शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सहलीला जाऊ शेतकऱ्याच्या गावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी पर्यटन धोरणासाठी चारशेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. पुणे व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी पर्यटन धोरणासाठी चारशेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. पुणे व अन्य काही जिल्ह्यांत त्यापैकी काही प्रकल्प सुरूही झाले आहेत.

सन २०२० मध्ये सरकारच्या पर्यटन विभागाने स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण जाहीर केले. त्या अंतर्गत काही अटी, नियमांसह सवलती जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार एक एकर क्षेत्रात या अटींचे पालन करून कोणीही शेतकरी पर्यटन केंद्र सुरू करू शकतो. त्याला बांधकाम परवानगी, बिगरशेती दाखल्याची गरज लागणार नाही. वार्षिक उलाढाल ४० लाखांपर्यंत गेल्यास त्यावर जीएसटी माफ, वीज बिल घरगुती दराने अशा सवलती मिळणार आहेत.

या योजनेसाठी जागेची प्रत्यक्ष पाहणी करून अटी, शर्ती पूर्ण होत असतील तरच परवानगी दिली जाते, असे राज्य पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले. कृषी पर्यटन केंद्र सुरू करणाऱ्यांना सरकारकडून अधिक सवलतींची अपेक्षा आहे. त्यात प्रामुख्याने निवास, भोजन, प्रत्यक्ष शेती या अटी शिथिल केल्या जाव्यात असे त्यांना वाटते. नव्याने केंद्र सुरू केले की लगेच उत्पन्न मिळत नाही, तरी व्यवस्थापनाचा खर्च करावाच लागतो. त्यामुळे सुरुवातीचा काही काळ तरी कर व अन्य आर्थिक बाबींमध्ये सवलत मिळावी, शक्य तर अनुदान मिळावे, असे काही केंद्र चालकांना वाटते.

चौकट

जागांची पाहणी सुरू

“या योजनेसाठी पहिल्याच वर्षात चारशे अर्ज आले. पुणे जिल्ह्यातून ८५ तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमधून मिळून १८० अर्ज आले. या अर्जांनुसार जागांची पाहणी सुरू असून आतापर्यंत १२० केंद्रे सुरू झाली.”

-सुप्रिया करमरकर, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, पुणे विभाग

चौकट

“स्वतंत्र कृषी धोरण ही चांगलीच गोष्ट आहे. काही अपेक्षित सवलतीही मिळाल्यात. यात अधिक लवचिकता, आर्थिक मदत किंवा सवलत असायला हवी. सुरुवातीच्या काळात त्याची गरज असते. विशेषतः अशा प्रत्येक केंद्राला कृषी पर्यटन म्हणून सरकारी स्तरावर प्रचार व प्रसार झाल्यास त्याचा चांगला उपयोग होईल.”

-मकरंद अनगळ, संचालक, गो एग्रो फार्म, कोलंबी, वेल्हे