शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

माळीण पुनर्वसन अंतिम टप्प्यात

By admin | Updated: January 26, 2017 00:09 IST

माळीण पुनर्वसनाचे काम ९० टक्के पुर्ण झाले असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीत ग्रामस्थांना आपले हक्काचे घर ताब्यात देणार असल्याचे

घोडेगाव : माळीण पुनर्वसनाचे काम ९० टक्के पुर्ण झाले असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीत ग्रामस्थांना आपले हक्काचे घर ताब्यात देणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. माळीण पुनर्वसनाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा व पहाणी करण्यासाठी जिल्हाधिकारी माळीणमध्ये आले होते. यावेळी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे पाटिल, प्रांत अधिकारी कल्याण पांढरे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटिल, सिटी कॉर्पोरेशन अनिरूध्द देशपांडे, विवेक कुलकर्णी, तहसिलदार रविंद्र सबनिस, वनक्षेत्रपाल योगेश महाजन, नायब तहसिलदार विजय केंगले, शुभम डेव्हलपर्सचे विनय बडेरा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जगन्नाथ अंकुश, सावळेराम लेंभे, कमाजी पोटे, गणेश पोटे इत्यादी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, एकुण ६८ घरे बांधली जाणार असून सध्या ४४ घरांची कामे पुर्ण झाली आहेत व उर्वरीत कामे १० फेब्रुवारी पर्यंत पुर्ण होतील तसेच पायाभुत सोईसुविधांची कामे ८० टक्के पुर्ण झाली असून सर्व ठेकेदारांना १५ फेब्रुवारी पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. कामांचा आढावा घेण्यासाठी दि.१० रोजी परत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आत्ता पर्यंत झालेली सर्व कामे उत्तम दर्जाची झालेली असून हि कामे त्रयस्त यंत्रणे कडूनही तपासण्यात आली आहेत. यामध्ये कॉलेज आॅफ इंजिनीअरींग पुणे, इंपथी फौंडेशन यांनी कामे तपासून तसे प्रमाणपत्रही दिले आहे. घरांच्या रंगकामात व भिंती, समाजमंदिर, ग्रामपंचायत, शाळा, गोठा यांच्या भिंतीवर पर्यावरण पुरक कल्पनेवर चित्र काढली जाणार आहेत. या भिंतींवर माळीणचा इतिहास, घटने बद्दल माहिती, आदिवासी कला व संस्कृती दाखविणारी चित्र असतील.