
16
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
17
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
18
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
19
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
20
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...

दाखला हवाय.. शाळेची सायकल परत द्या

By admin | Updated: June 28, 2015 00:35 IST

साहित्य खरेदीतील गैरव्यवहार, आजी-माजी अध्यक्षांचे लाचखोरी प्रकरण या मुळे महापालिकेचे शिक्षण मंडळ चर्चेत असतानाच; आता पालिकेची शाळा

पुणे : साहित्य खरेदीतील गैरव्यवहार, आजी-माजी अध्यक्षांचे लाचखोरी प्रकरण या मुळे महापालिकेचे शिक्षण मंडळ चर्चेत असतानाच; आता पालिकेची शाळा सोडून इतर खासगी शाळेत प्रवेश घेतला म्हणून, विद्यार्थिनीला देण्यात आलेली सायकल परत मागण्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या वडगावशेरी येथील आनंदॠषी शाळेत घडला आहे. विशेष म्हणजे या सायकली राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने वाटलेल्या असल्याने त्याचा शाळेशी काहीही संबंध नसताना , शाळेकडून या विद्यार्थिनीला दाखला देण्यासाठी सायकल परत मागण्यात आली. शिवानी संतोष देवदास असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.शिवानी ही वडगावशेरीतील राष्ट्रसंत आचार्य आनंदॠषीजी महाराज प्राथमिक विद्यालयात शिक्षण घेत होती. या वर्षी ती चांगल्या गुणांनी सातवी पास झाल्याने तसेच या शाळेत आठवीचे वर्ग नसल्याने, तिचे वडील संतोष देवदास यांनी शिवानीचे नाव याच परिसरात असलेल्या लोणकर माध्यमिक विद्यालयात घातले. दरम्यान, शाळा सुरू होण्याच्या दिवशी म्हणजे, १५ जून रोजी शिवानीच्या वर्गशिक्षिकांचा फोन तिच्या वडिलांना आला. तुमच्या मुलीचे शैक्षणिक साहित्य द्यायचे असल्याने तिला शाळेत घेऊन या,असे सांगण्यात आले. या वेळी संतोष यांनी शिवानीचा प्रवेश दुसऱ्या शाळेत घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर शाळेकडे तिच्या दाखल्याची मागणी केली. त्यानंतर आठ दिवसांनी शाळेकडून संतोष यांना फोन करून दाखला हवा असेल, तर आधी सायकल जमा करा, असे सांगत, तिच्या वडिलांनाच फैलावर घेतले. त्यानंतर देवदास यांनी मुख्याध्यापिकांशी संपर्क साधला असता, देवदास यांचीच कानउघाडणी करण्यात आली. त्यामुळे शिवानीच्या पालकांना धक्काच बसला.कोणाची सायकल... जोर कोणाचा ?राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्ताने शरद कला आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ७३ गुणवंतांना या सायकली वाटण्यात आल्या होत्या. त्यात एक सायकल शिवानीलाही मिळालेली होती. त्यामुळे खासगी संस्थेकडून मिळालेली सायकल शिक्षण मंडळ कसे मागते, याबाबत शिवानीच्या पालकांनाही धक्का बसला. ही सायकल मिळून दोन वर्षे झाली असताना, ती आता दाखल्यासाठी का परत मागत आहेत. या प्रश्नाने शिवानीचे पालकही चक्रावून गेले होते. शाळांचा पट वाढविण्यासाठी उद्योग ?-शिवानीची सायकल परत मागण्यामागे शाळेचा पट वाढविण्याचा प्रकार असल्याचे यावरून निदर्शनास येत आहे. या शाळेत मुलांची संख्या कमी असतानाही, लोक प्रतिनिधींच्या आग्रहास्तव या शैक्षणिक वर्षापासून या शाळेत आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र, आता त्यासाठी विद्यार्थी संख्या कमी आहे. त्यामुळे शाळेतून सातवीचे विद्यार्थी बाहेर न जाताच आपल्याच शाळेत असावेत, यासाठी शिक्षकांची तसेच मुख्याध्यापकांची धडपड सुरू आहे. त्यामुळे पालकांना अथवा विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या धमक्या देऊन अथवा त्यांना बळजबरीने आपल्या मुलांना याच शाळेत ठेवावे यासाठी बळजबरी केली जात आहे. या शाळेत आठवीचे वर्ग नसल्याने आम्ही दुसऱ्या शाळेत शिवानीचा प्रवेश घेतला होता. मात्र, त्यासाठी सायकल परत मागणे चुकीचे आहे. ही सायकल शिक्षण मंडळाने दिलेली नाही. आम्ही शाळेकडे तक्रार केल्यानंतर अखेर शाळा दाखला देण्यास तयार झाली असून, हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही बाब कोणाशीही घडू नये.- संतोष देवदास (शिवानीचे पालक)