शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

जातिभेदाच्या शृंखला गळून समतेचे राज्य यावे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:12 IST

पुणे : स्वराज्य म्हणजे सुराज्य. या देशात कुणी गरीब, पीडित राहाणार नाही. हे सगळं संपायला हवं, तरच सुराज्य आलं ...

पुणे : स्वराज्य म्हणजे सुराज्य. या देशात कुणी गरीब, पीडित राहाणार नाही. हे सगळं संपायला हवं, तरच सुराज्य आलं असे म्हणता येईल. पैशानेच सगळी कामे पार पडली जातात ही धारणा संपली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले, तसेच देशातून जातपात संपुष्टात आली पाहिजे. कोविड काळात विविध संस्था-संघटना आणि वैयक्तिक पातळीवर देखील अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. सर्वसामान्य व्यक्तीपासून ते उच्च पदस्थ व्यक्तीपर्यंत सर्वांचाच यात समावेश होता. या कठीण काळात दाखविलेल्या एकजुटीमुळेच आपण हे संकट परतावून लावू शकलो आहोत. अशाच एकजुटीच्या बळावर जातिभेदाच्या शृंखला गळून समतेचे राज्य प्रस्थापित व्हावे, असेही ते म्हणाले.

कोविड काळात जनतेला मदतीचा हात देणारे सेवाव्रती पुण्यातही अग्रेसर होते. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ युवा फौंडेशनतर्फे पुण्यातील अशाच काही सेवाव्रती व्यक्तींचा आणि संस्थांचा सत्कार भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड ( पीपीसीआर) संस्थेचे अध्यक्ष सुधीर मेहता, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, इस्कॉनच्या अन्नामृत फौंडेशनचे संजय भोसले, तसेच महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ, डॉ. संजीव वावरे आणि सिसलकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, जे निष्पाप आणि निष्कलंक आहेत ते समर्पण भावनेने सेवा देत असतात. हा सेवाभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये रूजविला. मोदी यांनी सदैव दुसऱ्यांचे दु:ख, वेदना जाणून घेत धोरणांची आखणी केली. त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या स्वच्छता, शौचालय, वीज, अशा मूलभूत समस्यांना हात घातला. ज्या नागरिकांनी पिढयान्पिढया बँकेची पायरी चढली नव्हती अशांचे जनधन योजने मार्फत बँकेशी संबंंध जोडून दिले.

गिरीश बापट यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. चार्टर्ड अकाऊंटंट राज देशमुख यांनी पुरस्कार्थींचा परिचय करून दिला. सुकुमार देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वाती देव यांनी ‘समाज मन भारावून टाकू’ हे प्रेरणा गीत सादर केले.

-----------------------------------