शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

नीराची लचकेतोड सुरूच

By admin | Updated: January 4, 2017 05:19 IST

इंदापूरच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या नीरा नदीची वाळूमाफियांकडून दररोज लचकेतोड होत आहे. पात्रामधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळूउपशामुळे नीरा नदी

बारामती / निरवांगी : इंदापूरच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या नीरा नदीची वाळूमाफियांकडून दररोज लचकेतोड होत आहे. पात्रामधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळूउपशामुळे नीरा नदी आता अस्तित्वासाठी झगडू लागल्याचे चित्र आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर कमालीची उदासीनता आहे. त्यामुळे येथील वाळूमाफिया कोणत्याही यंत्रणेस भीक घालीत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तालुक्यातील नीरा नृसिंहपूर येथे येणार आहेत. येथील नदीपात्राची परिस्थितीही फार वेगळी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री येथील प्रशासनाला काय आदेश देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. इंदापूर तालुक्यातून उद्धट, तावशी, कुरवली, कळंब, निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, सराटी, नीरा-नृसिंहपूर या गावांमधून नीरा नदी वाहते. इंदापूर तालुक्याबरोबरच माळशिरस तालुक्यातीलही अनेक शेतकऱ्यांना नीरेच्याच पाण्याचा आधार असतो. मात्र मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळूउपशाचा परिणाम पात्रातील पाणीसाठ्यावर देखील होत आहे. तर ज्या बंधाऱ्यांमध्ये पाणी नाही अशा ठिकाणच्या वाळूउपशामुळे भूजलपातळीही मोेठ्या प्रमाणात घटू लागली आहे. तसेच अगदी बंधाऱ्याच्या भिंतीलगतच वाळूउपसा होत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी बंधाऱ्यांनादेखील धोका पोहोचला आहे. उपसा केलेली वाळू वाहतूक टिपर व ट्रॅक्टरमधून बीकेबीएन रस्त्याने सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था होत आहे. दररोज लाखो रुपयांची माया वाळूमाफियांना मिळत आहे. या वाळूमाफियांवर महसूल विभागाची ठोस अशी कोणतीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. नीरेच्या पाण्यावर येथील शेतकऱ्यांनी फळबागा, चारा पिकांची लागवड केली आहे. मागील वर्षीच्या तीव्र दुष्काळामध्ये येथील शेतकरी भरडला गेला होता. जनावरांना चारा घालण्यासाठी शेतकऱ्यांना खिसे रिकामे करावे लागत होते. उन्हाळ्यामध्ये नदीला धरणातून पाणी सोडले जाईल की नाही याची खात्री नाही. त्यामुळे सध्याच्या चारा पिकांवर पुढील उन्हाळी हंगाम परिसरातील शेतकऱ्यांना काढावा लागणार आहे. मात्र शासकीय कार्यालयातील ‘खाबूगिरी’मुळे दिवसाढवळ्या वाळूउपसा सुरू असूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनातील घरभेद्यांमुळेच वाळूमाफिया चोरी करून उजळमाथ्याने फिरत आहेत, असा आरोपही येथील शेतकऱ्यांनी केला आहे. तातडीने या अवैध वाळू उपशावर कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.