शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक शाळेत भाषा प्रयोगशाळा

By admin | Updated: September 5, 2014 23:59 IST

शिक्षण विभाग राबवित असलेल्या अनेक उपक्रमांमुळे राज्यात शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा वाढला आहे.

पुणो : शिक्षण विभाग राबवित असलेल्या अनेक उपक्रमांमुळे राज्यात शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा वाढला आहे. त्यामध्ये आणखी सुधारणा करून देशातच नव्हे तर जगात स्पर्धा करणारी पिढी आपल्याला घडवायची आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये आवश्यक पायाभुत सुविधा, तंत्रज्ञानाधारित शिक्षण यंत्रणा निर्माण करण्याबरोबरच भाषा प्रयोगशाळा उभी केली जाईल. जागितक दर्जाचे मुख्याध्यापक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचाही राज्य सरकारचा मानस आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
शिक्षक दिनानिमित्त राज्य सरकारतर्फे दिल्या जाणा:या राज्य शिक्षक पुरस्कार वितरण शुक्रवारी म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे झाले. यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, खासदार अॅड. वंदना चव्हाण, आमदार विनायक निम्हण, माजी आमदार मोहन जोशी,  शिक्षण सचिव अश्विनी भिडे, आयुक्त एस. चोक्कलिंगम, क्रीडा आयुक्त पंकज कुमार, प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक सज्रेराव जाधव, उपसंचालक सुमन शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात राज्यभरातील 37 प्राथमिक शिक्षक, 38 माध्यमिक शिक्षक, आदिवासी विभागात काम करणारे 18 प्राथमिक शिक्षक, 2 विशेष शिक्षक, 1 अपंग विद्याथ्र्याच्या शाळेतील शिक्षक, 2 स्काऊट गाईड तसेच 8 शिक्षिकांना थोर समाज सुधारक कै. सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिक पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. यावेळी सर्व 1क्6 पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कुटूंबीयही उपस्थित होते.
पुरस्कारामध्ये यावर्षी शिक्षकांना प्रथमच टॅबलेट, पीसी देण्यात आले. तसेच प्रत्येकी दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, प्रत्येक मुलाला सहजगत्या शिक्षण मिळण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पायाभुत सुविधा वाढविण्यावरही भर दिला जात आहे. देशात राज्याची अर्थव्यवस्था प्रथम स्थानी असताना याबाबतीतही आपण पहिल्या क्रमांकावर यायला हवे. 
समाजाकडून शिक्षकांच्या खुप अपेक्षा असल्याचे सांगुन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, संस्कारी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांना करायचे आहे. राज्य सरकार सर्वात जास्त निधी या विभागाला देत असले तरी तो आवश्यकच आहे. समाजाचे राहणीमान, मानसिकता, अपेक्षा बदलत चालली आहे. गुरू-शिष्य नात्यात अधिक मोकळेपणा आला आहे. कालानुरुप बदल व्हायलाच हवा. नवी पिढी अधिक कृतीशील व गतीशील व्हायला हवी.  फौजिया खान म्हणाल्या, राज्य व देशाला पुढे नेण्यासाठी शिक्षणच एक जादुची कांडी आहे. समाजनिर्मिती हा आपला धर्म मानुन शिक्षकांनी विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी पेलायला हवी. शाळा या व्यक्तीनिर्मितीचे कारखाने असून देशाला प्रामाणिक, चारित्र्यवान, सुसंस्कृत, कौशल्यवान व्यक्तींची गरज भागवितात.  जपानने शिक्षणातून मोठी प्रगती केली असून उन्नत, प्रगत राष्ट्र घडविण्यासाठी आपणही असेच प्रयत्न करायला हवेत. अश्विनी भिडे यांनी शिक्षणाचे सार्वत्रीकरण करून गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग कटिबध्द असल्याचे सांगितले. 
 
च्ज्ञानाचा विस्फोट झालेला असताना इंग्रजी भाषा व गणिताच्या शिक्षणावर अधिक भर देण्याची गरज आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रत इंग्रजी संवादाची भाषा झाली आहे. आपणही इंग्रजी भाषा स्वीकारून पुढे जायला हवे. त्यादृष्टीने शिक्षण विभाग चांगले काम करीत आहे. उद्योग क्षेत्रच्या मदतीने विभागाने अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत. 
च्समाजाच्या जडणघडणीत महत्वाची भुमिका असलेल्या शिक्षकांबाबत सरकार नेहमीच सकारात्मक राहिले आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रबिंदु मानुन प्रत्येकाला सोबत नेत ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीसाठी ज्ञानदान करायला हवे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
 
राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त पुण्यातील शिक्षक
1. बाळकृष्ण बाचल - मुख्याध्यापक, लोकनेते यशवंतराव चव्हाण, महानगरपालिका विद्यानिकेतन क्र. 6, नवी खडकी,येरवडा. 2. अनंता जाधव - सहायक शिक्षक, जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा, आतकरवाडी, ता. पुरंदर, जि.  पुणो 3. गोरखनाथ थोरात - सहायक शिक्षक, जयहिंद विद्यालय कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणो  4. दादासाहेब ओमासे - प्राचार्य, समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उरूळी देवाची, ता. हवेली, जि. पुणो 5. सुनिल पाटील - सहायक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ता. आंबेगाव, जि. पुणो 6. दिनेशकुमार पांडे - मुख्याध्यापक, एस. व्ही. युनियन हायस्कुल, सोमवार 
पेठ पुणो.