शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

पोषण आहारात गळती

By admin | Updated: January 10, 2017 03:36 IST

केंद्र शासनाच्या माध्यान्ह भोजन योजना, म्हणजेच शालेय पोषण आहार योजनेत तीन वर्षांपासून राज्यातील विद्यार्थ्यांची गळती सुरू असल्याचे चित्र आहे.

राजानंद मोरे / पुणेकेंद्र शासनाच्या माध्यान्ह भोजन योजना, म्हणजेच शालेय पोषण आहार योजनेत तीन वर्षांपासून राज्यातील विद्यार्थ्यांची गळती सुरू असल्याचे चित्र आहे. एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत आहार मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सध्या जवळपास ८० टक्के आहे. हेच प्रमाण शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये सुमारे ८८ टक्के एवढे होते. या योजनाचा लाभ घेण्यात राज्यात मुंबई सर्वाधिक मागास असून, निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहार अद्यापही मिळत नाही.सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा शाळांकडे ओढा वाढावा, या उद्देशाने शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित संस्थांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषक आहार दिला जातो. दर वर्षी त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. राज्यात या वर्षी ८६ हजार ५०७ शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळत आहे. शैक्षणिक वर्ष २०१६-१७मध्ये प्राथमिकमध्ये सुमारे ६९ लाख २६ हजार, तर उच्च प्राथमिकमध्ये सुमारे ४६ लाख २७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यांपैकी दुसऱ्या सत्रात अनुक्रमे ५५ लाख ४० हजार आणि ३६ लाख ८० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोषण आहार पोहोचला आहे. हे प्रमाण सरासरी ८० टक्के एवढे आहे. शैक्षणिक वर्ष २०१-१४मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८८ टक्के विद्यार्थ्यांना योजनेचा फायदा मिळाला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी हे प्रमाण कमी होत गेल्याचे एका अहवालानुसार स्पष्टपणे दिसून आले आहे. २०१४-१५मध्ये प्राथमिकच्या ८४ टक्के, उच्च प्राथमिकच्या ८१ टक्के विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला. त्यापुढील वर्षातही आहार मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात २ टक्क्यांची घट दिसून आली आहे. ही गळती चालू शैक्षणिक वर्षातही कायम आहे. मात्र, हे प्रमाण मागील तीन वर्षांच्या तुलनेत कमी आहे. यामध्ये मुंबईचा वाटा सर्वाधिक असल्याचे चित्र असून, शाळांकडून योजनेला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मुंबईत प्राथमिक व उच्च प्राथमिकमध्ये अनुक्रमे ६८ व ६१ टक्के विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नाही. ग्रामीण भागात मात्र या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.