शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न

By admin | Updated: March 21, 2015 23:12 IST

काळवाडी (ता. जुन्नर) येथे विहिरीवरील मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बिबट्याने पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पिंपळवंडी : काळवाडी (ता. जुन्नर) येथे विहिरीवरील मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बिबट्याने पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी जिवाच्या आकांताने पळ काढल्यामुळे ते या हल्ल्यातून बचावले. ही घटना बुधवारी (दि. १९) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. बिबट्याने अनेक शेतकऱ्यांची पाळीव जनावरे फस्त केली आहेत. तसेच माणसांवरही हल्ले झाले आहेत. येथील शेतकरी विलास कोंडिभाऊ वामन हे काळवाडी उंब्रज रस्त्याने विहिरीवरील मोटार बंद करून येत असताना या रस्त्याच्या उजव्या बाजूने जात होते. अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या उसात दडून बसलेला बिबट्या वामन यांना दिसला. समोर बिबट्या दिसताच त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांनी मोठ्या धाडसाने आरडाओरडा करीत जिवाच्या आकांताने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, बिबट्याने हल्ला करण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. ते पुढे आणि पाच ते सात फूट अंतरावर बिबट्या त्यांचा पाठलाग करीत होता. त्यानंतर काही क्षणांतच त्यांनी तेथील एका घराजवळ आश्रय घेतला. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना सावरले.यापूर्वीही बिबट्याने दोघांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षत्र असल्यामुळे बिबट्यांची अन्न, पाणी आणि निवाऱ्याची गरज भागत आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. तालुक्यातील बहुतेक गावे बिबट्याप्रवण क्षेत्रात येतात. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे मानवाची सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. वनखात्याने तत्काळ पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.बिबट्याची दहशत, दोन शेळ्यांचा फडशा४न्हावरे : नागरगाव (ता. शिरूर) परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ४नागरगाव येथे दोन दिवसांत बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला. याचबरोबर, उसाच्या शेतामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे येथील शेतकरी बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली शेतात काम करीत आहेत. ४दोन महिन्यांपूर्वीच येथील एक विहिरीच्या पाण्यात पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आलेल्या वन कर्मचाऱ्यांना चकवा देऊन विहिरीतून बिबट्याने धूम ठोकली होती. दरम्यान, त्या वेळी बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आणलेले पिंजरे अद्याप धूळ खात पडले आहेत. किमान ते पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात लावण्यात यावेत, अशी मागणी वारंवार ग्रामस्थांनी करूनदेखील त्याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कुचराई होत असल्याचे उघड झाले आहे.