शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या आला रे... नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:11 IST

जखमीला लवकरात लवकर मदत मिळेल – मनोहर म्हसेकर (वनपरीक्षेत्र अधिकारी) वढू बुद्रुक येथे बिबट्याचा हल्ला झालेल्या इसमाला शासकीय नियमानुसार ...

जखमीला लवकरात लवकर मदत मिळेल – मनोहर म्हसेकर (वनपरीक्षेत्र अधिकारी)

वढू बुद्रुक येथे बिबट्याचा हल्ला झालेल्या इसमाला शासकीय नियमानुसार मिळणारी सव्वा लक्ष रुपये मदत मिळवून देण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आलेली असून लवकरच सदर मदत लवकरात लवकर जखमी व्यक्तीस मिळवून दिली जाईल, असे शिरूर विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.

वनविभागाकडून मिळणारे अर्थसाहाय्य व मदत .

व्यक्ती मृत झाल्यास – १५ लक्ष रुपये.

व्यक्ती अपंग झाल्यास – पाच लक्ष रुपये,

व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास – १ लक्ष २५ हजार रुपये,

व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास – उपचारासाठी येणारा खर्च २० हजार रुपयांपर्यंत,

गाय, म्हैस, बैल मृत झाल्यास – बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ६० हजार रुपये या प्रमाणे वनविभागाकडून मदत मिळते.

म्हणून बिबट्या नागरिकांवर हल्ले करतो.

.

शेतातील उसामध्ये मादी बिबट्या तसेच बिबट्याची पिल्ले असतील त्यावेळी मादीचे संरक्षण व आपल्या सर्व पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी बिबट्या तेथे आलेल्या नागरिकांवर हल्ले करू शकतो.

म्हणून बिबट्या मनुष्य वस्तीकडे

पुणे जिल्ह्यात भीमाशंकर अभयारण्य तसेच माणिकडोह निवारा केंद्र असून येथील जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड झालेली असल्यामुळे बिबट्याला अन्नाच्या शोधात भटकावे लागत असल्याने बिबट्याचे मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले आहेत.

वनविभागाने केलेली उपाययोजना

बिबट्याच्या हल्ल्यापासून नागरिकांना संरक्षण मिळावे यासाठी वनविभागाच्या वतीने गावोगावी जाऊन याबाबत चित्रफीत दाखवून सावधानता बाळगण्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव तयार करणे आणि बिबट्या असलेल्या भागात पिंजरे लावणे यांसह आदी उपाययोजना वनविभागाच्या वतीने केल्या जात आहेत.

पिंजऱ्यात ठेवावी लागते शेळी-मेंढी

वनविभागाच्या वतीने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावत असताना पिंजऱ्यात शेळी अथवा मेंढी ठेवावी लागत असते, लावण्यात येणाऱ्या पिंजऱ्याला दोन कप्पे असतात त्यामुळे त्यामध्ये ठेवलेली शेळी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर लगेच बाजूला केली जाते त्यामुळे शेळी सुरक्षित राहत असते मात्र अनेक शेतकरी पिंजऱ्यामध्ये शेळी देण्यासाठी कानाडोळा करत असतात.