शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

माणसांनुसार बदलते पोलिसांची भाषा

By admin | Updated: July 28, 2014 04:56 IST

पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीचे निरसन पोलिसांनी केलेच पाहिजे. त्यांना योग्य वागणूक दिलीच पाहिजे.

पिंपरी : ‘पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीचे निरसन पोलिसांनी केलेच पाहिजे. त्यांना योग्य वागणूक दिलीच पाहिजे. अरेरावी करणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही. अशा पोलिसांवर कठोर कारवाई करा,’ अशा शब्दांत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. या आदेशामुळं काही फरक पडणार आहे का? मुळात पोलीस ठाण्यात येणाऱ्या कुणाला कशी वागणूक दिली जाते, याचा धांडोळा घेतला असता, पोलीस बहुरंगी भूमिका वठवताना दिसतात. प्रत्येक प्रवेशात त्यांचे डायलॉगही बदलतात. कसे ते पाहा...जोडगोळीचा ‘चोरीचा मामला’महाविद्यालयीन युवक-युवतींना आक्षेपार्ह वर्तन करताना पकडल्यास त्यांना बोलायलाही तोंड नसते. अशा वेळी मुलीला खुर्चीवर बसविले जाते, तर मुलाला मात्र खाली जमिनीवर बसविले जाते. थोडी दमदाटी केल्यास मुलगी घडाघडा बोलू लागते. मोबाइल नंबरही मुली खरे देतात. मुले मात्र चुकीचे मोबाइल नंबर पोलिसांना देतात. काही वेळा मित्रांचा नंबर वडिलांचा नंबर म्हणून देतात. कधीही न ऐकलेल्या शिव्या मुलांना पोलीस ठाण्यात ऐकाव्या लागतात. मुलींना मात्र सभ्यतेची वागणूक दिली जाते. आपले प्रकरण घरी कळेल, या दबावाखाली मुलगा-मुलगी दोघेही असतात. मात्र, दोघांच्याही कुटुंबीयांना बोलावले जाते. समज देऊन सोडून दिले जाते. मात्र, दरम्यानच्या काळात विशेषत: मुलाला खूपच त्रास होतो. त्याला अशा ठिकाणी बसविले जाते, जिथून तो जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येकाला दिसू शकतो. पुढे अनेक दिवस त्याला नजर चुकवत फिरावे लागते.