शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

नीराची लचकेतोड सुरूच

By admin | Updated: January 4, 2017 05:19 IST

इंदापूरच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या नीरा नदीची वाळूमाफियांकडून दररोज लचकेतोड होत आहे. पात्रामधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळूउपशामुळे नीरा नदी

बारामती / निरवांगी : इंदापूरच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या नीरा नदीची वाळूमाफियांकडून दररोज लचकेतोड होत आहे. पात्रामधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळूउपशामुळे नीरा नदी आता अस्तित्वासाठी झगडू लागल्याचे चित्र आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर कमालीची उदासीनता आहे. त्यामुळे येथील वाळूमाफिया कोणत्याही यंत्रणेस भीक घालीत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तालुक्यातील नीरा नृसिंहपूर येथे येणार आहेत. येथील नदीपात्राची परिस्थितीही फार वेगळी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री येथील प्रशासनाला काय आदेश देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. इंदापूर तालुक्यातून उद्धट, तावशी, कुरवली, कळंब, निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, सराटी, नीरा-नृसिंहपूर या गावांमधून नीरा नदी वाहते. इंदापूर तालुक्याबरोबरच माळशिरस तालुक्यातीलही अनेक शेतकऱ्यांना नीरेच्याच पाण्याचा आधार असतो. मात्र मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळूउपशाचा परिणाम पात्रातील पाणीसाठ्यावर देखील होत आहे. तर ज्या बंधाऱ्यांमध्ये पाणी नाही अशा ठिकाणच्या वाळूउपशामुळे भूजलपातळीही मोेठ्या प्रमाणात घटू लागली आहे. तसेच अगदी बंधाऱ्याच्या भिंतीलगतच वाळूउपसा होत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी बंधाऱ्यांनादेखील धोका पोहोचला आहे. उपसा केलेली वाळू वाहतूक टिपर व ट्रॅक्टरमधून बीकेबीएन रस्त्याने सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था होत आहे. दररोज लाखो रुपयांची माया वाळूमाफियांना मिळत आहे. या वाळूमाफियांवर महसूल विभागाची ठोस अशी कोणतीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. नीरेच्या पाण्यावर येथील शेतकऱ्यांनी फळबागा, चारा पिकांची लागवड केली आहे. मागील वर्षीच्या तीव्र दुष्काळामध्ये येथील शेतकरी भरडला गेला होता. जनावरांना चारा घालण्यासाठी शेतकऱ्यांना खिसे रिकामे करावे लागत होते. उन्हाळ्यामध्ये नदीला धरणातून पाणी सोडले जाईल की नाही याची खात्री नाही. त्यामुळे सध्याच्या चारा पिकांवर पुढील उन्हाळी हंगाम परिसरातील शेतकऱ्यांना काढावा लागणार आहे. मात्र शासकीय कार्यालयातील ‘खाबूगिरी’मुळे दिवसाढवळ्या वाळूउपसा सुरू असूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनातील घरभेद्यांमुळेच वाळूमाफिया चोरी करून उजळमाथ्याने फिरत आहेत, असा आरोपही येथील शेतकऱ्यांनी केला आहे. तातडीने या अवैध वाळू उपशावर कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.