शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या सोमवारी पीएमपी प्रवास मोफत

By admin | Updated: December 22, 2016 02:48 IST

शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम व्हावी, नागरिकांनी दुचाकींचा वापर न करता जास्तीत जास्त बसमधून प्रवास करावा

पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम व्हावी, नागरिकांनी दुचाकींचा वापर न करता जास्तीत जास्त बसमधून प्रवास करावा, यासाठी पुणेकरांना दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीमधून मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने १ कोटी ७० लाख रुपये पीएमपीला देण्याच्या प्रस्तावाला मुख्य सभेकडून मंजुरी देण्यात आली.पीएमपीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांना बस प्रवासाकडे आकर्षित करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुणेकरांना मोफत बस प्रवास उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रशासनाकडे दिला होता. त्यांनी महिन्यातून दोनदा बस प्रवाशांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध करून द्यावी, असे प्रस्तावात म्हटले होते. मात्र, प्रशासनाने महिन्यातून एकदा मोफत प्रवास करण्याचा प्रस्ताव मांडला. मुख्य सभेने त्याला एकमताने मंजुरी दिली. (प्रतिनिधी)निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय४बुधवारी झालेल्या मुख्य सभेत अनेक विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. महिन्यातून एकदा मोफत बस प्रवास करू देण्याचा प्रस्तावही या वेळी मंजूर करण्यात आला.४मात्र, ही योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली लोकप्रिय योजना न ठरता, तिचे योग्य नियोजन करून पुणेकरांना जास्तीत जास्त बस प्रवासाकडे वळविण्यासाठी त्याचा वापर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला असता, तो अभिप्रायासाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आला. यावर महापालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्रायही नोंदविला होता. स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली होती.आबा बागुल यांनी सांगितले, ‘‘रस्त्यावरील खासगी वाहने कमी करण्याच्या दृष्टीने महिन्यातून एकदा मोफत बसचा प्रयोग राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होईल. त्याचबरोबर, वाहनांमुळे होणारे प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल. प्रशासनाने या योजनेची सुविधा देताना त्याचे योग्य नियोजन करायला हवे. शहरात गेल्या काही वर्षांत खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे; त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.’’