शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

काठापूरला बिबट्या जेरबंद

By admin | Updated: July 16, 2016 01:01 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बु. येथे अनेक जनावरांना फस्त करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर हजारो खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे औरंगाबादकर जाम कंटाळले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. या अंदाजपत्रकाला कडाडून विरोध दर्शविण्याचे काम मनपा पदाधिकाऱ्यांनी सुरू केले. कंत्राटदारांमार्फत पॅचवर्कचे काम करण्यापेक्षा मनपाने ३ कोटी रुपये खर्च करून स्वत:चा डांबर प्लँट उभारावा, असा आग्रह सुरू आहे. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनीही मनपाला स्वत:चा डांबर प्लँट उभारणे शक्य नसल्याचे जाहीर करून वादात आणखी तेल ओतले आहे.सहा महिन्यांपूर्वी प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपाने स्वत:चा डांबर प्लँट उभारावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मनपा अधिकारी प्रारंभापासूनच डांबर प्लँट उभारणे अशक्य असल्याचे सांगत आहेत. चार दिवसांपूर्वी महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी सांगितले की, पॅचवर्क करण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. निविदा काढून पाऊस थांबल्यावर ही कामे करण्यात येणार आहेत. महापौर त्र्यंबक तुपे आणि सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी कंत्राटदारांकडून पॅचवर्क नको म्हणून कडाडून विरोध केला. मनपाने स्वत:चा डांबर प्लँट सुरू करावा, अशी सूचना त्यांनी केली. शुक्रवारी पुन्हा महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापतींनी आयुक्तांना पत्र दिले. या पत्रात मनपाने स्वत:चा डांबर प्लँट त्वरित उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्लँटसाठी ३ कोटींची अर्थसंकल्पात तरतूदही आहे.मनपाला परवडणार नाही....सायंकाळी पत्रकारांशी बोलताना आयुक्त बकोरिया यांनी सांगितले की, डांबर प्लँट उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. संगणकीय पद्धतीचा प्लँट सांभाळण्यासाठी कर्मचारी, डांबर कुठे वापरले, साहित्य खरेदीच्या नोंदी ठेवणे हे सर्व काही करणे मनपाला परवडणारे नाही. कंत्राटदारांमार्फतच गुणवत्तेचे काम करून घेणे कधीही सोयीचे आहे. आयुक्तांकडून खरडपट्टीमागील महिन्यात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी रस्त्यांची कामे न करणाऱ्या कंत्राटदारांची यादी तयार करा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. मागील पंधरा दिवसांमध्ये अधिकाऱ्यांनी यादीच तयार केली नाही. शुक्रवारी आयुक्तांनी या मुद्यावर अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याची चर्चा आहे.कारवाईची मागणीशहरातील खराब रस्त्यांना मनपातील कंत्राटदार आणि अधिकारी जबाबदार आहेत. अनेक महापालिकांनी खराब रस्ते करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई सुरू केली आहे. महापालिकेनेही असेच धाडसी पाऊल उचलून गुळगुळीत रस्ते तयार करून द्यावेत, अशी मागणी आ. इम्तियाज जलील यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.