शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

पालेभाज्या कडाडल्या

By admin | Updated: June 3, 2017 02:35 IST

शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत अशी संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सुरू करण्यात आलेले आठवडा बाजार ओस

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत अशी संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सुरू करण्यात आलेले आठवडा बाजार ओस पडले आहेत. शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी आवक कमी झाल्याने पालेभाज्यांचे भाव कडाडले. भाजी, फळे आणि दूध विक्रेत्यांनी दुप्पट, तिप्पट दर आकारून ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचवली.पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपरी पुलाखालील भाजी मंडईत नेहमी वर्दळ असते. शुक्रवारी मात्र भाजीची आवक न झाल्याने मंडईत शुकशुकाट होता. अनेक भाजी विक्रेत्यांच्या टोकऱ्या रिकाम्या दिसून आल्या. शेतकरी संपाचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवला. दहा ते पंधरा रुपयांना मिळणाऱ्या मेथीच्या गड्डीसाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागले. ४० रुपये किलोने मिळणारी वांगी १०० रुपये किलोने विक्री करण्यात येत होती. कोथिंबिरीच्या गड्डीलाही २५ ते ३० रुपये द्यावे लागले. ग्राहकांना दूध मिळणे मुश्कील झाले. दूधही चढ्या भावाने विक्री होत होते. फळांची आवकसुद्धा कमी प्रमाणात झाली असल्याने वाढीव दराने फळे खरेदी करणे ग्राहकांना भाग पडले. हॉटेल व्यावसायालाही फटका उद्योगनगरी लगतच्या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचा माल येत असतो. मात्र, शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे हा माल कमी झाला आहे. अजमेरा कॉलनीतील पिल्ले सांस्कृतिक भवनाजवळ दर शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. या वेळी मात्र भाजी विक्रेते कोणीही फिरकले नाही. आठवडे बाजाराच्या ठिकाणी अक्षरश: मुले क्रिकेट खेळत होती. ग्राहक नेहमीप्रमाणे आठवडा बाजाराच्या ठिकाणी येत होते. मात्र, संपामुळे विक्रेत आले नाहीत, हे समजल्यानंतर त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत होते. हॉटेलांमध्येही कांदा, काकडी, मिरची देताना आखडता हात घेतला जात होता.आज सायंकाळी मंडईत शिल्लक भाजीपाल्याचे दर वाढले आहेत़ जास्त भाव देऊन शिळ्या भाज्या विकत घेण्यापेक्षा कडधान्य शिजवून भाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापुढेही आंदोलन सुरू राहिले तर काय भाजी करावी हा प्रश्न सतावत आहे, असे रुपीनगर येथील गृहिणी कविता पडवळ यांनी सांगितले.चिखली मंडईतून पालेभाज्या गायबचिखली : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम भाजी मंडईत दिसून येत आहेत. कालपासून शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये शेतीमाल विक्री करणे बंद केले आहे. त्यामुळे आज चिखली परिसरात एकाही विक्रेत्याकडे मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर यांसारख्या लोकांच्या दैनंदिन आहारात असणाऱ्या पालेभाज्या विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला शहरातील काही विक्रेते पाठिंबा देत असून तेही भाजी खरेदी करण्यासाठी मार्केट अथवा प्रत्येक्ष शेतकऱ्याकडे गेलेले नाहीत, विक्रेते उपलब्ध असलेल्या कालच्या आणि परवाच्या शिल्लक मालाची विक्री करत आहेत. त्यातच शेतमालाची आवाक घटल्याने मालाचे भाव वाढवले आहेत. २० रुपये किलो असलेले टोमॅटो ४० रुपये, १० रु. पावशेर असलेली गवार १५ रु. झाली असून १५ रुपये प्रतिकिलो विकले जाणारे बटाटे २० रु़ भावाने विकले जात आहेत.