शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

जीवनवाहिन्या मोजतायेत अखेरचा श्वास

By admin | Updated: February 2, 2017 03:39 IST

नागरीकरण वाढत आहे. त्याचबरोबर सांडपाण्याचा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. प्रदूषणयुक्त औद्योगिक कारखान्यांमधील पाणी थेट नद्यांत सोडले जाते.

बारामती : नागरीकरण वाढत आहे. त्याचबरोबर सांडपाण्याचा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. प्रदूषणयुक्त औद्योगिक कारखान्यांमधील पाणी थेट नद्यांत सोडले जाते. गावातील सांडपाणीदेखील नदीपात्रात सोडले जात आहे. त्याचबरोबर नद्यांच्या सीमारेषा झपाट्याने कमी होत आहेत. मानवनिर्मित प्रदूषणरूपी राक्षसाने नद्यांचे अस्तित्व नष्ट होत आहे, हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. निसर्गाचा प्रकोप झाला तर मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे प्रदूषण आणि नद्यांवरील अतिक्रमण रोखण्याची गरज असल्याचे मत निसर्गतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी व्यक्त केले. जागतिक नदीप्रदूषण दिनाच्या निमित्ताने डॉ. गायकवाड म्हणाले, तीर्थक्षेत्राचे ठिकाण असलेल्या भीमाशंकर येथे भीमा नदीच्या उगमाचा विचार केल्यास नदीच्या उगमाशेजारीच प्लॅस्टिकचे ढीग दिसून येत आहे. भक्ती मार्गाने येणाऱ्या भाविकांकडूनदेखील नकळतपणे प्लॅस्टिकचा कचरा वाढतो. त्यासाठी जागृती केली जाते. परंतु, प्रतिबंध केला जात नसल्याने नियमांची पायमल्ली होते. नद्यांचे पावित्र जपले तर भूगर्भातील पाणी देखील चांगले मिळणार आहे. सध्या नद्यांच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्याचे दिसून येते. बहुतेक नद्यांमध्येच घरातील प्रदूषित कंपन्यांचे पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीचे अस्तित्व संपतेच. त्याचबरोबर मानवी जीवनही धोक्यात असल्याचे आढळून येत आहे. दूषित पाण्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीच्या पातळीवर नद्या, ओढे, नाल्यांमध्येच प्रदूषित पाणी सोडले जाते. या संस्था पाणी प्रक्रिया करून सोडले जात आहे, असे सांगतात. परंतु, नद्या प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेतली जात नाही, अशी खंत डॉ. गायकवाड यांनी व्यक्त केली. रासायनिक पाणी सोडल्यामुळे नद्यांच्या पात्रात गारवेलसारख्या वनस्पती वाढतात. इंदापूर तालुक्यातील भिगवणच्या उजनी जलाशय परिसरातील भीमा नदीची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यावर काहीच उपाययोजना होत नाही.नद्या संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करा़़़बेसुमार होणारा वाळूउपसा रोखणेदेखील महत्त्वाचे आहे. वाळूउपशामुळे पाणी स्वच्छ होण्याची प्रक्रिया थांबते. वाळूमध्ये अनेक जिवाणूंच्या प्रक्रिया होवून पाणी स्वच्छ होते. त्यामुळे देशातील नद्या संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बेसुमार वाळूउपशावर मर्यादा आणणेदेखील गरजेचे आहे. भीमा नदीसह अन्य नद्यांमध्ये प्रदूषित कचरा टाकण्याचे प्रमाण कमी नाही. अगदी बारामती शहरातून जाणाऱ्या कऱ्हा नदीतच सांडपाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रदूषण वाढते. प्रदूषणमुक्त नदी करण्याची गरज आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय स्तरावरदेखील हा विषय गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे. सध्या नदीकाठच्या लोकांना देखील स्वच्छ पाणी मिळत नाही. प्रदूषित पाण्यामुळे जनावरांच्या प्रजनन क्षमतेला धोका निर्माण झाला आहे. नायट्रोजनचे प्रमाण वाढते. मिथेन, हायड्रोजन सल्फाईड असे घातक रसायन तयार होत असल्याने नद्या जीवनदायनी नव्हे तर मानवनिर्मित मृत्युदायिनी म्हणून दिसत आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.