शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मुळशीतून पाणी सोडणार

By admin | Updated: November 2, 2015 00:50 IST

जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे उजनी धरणात असलेला कमी पाणीसाठा व निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून शासनाकडून उजनीसाठी टाटा पॉवर

पौड : जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे उजनी धरणात असलेला कमी पाणीसाठा व निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून शासनाकडून उजनीसाठी टाटा पॉवर कंपनीच्या मुळशी धरणातून सुमारे १ टीएमसी (२६ दलघमी) पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे पाणी पाच नोव्हेंबरपर्यंत सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. मुळशी तालुक्यासाठी राखीव असलेल्या साठ्यातून हे पाणी सोडण्यात येणार असल्याने तालुक्यालाच येत्या उन्हाळ्यात शेतीला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू शकतात. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी पुणे जिल्ह्यातील धरणांतून उजनीत पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार टाटा पॉवर कंपनीच्या मुळशी धरणातून मुळशी तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या, शेतीच्या, अन्य वापरासाठीच्या पाणीसाठ्यातून हे एक टीएमसी (२६ दलघमी) पाणी सोडण्यात येणार आहे. मुळशी धरणात सध्या सुमारे ७० टक्के १३ टीएमसी (३७० दलघमी) पाणीसाठा आहे. टाटा पॉवर कंपनी व शासनात झालेल्या करारानुसार मुळशीतील जनतेसाठी १.२ टीएमसी (३४ दलघमी) पाणी राखीव ठेवण्यात येते; परंतु यंदा मुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे हे राखीव पाणी कमी करण्यात येऊ शकते. त्यानंतर मुळशीकरांसाठी किती पाणी उपलब्ध राहणार व पुन्हा नदीत पाणी सोडण्यात येईल किंवा नाही, याबाबत नागरिक साशंकता व्यक्त करीत आहेत.