शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
3
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
4
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकूण काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
5
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
6
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
7
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
8
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
9
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
10
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
11
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
12
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
13
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
14
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
15
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
17
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
18
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
19
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
20
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण

जिल्ह्यातील भातशेती अंतिम टप्प्यात

By admin | Updated: November 7, 2016 01:19 IST

पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर व पुरंदर या तालुक्यांमध्ये जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते.

डिंभे : पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर व पुरंदर या तालुक्यांमध्ये जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते. सध्या येथील भातशेती अंतिम टप्प्यात आली आहे.भातपिकाच्या यंदा उशिरा झालेल्या पेरण्या, त्यामुळे लागवडीसाठी झालेला उशीर. लागवडीनंतर अतिपावसामुळे सडू लागलेली भातशेती व त्यानंतर परतीच्या पावसाने भातउत्पादन क्षेत्रातून वेळेआधीच घेतलेला आखडता पाय, यामुळे यंदा भातकाढणीच्या हंगामाचे दिवस लांबत चालले आहेत. सध्या हळव्या जातीची काढणी चालू असली तरी गरव्या जातीची भातशेती अंतिम टप्प्यात एका पावसावाचून वाया गेली आहे. गरव्या जाती पावसाअभावी निसवल्याच नाहीत. यामुळे खाचरातील सुरगाड जमा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.बहुतांश भागातील भातशेती ही संपूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून आसल्याने जून, जुलैदरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात भात लागवडीची कामे सुरू असल्याचे पाहावयास मिळते. जुलै अखेरपर्यंत भातलागवडीची कामे उरकली जातात. लागवड केलेले भातक्षेत्र तयार होण्यासाठी साडेतीन ते चार महिन्यांचा कालाधी लागतो. आॅक्टोबर महिन्यापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पिवळेधमक भातक्षेत्र तयार होऊन जिर, रायभोग, इंद्रायणी, साळ, कोलम इत्यादी जातीच्या भातशेतीचा एक वेगळा सुगंध परिसरात दरवळत असतो. दसऱ्यादरम्यान थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे नाही म्हणायला हळव्या जातीच्या भातपिकास फायदा झाला. मात्र गरव्या जाती या वेळी नुकत्याच जोर धरू लागल्या होत्या. परंतु यंदा भात हंगामाच्या सुरूवातीस पेरणीपासून पावसाने दिलेल्या हुलकावण्या व त्यामुळे भातरोपे पेरण्यास उशीर झाला. पेरणीनंतरही पुढची भातशेतीच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जाणारी नक्षत्रे कोरडी गेल्याने उगवून आलेली भातरोपे जळून गेली होती. उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी लागवडी उरकल्या खऱ्या परंतु कोवळे आवण व त्यानंतर पावसाने केलेली मुसळधार सुरूवात यामुळे भातखाचरे तुडुंब भरली. खाचरात लागड केलेले कोवळी भातरोपे सडून भातशेतीचे नुकसान होऊ लागले होते. त्यातच कशीबशी भातशेती वाचली. फुलवडे, बोरघर, अडिवरे, कोंढवळ, पाटण, कुशिरे, महाळुंगे, पोखरी, चिखली येथे अद्यापही काही खाचरांतील भातपीक हिरवेजर्द असून त्यास लोंबही धरल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी भातपीक काढावयास सुरूवात केली आहे त्यांच्या हाती केवळ पळंज लागत असल्याने यंदा आंबेगाव तालुक्यात भात उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट येणार आहे. या बाबत आहुपे खोऱ्यातील काही शेतकऱ्यांनी आंबेगाव तहसीलदारांना निवेदन दिले असून, पावसाअभावी वाया गेलेल्या भातशेतीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.