शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

समर्पित कार्यकर्ता असलेला नेता...

By admin | Updated: January 14, 2017 02:46 IST

किराणामालाचे दुकान, दोन खोल्यांचे घर अशा सर्वसामान्य घरातून राजकारणात आपले स्थान निर्माण केलेला, जातपात, पंथ विसरून

किराणामालाचे दुकान, दोन खोल्यांचे घर अशा सर्वसामान्य घरातून राजकारणात आपले स्थान निर्माण केलेला, जातपात, पंथ विसरून काम करण्याच्या पद्धतीमुळे बहुजनांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारा नेता म्हणून माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे नाव घ्यावे लागेल. समाजसेवेसाठी समर्पित व भारवले जाऊन काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडून नव्या राजकीय पिढीला घेण्यासारखे खूप आहे.खरे तर त्यांचे जाणे तसे अकालीच म्हणावे लागेल. गेल्या आठवड्यातच त्यांची रुग्णालयात भेट घेतली. त्या वेळीदेखील ‘मी बरा झाल्यावर तुमच्या संस्थेच्या निवडणुकीचे राहिलेला काम उरकून घेऊ,’ असा त्यांचा ‘कामा’चा शब्द होता. राष्ट्रभाषा समितीचा अध्यक्ष म्हणून मी काम करीत आहे. या संस्थेची निवडणूक प्रलंबित असून, दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड केली होती. आता ते काम राहिलेच. त्यानंतरही त्यांच्या मुलाच्या कार्य अहवाल प्रकाशनासाठी त्यांचा मला फोन आला. आपण आलात तर मुलाच्या कार्य अवाल प्रकाशनाला उंची लाभेल, असे त्यांचे म्हणणे होते. रुग्णालयात असतानाही त्यांना सतत कामाचीच ओढ होती. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाबरोबरच माझेदेखील वैयक्तिक नुकसान झाले आहे. छाजेड व आमची मैत्र तब्बल ४५ वर्षांची. त्यानंतर आमचा घरोबादेखील झाला. त्यांच्याबरोबर व्यतीत केलेला काळ माझ्या झर्रकन समोर आला. चंद्रकांत छाजेड म्हणजे आमच्या सगळ्यांचा चंदू ! त्या वेळी ते आयएलएस लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. बोपोडीत त्यांचे रेशनिंगचे दुकान होते. दोन खोल्यांच्या घरात त्यांचे वास्तव्य. मी त्या वेळी नाना पेठेत राहत असे. काँग्रेस सेवादल, त्यानंतर युवक काँग्रेस असे आम्ही एकत्र काम केले. हा काळ साधारण १९७०-७१चा असेल. त्या वेळी युवा कार्यकर्त्यांचे लॉ कॉलेजचे हॉस्टेल हेच केंद्र होते. त्या वेळपासून त्यांची कामाची हातोटी होती. कामाचा कधी कंटाळा असा त्यांनी केलाच नाही. वकिली करताना स्वकष्टाने वर्कशॉप केले. शेकडो गोरगरिबांचे खटले फुकट चालविले. इतकेच काय, तर अ‍ॅफिडेव्हीट अथवा तिकिटासाठी येणारा खर्चदेखील त्यांनी अनेकदा सोसला. सर्वांमध्ये मिसळण्याच्या वृत्तीमुळे सर्वांच्या मनात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले होते. आत्ता प्रत्येत इच्छुक दिवाळीला उटणे-फराळ वाटपाचा कार्यक्रम घेतो; मात्र आम्ही १९७२-७३च्या दिवाळीत झोपडपट्टीत पहाटे पाचला उटणे वाटण्याचा कार्यक्रम केला होता. त्या वेळी ही गोष्ट नवीनच होती.आजकाल धर्म-जाती यांवरून एक वेगळेच वातावरण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, ते ज्या जैन धर्मातून आले आहेत, तो धर्म त्यांच्या मतदारसंघात हाताच्या बोटांवर मोजण्याइतका आहे. मात्र तरीही त्यांनी नगरसेवक, महापौर, आमदार व मंत्रिपदापर्यंत झेप घेतली. ते त्यांच्या भाषणाचा शेवट नेहमी ‘जय भीम’ या शब्दांनीच करीत. सर्वांशी मिळूनमिसळून वागण्याचा गुण त्यांच्या अंगी होता. गांधी विचारांवर त्यांची निष्ठा होती. त्यांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे.