शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

तेरुंगणपाझर तलावातुन मोठ्या प्रमाणातपाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:11 IST

दि. ९ मार्च २०२१ तळेघर वार्ताहार: बारा ज्योर्तिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेञ भीमाशंकर व परिसरासाठी वरदान ठरलेल्या तेरुंगण ...

दि. ९ मार्च २०२१

तळेघर वार्ताहार: बारा ज्योर्तिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेञ भीमाशंकर व परिसरासाठी वरदान ठरलेल्या तेरुंगण येथे असलेला पाझर तलाव गत वर्षापेक्षा चालुवर्षी पुर्ण क्षमतेने भरला होता यामुळे सध्या तरी या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी या पाझर तलावातुन पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. या पाझर तलावामध्ये साचलेला गाळ काढुन या पाझर तलावाची गळती बंद करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील आदिवासी बांधवांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये वसलेल्या भीमाशंकर खोर्‍यामध्ये गेल्या आठ नऊ वर्षा पुर्वी पावसाळा सोडल्यास बैलगाडी व टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. या परिसरातील आदिवासी महिलांना पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागत होती. परंतु काही वर्षापुर्वी तेरुंगण येथे हा पाझर तलाव काढण्यात आल्याने श्री क्षेञ भीमाशंकर व या परिसरातील काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. या पाझर तलावातुन तेरुंगण, ढगेवाडी, पालखेवाडी, म्हातारबाचीवाडी, निगडाळे, भक्त निवास परिसर, भीमाशंकर या गावांना पाणी पुरवठा केला जातो.

श्री क्षेञ भीमाशंकर हे बारा ज्योर्तिर्लिंगापैकी एक ज्योर्तिर्लिंग असल्याने या ठिकाणी होणारी गर्दी पाहता त्याच प्रमाणे या परिसरातील पाण्याची गरज लक्षात घेता या पाझर तलावातुन या परिसरातील गावांना पाणी पुरत नसल्यामुळे त्याच प्रमाणे या तलावात गाळ साचल्यामुळे गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते भीमाशंकर व परिसरासाठी वर्षभर ५.५६ एम.एस.एफ.टी.पाणी लागणार असल्याची गरज लक्षात घेवुन या तलावाला ४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला २०११साली महसुल विभाग व छोटे पाटबंधारे विभागाकडुन येथील पाझर तलावाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी तलावातील गाळ काढण्यात आला. यामुळे या तलावाच्या साठवण क्षमतेत चार पटीने वाढ झाली.या तलावातुन दररोज सुमारे २ लाख ६० हजार लिटर पाणी पुरवठा होत होता. परंतु गेल्या सहा सात वर्षामध्ये या भागामध्ये मुसळभार पडणार्‍या पावसाच्या पाण्या बरोबरच मोठ्या प्रमाणात या पाझर तलावात माती वाहुन येवुन भव्य असा गाळाचा संचय झाला आहे ह्या मोठ्या प्रमाणात झालेल्या गाळ साचल्यामुळे पाण्याची पातळी कमी होऊन गळती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.या तलावातुन पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.

जस जसा उन्हाळा वाढत आहे तस तशी पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.या वर्षी जास्त पाऊस होऊनही लवकरच पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. .

या पुर्वी भीमाशंकर व भीमाशंकर परिसरातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत होती तेरुंगण येथील पाझर तलाव होताच ह्या परिसरातील आदिवासी शेतकर्‍यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला परंतु गेले कित्येक वर्ष या भागात पडणार्‍या मुसळधार पावसाबरोबरच माती वाहुन आल्याने ह्या पाझर तलावाची साठवण क्षमता कमी होऊन गळती वाढली आहे. ह्या पाझर तलावातुन गाळ काढून ह्या पाझर तलावाची खोली वाढविली असता भीमाशंकर व ह्या परिसरातील आदिवासी जनतेचा पिण्याच्या पाण्या बरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटेल"

जितेंद्र गायकवाड

सामाजिक कार्यकर्ते

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील श्री क्षेञ भीमाशंकर व परिसरासाठी वरदान ठरलेल्या तेरुंगण येथील पाझर तलावामध्ये गाळ साचल्यामुळे या पाझर तलावातुन मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे.