शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील भातशेती अंतिम टप्प्यात

By admin | Updated: November 7, 2016 01:19 IST

पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर व पुरंदर या तालुक्यांमध्ये जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते.

डिंभे : पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर व पुरंदर या तालुक्यांमध्ये जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते. सध्या येथील भातशेती अंतिम टप्प्यात आली आहे.भातपिकाच्या यंदा उशिरा झालेल्या पेरण्या, त्यामुळे लागवडीसाठी झालेला उशीर. लागवडीनंतर अतिपावसामुळे सडू लागलेली भातशेती व त्यानंतर परतीच्या पावसाने भातउत्पादन क्षेत्रातून वेळेआधीच घेतलेला आखडता पाय, यामुळे यंदा भातकाढणीच्या हंगामाचे दिवस लांबत चालले आहेत. सध्या हळव्या जातीची काढणी चालू असली तरी गरव्या जातीची भातशेती अंतिम टप्प्यात एका पावसावाचून वाया गेली आहे. गरव्या जाती पावसाअभावी निसवल्याच नाहीत. यामुळे खाचरातील सुरगाड जमा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.बहुतांश भागातील भातशेती ही संपूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून आसल्याने जून, जुलैदरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात भात लागवडीची कामे सुरू असल्याचे पाहावयास मिळते. जुलै अखेरपर्यंत भातलागवडीची कामे उरकली जातात. लागवड केलेले भातक्षेत्र तयार होण्यासाठी साडेतीन ते चार महिन्यांचा कालाधी लागतो. आॅक्टोबर महिन्यापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पिवळेधमक भातक्षेत्र तयार होऊन जिर, रायभोग, इंद्रायणी, साळ, कोलम इत्यादी जातीच्या भातशेतीचा एक वेगळा सुगंध परिसरात दरवळत असतो. दसऱ्यादरम्यान थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे नाही म्हणायला हळव्या जातीच्या भातपिकास फायदा झाला. मात्र गरव्या जाती या वेळी नुकत्याच जोर धरू लागल्या होत्या. परंतु यंदा भात हंगामाच्या सुरूवातीस पेरणीपासून पावसाने दिलेल्या हुलकावण्या व त्यामुळे भातरोपे पेरण्यास उशीर झाला. पेरणीनंतरही पुढची भातशेतीच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जाणारी नक्षत्रे कोरडी गेल्याने उगवून आलेली भातरोपे जळून गेली होती. उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी लागवडी उरकल्या खऱ्या परंतु कोवळे आवण व त्यानंतर पावसाने केलेली मुसळधार सुरूवात यामुळे भातखाचरे तुडुंब भरली. खाचरात लागड केलेले कोवळी भातरोपे सडून भातशेतीचे नुकसान होऊ लागले होते. त्यातच कशीबशी भातशेती वाचली. फुलवडे, बोरघर, अडिवरे, कोंढवळ, पाटण, कुशिरे, महाळुंगे, पोखरी, चिखली येथे अद्यापही काही खाचरांतील भातपीक हिरवेजर्द असून त्यास लोंबही धरल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी भातपीक काढावयास सुरूवात केली आहे त्यांच्या हाती केवळ पळंज लागत असल्याने यंदा आंबेगाव तालुक्यात भात उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट येणार आहे. या बाबत आहुपे खोऱ्यातील काही शेतकऱ्यांनी आंबेगाव तहसीलदारांना निवेदन दिले असून, पावसाअभावी वाया गेलेल्या भातशेतीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.