शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

विसर्जनासाठी पाणी सोडणार

By admin | Updated: September 25, 2015 01:43 IST

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अखेर दूर झाला असून, गणेशभक्तांना खूश करण्यासाठी टंचाई परिस्थितीतही अनंत चतुर्दशीच्या म्हणजे

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अखेर दूर झाला असून, गणेशभक्तांना खूश करण्यासाठी टंचाई परिस्थितीतही अनंत चतुर्दशीच्या म्हणजे २७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी खडकवासला प्रकल्पातून एक दिवस पुणे शहराला पुरेल एवढे म्हणजे ०.०७ टीएमसी पाणी मुळा-मुठा नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. दरम्यान,नागरिकांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचे नदीपात्रात विसर्जन करू नये, असे आवाहन बापट यांनी केले. पुण्याच्या गणेश विसर्जनासाठी खडकवासला प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी गुरुवारी बापट यांच्या अध्यक्षतेखाली येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसे गटनेते बाबू वागस्कर, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ उपस्थित होते. दर वर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत पाचव्या, सातव्या आणि शेवटच्या दिवशी धरणांमधून पाणी सोडण्यात येते. परंतु यंदा पावसाने तब्बल अडीच महिने ओढ दिली. पावसाचे प्रमुख जून आणि जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळेच पाणी सोडण्याचा निर्णय पावसावर अवलंबून असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले होते.विविध गणेश मंडळांकडून पाणी सोडण्याची जोरदार मागणी होत असल्याने बापट यांनी बैठक घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. शहरामध्ये गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने शंभर विसर्जन हौद बांधण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत दर वर्षी गणेश विसर्जनासाठी खडकवासला प्रकल्पातून ३६ तास सुमारे ०.१५ टीएमसी पाणी सोडण्यात येत होते. परंतु आता केवळ ०.०७ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून, शनिवारी मध्यरात्री २ ते ३ च्या दरम्यान खडकवासला प्रकल्पातून मुळा-मुठात पाणी सोडण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले. ४नदीत सोडण्यात आलेले हे पाणी खराडी येथील मुंढवा जॅकवेल येथे अडवून प्रक्रिया करून पुन्हा नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जनासाठी सोडलेले पाणी वाया जाणार नाही.४विसर्जनासाठी पाणी सोडण्यास शहरातील काही पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता.