शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

काठापूरला बिबट्या जेरबंद

By admin | Updated: July 16, 2016 01:01 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बु. येथे अनेक जनावरांना फस्त करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर हजारो खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे औरंगाबादकर जाम कंटाळले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. या अंदाजपत्रकाला कडाडून विरोध दर्शविण्याचे काम मनपा पदाधिकाऱ्यांनी सुरू केले. कंत्राटदारांमार्फत पॅचवर्कचे काम करण्यापेक्षा मनपाने ३ कोटी रुपये खर्च करून स्वत:चा डांबर प्लँट उभारावा, असा आग्रह सुरू आहे. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनीही मनपाला स्वत:चा डांबर प्लँट उभारणे शक्य नसल्याचे जाहीर करून वादात आणखी तेल ओतले आहे.सहा महिन्यांपूर्वी प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपाने स्वत:चा डांबर प्लँट उभारावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मनपा अधिकारी प्रारंभापासूनच डांबर प्लँट उभारणे अशक्य असल्याचे सांगत आहेत. चार दिवसांपूर्वी महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी सांगितले की, पॅचवर्क करण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. निविदा काढून पाऊस थांबल्यावर ही कामे करण्यात येणार आहेत. महापौर त्र्यंबक तुपे आणि सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी कंत्राटदारांकडून पॅचवर्क नको म्हणून कडाडून विरोध केला. मनपाने स्वत:चा डांबर प्लँट सुरू करावा, अशी सूचना त्यांनी केली. शुक्रवारी पुन्हा महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापतींनी आयुक्तांना पत्र दिले. या पत्रात मनपाने स्वत:चा डांबर प्लँट त्वरित उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्लँटसाठी ३ कोटींची अर्थसंकल्पात तरतूदही आहे.मनपाला परवडणार नाही....सायंकाळी पत्रकारांशी बोलताना आयुक्त बकोरिया यांनी सांगितले की, डांबर प्लँट उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. संगणकीय पद्धतीचा प्लँट सांभाळण्यासाठी कर्मचारी, डांबर कुठे वापरले, साहित्य खरेदीच्या नोंदी ठेवणे हे सर्व काही करणे मनपाला परवडणारे नाही. कंत्राटदारांमार्फतच गुणवत्तेचे काम करून घेणे कधीही सोयीचे आहे. आयुक्तांकडून खरडपट्टीमागील महिन्यात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी रस्त्यांची कामे न करणाऱ्या कंत्राटदारांची यादी तयार करा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. मागील पंधरा दिवसांमध्ये अधिकाऱ्यांनी यादीच तयार केली नाही. शुक्रवारी आयुक्तांनी या मुद्यावर अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याची चर्चा आहे.कारवाईची मागणीशहरातील खराब रस्त्यांना मनपातील कंत्राटदार आणि अधिकारी जबाबदार आहेत. अनेक महापालिकांनी खराब रस्ते करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई सुरू केली आहे. महापालिकेनेही असेच धाडसी पाऊल उचलून गुळगुळीत रस्ते तयार करून द्यावेत, अशी मागणी आ. इम्तियाज जलील यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.