शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

ग्रामस्थांना कचऱ्यातूनही मिळणार ‘लक्ष्मी’

By admin | Updated: October 2, 2015 00:42 IST

कचऱ्यालाही आपल्याकडे लक्ष्मीचा मान आहे. तिची योग्य प्रकारे पूजा केली तर ती ‘महालक्ष्मी’ होऊ शकते; अन्यथा तोच कचरा ‘महामारी’ होऊ शकतो

पुणे : कचऱ्यालाही आपल्याकडे लक्ष्मीचा मान आहे. तिची योग्य प्रकारे पूजा केली तर ती ‘महालक्ष्मी’ होऊ शकते; अन्यथा तोच कचरा ‘महामारी’ होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर कचऱ्यातून ‘लक्ष्मी’ मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सांसद आदर्श गावांमध्ये घनकचरा प्रकल्प राबविला जाणार आहे. परिसरातील ७१ गावांना याचा फायदा होणार आहे.जिल्हा परिषदेच्या दक्षता समितीची बैैठक आज झाली. अध्यक्ष स्थानी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील होते. आढळराव व जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात कचऱ्याच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना कचऱ्यातून अर्थार्जनाची संधी मिळवून देण्याची संकल्पना पुढे आली आहे. ‘गंगोत्री’ या संस्थेने याबाबत प्रस्ताव सादर केला असून, त्यांच्या माध्यमातून हे घनकचरा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. सांसद आदर्श गाव केंदूबिंदू मानून परिसरातील १५ किलोमीटर अंतरातील साधारण १५ गावे यात सहभागी करून घेतली जाणार आहेत. आठ सांसद आदर्श गावांच्या परिसरातील ७१ गावांना याचा फायदा होईल. ज्या गावात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, त्या गावातच एका उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात येईल. तिला गावाचे नाव दिले जाईल. यात गावाचे सरपंच, प्रथितयश ग्रामस्थ व तज्ज्ञ यांचा समावेश असेल. १५ संचालक राहणार असून, १२ गावांतील व ३ प्रकल्प राबविणाऱ्या कंपनीचे संचालक असतील. साधारण दररोज १५ टन ओल्या कचऱ्याची उपलब्धता त्यासाठी आवश्यक असेल. सुरुवातीला आढळराव-पाटील यांनी त्यांनी दत्तक घेतलेल्या शिरूर तालुक्यातील करंदी गावात हा प्रकल्प राबविण्यात येणार होता त्यानंतर सर्वच सांसद आदर्र्श गावांमध्ये का राबवू नये, असा विचार पुढे आला व तसा प्रस्ताव केला आहे. या सादरीकरणानंतर आढळराव-पाटील यांनी आपल्याकडे मोठी गावे आहेत. कचरा कुठे टाकायचा, यावरून वाद होत आहेत. हे वाद टाळण्यासाठी मोठ्या गावात जागा उपलब्ध करून दिल्यास १० ते १२ गावे एकत्र करून हा प्रकल्प तेथे राबविता येईल, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद व मुख्याधिकारी कांतिलाल उमाप यांना केली. याला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, गंगोत्री कंपनीचे किरण पटवर्धन यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा प्रकल्प आपण राबवू शकतो, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)