शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

" पुन्हा एकदा रंग असा चढू दे खेळाला..." - ऑक्सिजन लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

रंगभूमीवरच्या कलाकाराचं स्वप्नं असतं की,आपल्या कलेला मूर्तरूप प्राप्त होऊन तिला रसिकांसमोर सादर करण्याची संधी मिळावी. मग त्यात टीका असो ...

रंगभूमीवरच्या कलाकाराचं स्वप्नं असतं की,आपल्या कलेला मूर्तरूप प्राप्त होऊन तिला रसिकांसमोर सादर करण्याची संधी मिळावी. मग त्यात टीका असो वा कौतुक दोन्हीही त्याच्यासाठी फार महत्वाचा भाग असतो. रसिक वा परीक्षकांच्या टीकेला तो सकारात्मकरित्या घेऊन आणखी चांगलं देण्यासाठी प्रयत्न करतो तर कौतुकाने हुरळून न जाता कष्टाचं सार्थक झाल्याचा 'फील' फक्त घेतो. पण त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि उल्लेखनीय बाब म्हणजे कला रंगभूमीवर सादर होणं असते. पण कोरोनाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कला प्रांतातला मार्ग खडतर झाला आहे.

कोरोना संकटाचा औद्योगिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक यांसारख्या सर्वच क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाला आहे. त्याला सिनेमा किंवा नाट्य क्षेत्र देखील अपवाद ठरलेले नाही. या क्षेत्रातील निर्माता, तंत्रज्ञ, कलाकार अशाच सर्वच घटकांना कोरोनाचा जोरदार फटका बसला. काही कलाकारांवर तर अक्षरश: उपासमारीची वेळ आली. पण यातून सिनेमा किंवा मालिका क्षेत्र काही प्रमाणात सावरत असताना नाट्यक्षेत्र अन् रंगभूमी अद्यापही 'वेटिंग मोड'वरच आहे. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध स्पर्धांनाही 'खो' मिळाला आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाट्य व एकांकिका स्पर्धा करत असतात. या स्पर्धांच्या तयारीसाठी विद्यार्थी काही वर्ष, महिने दिवसरात्र जीव ओतून मेहनत घेत असतात. या स्पर्धांमध्ये आपलं सर्वोत्तम योगदान देण्याकडे तरुण कलाकारांचा कल असतो. या स्पर्धेत मिळणारा अनुभव या सर्व कलाकार मंडळींना समृद्ध करणारा असतो. या स्पर्धांच्या निमित्ताने प्रांत, भाषा,आशय, विषय, सादरीकरण यांच्या वैविध्यपुर्ण मांडणीने नटलेली हे प्रयोग असतात. कलाकारांच्या जीवनातील स्पर्धांमध्ये सादर होणारी ही नाटकं त्यांसाठी 'स्पेशल' असतात. मात्र,गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून 'रंगभूमी' कोरोनाच्या दुष्टचक्रात अडकल्यामुळे थोरामोठ्यांसह सर्वच कलाकारांना त्याची किंमत चुकवावी लागली आहे.पण यात मोठमोठ्या शहरांसह खेडोपाड्यातील होतकरू तरुण जास्त भरडले जात आहे. त्यांच्या आयुष्यातला अतिशय मौल्यवान टप्पा वाया गेला आहे. हा काळ त्यांच्या आयुष्यात परत येणार नाही. त्यामुळे होणारं नुकसान कसं भरून येईल हे सांगणं तसं कठीण आहे.

परंतू; कलाकार हा नेहमी आशावादी असतो. तो प्रत्येक संकटाला सकारात्मकरित्या घेतो आणि त्यातून मार्ग काढत पुढे वाटचाल करतो. जेव्हा कोरोनामुळे रंगभूमी कुलूपबंद झाली. तेव्हा कलाकारांनी ऑनलाईन पद्धतीने संहिता लेखनासाठीचा विषय, लेखन, वाचन, सराव यांद्वारे सर्जनशीलता संपणार नाही याची काळजी घेतली आहे. पण एक समाधानकारक बाब म्हणजे रंगभूमी व नाट्यचळवळ जिवंत ठेवण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर अशा मोठ्या शहरातीलच नव्हे तर गावोगावी कलाकार मंडळी प्रयत्नशील आहे. अनेक ज्येष्ठ मंडळींनी यात पुढाकार घेतला आहे. यामुळे कोरोना कालावधीत झालेलं तरुण कलाकाराचं नुकसान कदापि भरून येणं शक्य नसलं तरी ते कमी होण्यास हातभार मात्र नक्की लागणार आहे.

- दीपक कुलकर्णी-