शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

किल्ले नारायणगडावरील अवशेष घेताहेत अखेरचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:31 IST

आपल्या शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार आणि वैभवशाली काळातील आपले साथीदार म्हणून आपले गडकोट, किल्ले ओळखले जात आहेत.

- अशोक खरात खोडद : आपल्या शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार आणि वैभवशाली काळातील आपले साथीदार म्हणून आपले गडकोट, किल्ले ओळखले जात आहेत. खोडदजवळील किल्ले नारायणगडावर असलेल्या प्राचीन वास्तूंचे अवशेष अखेरचा श्वास घेत आहेत. शासनाकडून या किल्ले नारायणगडावर असणाऱ्या प्राचीन वास्तूंच्या अवशेषांचे जतन आणि संवर्धन व्हावे, अशी मागणी दुर्गप्रेमी आणि पर्यटकांकडून होत आहे, वेळीच जर या किल्ल्यांचे जतन केले नाही, तर या किल्ल्यांकडे भविष्यात केवळ एक डोंगर म्हणूनच पाहिले जाईल.नारायणगडावरील राजवाड्याच्या प्रवेशद्वाराचे दगडी खांब, शरभशिल्प, अंघोळीचे प्राचीन भांडे भग्न होत चालले आहेत. गणेशपट्टी आणि इतर अन्य प्राचीन दगडी वास्तू अखेरचा श्वास घेत आहेत. वेळीच या प्राचीन दगडी वस्तूंची डागडुजी केली नाही तर किल्ल्याची खरी ओळख असणाऱ्या या सर्व वास्तू काळाच्या ओघात लोप पावतील, अशी भीती निर्माण झाली आहे.किल्ले नारायणगडावर दुर्गप्रेमी-निसर्गमित्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून संवर्धनाचे कार्य सुरू आहे. या गडावर गेल्यानंतर समोरच डाव्या बाजूला गाडलेल्या अवस्थेत पाण्याचे एक टाके होते. या ग्रुपच्या माध्यमातून या टाक्यातील माती बाहेर काढून टाके मोकळे केले आहे. सध्या या टाक्यात वर्षभर पुरेलएवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. गडाचीवाडी, खोडद, हिवरे परिसरातील स्थानिक ग्रामस्थ व युवक या संवर्धन मोहिमेत सक्रिय आहेत.किल्ले नारायणगडाला आजवर अनेक अभ्यासकांनी भेटी दिल्या आहेत. पेशवेकालीन म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला पेशवेकालीन नसून पेशवेकाळाच्या आधीपासूनच हा किल्ला अस्तित्वात असल्याचे अनेक अभ्यासकांनी मत व्यक्त केले आहे. या किल्ल्यावरील असणाºया पाण्याच्या टाक्या हा किल्ला प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याच्या पुरावा आहे, असे अनेक अभ्यासकांनी सांगितले आहे.किल्ल्यावरील उत्तरेच्या बाजूला असलेला आणि अत्यंत महत्त्वाचा असलेला चोरदिंडी दरवाजादेखील अखेरच्या घटका मोजत आहे,हा चोरदिंडी दरवाजा कोणत्याहीक्षणी कोसळला जाऊ शकतो. किल्ल्यावरील अनेक बुरुजव तट ठिकठिकाणी कोसळलेगेले आहेत.>प्रवेशद्वार कोसळले; शरभशिल्पही तुटलेकिल्ल्यावरील राजवाड्याचे दगडी प्रवेशद्वार काही वर्षांपूर्वी सुस्थितीत होते. अलीकडच्या काळात हे प्रवेशद्वार खाली कोसळले आहे. या प्रवेशद्वाराचा दगडी खांब तुटला आहे. प्रवेशद्वाराचे एका बाजूकडचे शरभशिल्प तुटले आहे.प्राचीन काळातील अंघोळीचे दगडी भांडेदेखील तुटले आहे. प्रवेशद्वारावर असलेली गणेशपट्टीदेखील खाली कोसळली असून ती नामशेष होण्याची भीती आहे.