शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

काठापूरला बिबट्या जेरबंद

By admin | Updated: July 16, 2016 01:01 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बु. येथे अनेक जनावरांना फस्त करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर हजारो खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे औरंगाबादकर जाम कंटाळले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. या अंदाजपत्रकाला कडाडून विरोध दर्शविण्याचे काम मनपा पदाधिकाऱ्यांनी सुरू केले. कंत्राटदारांमार्फत पॅचवर्कचे काम करण्यापेक्षा मनपाने ३ कोटी रुपये खर्च करून स्वत:चा डांबर प्लँट उभारावा, असा आग्रह सुरू आहे. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनीही मनपाला स्वत:चा डांबर प्लँट उभारणे शक्य नसल्याचे जाहीर करून वादात आणखी तेल ओतले आहे.सहा महिन्यांपूर्वी प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपाने स्वत:चा डांबर प्लँट उभारावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मनपा अधिकारी प्रारंभापासूनच डांबर प्लँट उभारणे अशक्य असल्याचे सांगत आहेत. चार दिवसांपूर्वी महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी सांगितले की, पॅचवर्क करण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. निविदा काढून पाऊस थांबल्यावर ही कामे करण्यात येणार आहेत. महापौर त्र्यंबक तुपे आणि सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी कंत्राटदारांकडून पॅचवर्क नको म्हणून कडाडून विरोध केला. मनपाने स्वत:चा डांबर प्लँट सुरू करावा, अशी सूचना त्यांनी केली. शुक्रवारी पुन्हा महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापतींनी आयुक्तांना पत्र दिले. या पत्रात मनपाने स्वत:चा डांबर प्लँट त्वरित उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्लँटसाठी ३ कोटींची अर्थसंकल्पात तरतूदही आहे.मनपाला परवडणार नाही....सायंकाळी पत्रकारांशी बोलताना आयुक्त बकोरिया यांनी सांगितले की, डांबर प्लँट उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. संगणकीय पद्धतीचा प्लँट सांभाळण्यासाठी कर्मचारी, डांबर कुठे वापरले, साहित्य खरेदीच्या नोंदी ठेवणे हे सर्व काही करणे मनपाला परवडणारे नाही. कंत्राटदारांमार्फतच गुणवत्तेचे काम करून घेणे कधीही सोयीचे आहे. आयुक्तांकडून खरडपट्टीमागील महिन्यात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी रस्त्यांची कामे न करणाऱ्या कंत्राटदारांची यादी तयार करा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. मागील पंधरा दिवसांमध्ये अधिकाऱ्यांनी यादीच तयार केली नाही. शुक्रवारी आयुक्तांनी या मुद्यावर अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याची चर्चा आहे.कारवाईची मागणीशहरातील खराब रस्त्यांना मनपातील कंत्राटदार आणि अधिकारी जबाबदार आहेत. अनेक महापालिकांनी खराब रस्ते करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई सुरू केली आहे. महापालिकेनेही असेच धाडसी पाऊल उचलून गुळगुळीत रस्ते तयार करून द्यावेत, अशी मागणी आ. इम्तियाज जलील यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.