शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्या कडाडल्या

By admin | Updated: June 3, 2017 02:35 IST

शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत अशी संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सुरू करण्यात आलेले आठवडा बाजार ओस

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत अशी संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सुरू करण्यात आलेले आठवडा बाजार ओस पडले आहेत. शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी आवक कमी झाल्याने पालेभाज्यांचे भाव कडाडले. भाजी, फळे आणि दूध विक्रेत्यांनी दुप्पट, तिप्पट दर आकारून ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचवली.पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपरी पुलाखालील भाजी मंडईत नेहमी वर्दळ असते. शुक्रवारी मात्र भाजीची आवक न झाल्याने मंडईत शुकशुकाट होता. अनेक भाजी विक्रेत्यांच्या टोकऱ्या रिकाम्या दिसून आल्या. शेतकरी संपाचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवला. दहा ते पंधरा रुपयांना मिळणाऱ्या मेथीच्या गड्डीसाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागले. ४० रुपये किलोने मिळणारी वांगी १०० रुपये किलोने विक्री करण्यात येत होती. कोथिंबिरीच्या गड्डीलाही २५ ते ३० रुपये द्यावे लागले. ग्राहकांना दूध मिळणे मुश्कील झाले. दूधही चढ्या भावाने विक्री होत होते. फळांची आवकसुद्धा कमी प्रमाणात झाली असल्याने वाढीव दराने फळे खरेदी करणे ग्राहकांना भाग पडले. हॉटेल व्यावसायालाही फटका उद्योगनगरी लगतच्या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचा माल येत असतो. मात्र, शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे हा माल कमी झाला आहे. अजमेरा कॉलनीतील पिल्ले सांस्कृतिक भवनाजवळ दर शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. या वेळी मात्र भाजी विक्रेते कोणीही फिरकले नाही. आठवडे बाजाराच्या ठिकाणी अक्षरश: मुले क्रिकेट खेळत होती. ग्राहक नेहमीप्रमाणे आठवडा बाजाराच्या ठिकाणी येत होते. मात्र, संपामुळे विक्रेत आले नाहीत, हे समजल्यानंतर त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत होते. हॉटेलांमध्येही कांदा, काकडी, मिरची देताना आखडता हात घेतला जात होता.आज सायंकाळी मंडईत शिल्लक भाजीपाल्याचे दर वाढले आहेत़ जास्त भाव देऊन शिळ्या भाज्या विकत घेण्यापेक्षा कडधान्य शिजवून भाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापुढेही आंदोलन सुरू राहिले तर काय भाजी करावी हा प्रश्न सतावत आहे, असे रुपीनगर येथील गृहिणी कविता पडवळ यांनी सांगितले.चिखली मंडईतून पालेभाज्या गायबचिखली : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम भाजी मंडईत दिसून येत आहेत. कालपासून शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये शेतीमाल विक्री करणे बंद केले आहे. त्यामुळे आज चिखली परिसरात एकाही विक्रेत्याकडे मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर यांसारख्या लोकांच्या दैनंदिन आहारात असणाऱ्या पालेभाज्या विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला शहरातील काही विक्रेते पाठिंबा देत असून तेही भाजी खरेदी करण्यासाठी मार्केट अथवा प्रत्येक्ष शेतकऱ्याकडे गेलेले नाहीत, विक्रेते उपलब्ध असलेल्या कालच्या आणि परवाच्या शिल्लक मालाची विक्री करत आहेत. त्यातच शेतमालाची आवाक घटल्याने मालाचे भाव वाढवले आहेत. २० रुपये किलो असलेले टोमॅटो ४० रुपये, १० रु. पावशेर असलेली गवार १५ रु. झाली असून १५ रुपये प्रतिकिलो विकले जाणारे बटाटे २० रु़ भावाने विकले जात आहेत.