शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

विसर्जनासाठी पाणी सोडणार

By admin | Updated: September 25, 2015 01:43 IST

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अखेर दूर झाला असून, गणेशभक्तांना खूश करण्यासाठी टंचाई परिस्थितीतही अनंत चतुर्दशीच्या म्हणजे

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अखेर दूर झाला असून, गणेशभक्तांना खूश करण्यासाठी टंचाई परिस्थितीतही अनंत चतुर्दशीच्या म्हणजे २७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी खडकवासला प्रकल्पातून एक दिवस पुणे शहराला पुरेल एवढे म्हणजे ०.०७ टीएमसी पाणी मुळा-मुठा नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. दरम्यान,नागरिकांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचे नदीपात्रात विसर्जन करू नये, असे आवाहन बापट यांनी केले. पुण्याच्या गणेश विसर्जनासाठी खडकवासला प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी गुरुवारी बापट यांच्या अध्यक्षतेखाली येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसे गटनेते बाबू वागस्कर, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ उपस्थित होते. दर वर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत पाचव्या, सातव्या आणि शेवटच्या दिवशी धरणांमधून पाणी सोडण्यात येते. परंतु यंदा पावसाने तब्बल अडीच महिने ओढ दिली. पावसाचे प्रमुख जून आणि जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळेच पाणी सोडण्याचा निर्णय पावसावर अवलंबून असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले होते.विविध गणेश मंडळांकडून पाणी सोडण्याची जोरदार मागणी होत असल्याने बापट यांनी बैठक घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. शहरामध्ये गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने शंभर विसर्जन हौद बांधण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत दर वर्षी गणेश विसर्जनासाठी खडकवासला प्रकल्पातून ३६ तास सुमारे ०.१५ टीएमसी पाणी सोडण्यात येत होते. परंतु आता केवळ ०.०७ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून, शनिवारी मध्यरात्री २ ते ३ च्या दरम्यान खडकवासला प्रकल्पातून मुळा-मुठात पाणी सोडण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले. ४नदीत सोडण्यात आलेले हे पाणी खराडी येथील मुंढवा जॅकवेल येथे अडवून प्रक्रिया करून पुन्हा नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जनासाठी सोडलेले पाणी वाया जाणार नाही.४विसर्जनासाठी पाणी सोडण्यास शहरातील काही पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता.