शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

समर्पित कार्यकर्ता असलेला नेता...

By admin | Updated: January 14, 2017 02:46 IST

किराणामालाचे दुकान, दोन खोल्यांचे घर अशा सर्वसामान्य घरातून राजकारणात आपले स्थान निर्माण केलेला, जातपात, पंथ विसरून

किराणामालाचे दुकान, दोन खोल्यांचे घर अशा सर्वसामान्य घरातून राजकारणात आपले स्थान निर्माण केलेला, जातपात, पंथ विसरून काम करण्याच्या पद्धतीमुळे बहुजनांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारा नेता म्हणून माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे नाव घ्यावे लागेल. समाजसेवेसाठी समर्पित व भारवले जाऊन काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडून नव्या राजकीय पिढीला घेण्यासारखे खूप आहे.खरे तर त्यांचे जाणे तसे अकालीच म्हणावे लागेल. गेल्या आठवड्यातच त्यांची रुग्णालयात भेट घेतली. त्या वेळीदेखील ‘मी बरा झाल्यावर तुमच्या संस्थेच्या निवडणुकीचे राहिलेला काम उरकून घेऊ,’ असा त्यांचा ‘कामा’चा शब्द होता. राष्ट्रभाषा समितीचा अध्यक्ष म्हणून मी काम करीत आहे. या संस्थेची निवडणूक प्रलंबित असून, दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड केली होती. आता ते काम राहिलेच. त्यानंतरही त्यांच्या मुलाच्या कार्य अहवाल प्रकाशनासाठी त्यांचा मला फोन आला. आपण आलात तर मुलाच्या कार्य अवाल प्रकाशनाला उंची लाभेल, असे त्यांचे म्हणणे होते. रुग्णालयात असतानाही त्यांना सतत कामाचीच ओढ होती. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाबरोबरच माझेदेखील वैयक्तिक नुकसान झाले आहे. छाजेड व आमची मैत्र तब्बल ४५ वर्षांची. त्यानंतर आमचा घरोबादेखील झाला. त्यांच्याबरोबर व्यतीत केलेला काळ माझ्या झर्रकन समोर आला. चंद्रकांत छाजेड म्हणजे आमच्या सगळ्यांचा चंदू ! त्या वेळी ते आयएलएस लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. बोपोडीत त्यांचे रेशनिंगचे दुकान होते. दोन खोल्यांच्या घरात त्यांचे वास्तव्य. मी त्या वेळी नाना पेठेत राहत असे. काँग्रेस सेवादल, त्यानंतर युवक काँग्रेस असे आम्ही एकत्र काम केले. हा काळ साधारण १९७०-७१चा असेल. त्या वेळी युवा कार्यकर्त्यांचे लॉ कॉलेजचे हॉस्टेल हेच केंद्र होते. त्या वेळपासून त्यांची कामाची हातोटी होती. कामाचा कधी कंटाळा असा त्यांनी केलाच नाही. वकिली करताना स्वकष्टाने वर्कशॉप केले. शेकडो गोरगरिबांचे खटले फुकट चालविले. इतकेच काय, तर अ‍ॅफिडेव्हीट अथवा तिकिटासाठी येणारा खर्चदेखील त्यांनी अनेकदा सोसला. सर्वांमध्ये मिसळण्याच्या वृत्तीमुळे सर्वांच्या मनात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले होते. आत्ता प्रत्येत इच्छुक दिवाळीला उटणे-फराळ वाटपाचा कार्यक्रम घेतो; मात्र आम्ही १९७२-७३च्या दिवाळीत झोपडपट्टीत पहाटे पाचला उटणे वाटण्याचा कार्यक्रम केला होता. त्या वेळी ही गोष्ट नवीनच होती.आजकाल धर्म-जाती यांवरून एक वेगळेच वातावरण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, ते ज्या जैन धर्मातून आले आहेत, तो धर्म त्यांच्या मतदारसंघात हाताच्या बोटांवर मोजण्याइतका आहे. मात्र तरीही त्यांनी नगरसेवक, महापौर, आमदार व मंत्रिपदापर्यंत झेप घेतली. ते त्यांच्या भाषणाचा शेवट नेहमी ‘जय भीम’ या शब्दांनीच करीत. सर्वांशी मिळूनमिसळून वागण्याचा गुण त्यांच्या अंगी होता. गांधी विचारांवर त्यांची निष्ठा होती. त्यांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे.