शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कोपरे मांडवे गावात स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी योजना राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:10 IST

-- नारायणगाव : विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे कोपरे मांडवे या गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून येथील महिलांना दूरवर ...

--

नारायणगाव : विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे कोपरे मांडवे या गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून येथील महिलांना दूरवर पायपीट करत डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाणी टंचाई दूर करण्यासाठी सांसद आदर्शग्राम कोपरे मांडवे गावासाठी ‘स्वर्गीय मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना’ तातडीने राबविण्यात यावी, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

सांसद आदर्श ग्रामयोजनेत खासदार डॉ. कोल्हे यांनी कोपरे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्य शासनाच्या स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना कोपरे मांडवे गावात राबविण्यासाठी तातडीने प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गतवर्षीपासून सुरू झालेल्या कोविडच्या संकटामुळे जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यातील विकासकामांसाठीचा निधी कोविड रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी खर्च झाला. त्यामुळे गतवर्षी खासदार डॉ. कोल्हे यांनी मागणी केलेला जर्मन तंत्रज्ञानावर आधारीत पाण्याच्या टाक्यांसाठीचा प्रस्ताव निधी अभावी प्रलंबित राहिला होता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या वर्षी जिल्हा नियोजन निधीमधून जर्मन तंत्रज्ञानावर आधारित पाण्याच्या टाक्यांसाठी निधी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी या टाक्यांची कामे सुरू होणे अपेक्षित आहे .

दरम्यान राज्य सरकारने विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी टंचाई भेडसावणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘‘स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना’’ राबविण्याचा आदेश जारी केला. या आदेशानुसार खासदार डॉ. कोल्हे यांनी तत्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना ही योजना राबविण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली.

या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, सांसद आदर्श ग्रामयोजनेतील गाव दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच कोविडचे संकट उभे राहिले. आधीचा लॉकडाऊन आताची दुसरी लाट यामुळे मुळातच कोपरे गावाचा विकास आराखडा बनवण्याचे काम होऊ शकले नव्हते. आता विकास आराखडा बनवण्याचे काम सुरू होत आहे. त्यामुळे या आराखड्यानुसार भविष्यात विविध विकासकामे केली जातील, मुळात आपण सर्व सोयी असलेले गाव दत्तक घेतले नाही. आदिवासी भागातील कोपरे - मांडवे गाव विकासापासून गेली अनेक वर्षे दूर असल्यानेच आपण हे गाव सांसद आदर्श ग्रामयोजनेत दत्तक घेतले आहे. त्यामुळे या गावाचा विकास करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली. परंतु त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूदच केलेली नाही. त्यामुळे नियमित योजनांच्या माध्यमातून आपल्याला कोपरे गावाचा विकास करायचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे, असे मत खा. कोल्हे यांनी व्यक्त केले.