शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न

By admin | Updated: March 21, 2015 23:12 IST

काळवाडी (ता. जुन्नर) येथे विहिरीवरील मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बिबट्याने पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पिंपळवंडी : काळवाडी (ता. जुन्नर) येथे विहिरीवरील मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बिबट्याने पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी जिवाच्या आकांताने पळ काढल्यामुळे ते या हल्ल्यातून बचावले. ही घटना बुधवारी (दि. १९) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. बिबट्याने अनेक शेतकऱ्यांची पाळीव जनावरे फस्त केली आहेत. तसेच माणसांवरही हल्ले झाले आहेत. येथील शेतकरी विलास कोंडिभाऊ वामन हे काळवाडी उंब्रज रस्त्याने विहिरीवरील मोटार बंद करून येत असताना या रस्त्याच्या उजव्या बाजूने जात होते. अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या उसात दडून बसलेला बिबट्या वामन यांना दिसला. समोर बिबट्या दिसताच त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांनी मोठ्या धाडसाने आरडाओरडा करीत जिवाच्या आकांताने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, बिबट्याने हल्ला करण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. ते पुढे आणि पाच ते सात फूट अंतरावर बिबट्या त्यांचा पाठलाग करीत होता. त्यानंतर काही क्षणांतच त्यांनी तेथील एका घराजवळ आश्रय घेतला. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना सावरले.यापूर्वीही बिबट्याने दोघांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षत्र असल्यामुळे बिबट्यांची अन्न, पाणी आणि निवाऱ्याची गरज भागत आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. तालुक्यातील बहुतेक गावे बिबट्याप्रवण क्षेत्रात येतात. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे मानवाची सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. वनखात्याने तत्काळ पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.बिबट्याची दहशत, दोन शेळ्यांचा फडशा४न्हावरे : नागरगाव (ता. शिरूर) परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ४नागरगाव येथे दोन दिवसांत बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला. याचबरोबर, उसाच्या शेतामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे येथील शेतकरी बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली शेतात काम करीत आहेत. ४दोन महिन्यांपूर्वीच येथील एक विहिरीच्या पाण्यात पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आलेल्या वन कर्मचाऱ्यांना चकवा देऊन विहिरीतून बिबट्याने धूम ठोकली होती. दरम्यान, त्या वेळी बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आणलेले पिंजरे अद्याप धूळ खात पडले आहेत. किमान ते पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात लावण्यात यावेत, अशी मागणी वारंवार ग्रामस्थांनी करूनदेखील त्याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कुचराई होत असल्याचे उघड झाले आहे.