शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

फलोदे गावात महिला गिरवताहेत साक्षरतेचे धडे

By admin | Updated: April 23, 2017 04:11 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यातील फलोदे या आदिवासी गावामध्ये आठ-नऊ महिन्यांपासून गावातील निरक्षर महिला साक्षरतेचे धडे गिरवत आहे.

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यातील फलोदे या आदिवासी गावामध्ये आठ-नऊ महिन्यांपासून गावातील निरक्षर महिला साक्षरतेचे धडे गिरवत आहे. आदिवासी भागातील आपल्या निरक्षर भगिनींना निदान लिहिता-वाचता तरी यावे यासाठी शहीद राजगुरु ग्रंथालय, फलोदे यांनी पुढाकार घेऊन आदिवासी भागातील फलोदे या गावामध्ये साक्षरतेचे वर्ग सुरू केले आहेत. या गावातील महाविद्यालयीन युवती स्वयंस्फूर्तीने गावातील निरक्षर महिलांना ग्रामपंचायत कार्यालयात शिकवत आहेत. गावातील सुशिक्षित तरुण मुली या महिलांना वाचन, मुळाक्षरे यांची ओळख करून देणे, स्वत:ची स्वाक्षरी करण्यास शिकवतात. त्या नुसते लेखन वाचन शिकतात, असे नाही तर साक्षरता वर्गात त्या कायदा साक्षरता, आरोग्य साक्षरता, अंधश्रद्धा निर्मुलन, शासकीय योजनांची माहिती, आदिवासी उपाययोजना या बाबतची माहिती समजून घेत आहेत. या साक्षरता वर्गामध्ये ३५ ते ६५ या वयोगटातील ६० ते ७० महिला साक्षरतेचे धडे घेत आहेत.ग्रामपंचायत सरपंच अशोक पेकारी, उपसरपंच मंदा मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे सुरू आहे. रोटरी क्लब मंचर, रोटरी क्लब मेट्रो व राज्य साधन केंद्र, पुणे यांनी या उपक्रमास शैक्षणिक साहित्य देऊन सहकार्य केले आहे. या निरक्षर आदिवासी महिलांना यातून स्फूर्ती मिळावी, यासाठी या नवसाक्षर महिलांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मुख्याध्यापक रघुनाथ उतळे व मुंबई येथे पोलीस उपनिरिक्षक म्हणून कार्यरत असलेले वसंत आढारी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष भोकटे, देविका भोकटे, फलोदेचे सरपंच अशोक पेकारी, उपसरपंच मंदा मेमाणे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोडे व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी वर्षा मसळे इ. उपस्थित होते.