शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

परवाने शंभर, दुकाने हजारांवर

By admin | Updated: October 25, 2016 06:27 IST

उद्योगनगरीत आठवडाभरापासून ठिकठिकाणी भूछत्राप्रमाणे फटाक्यांचे बेकायदा स्टॉल लागले आहेत. अग्निशामक विभागातर्फे फक्त ९२ विक्रेत्यांनाच परवानगी दिली

पिंपरी : उद्योगनगरीत आठवडाभरापासून ठिकठिकाणी भूछत्राप्रमाणे फटाक्यांचे बेकायदा स्टॉल लागले आहेत. अग्निशामक विभागातर्फे फक्त ९२ विक्रेत्यांनाच परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले असताना प्रत्यक्षात हजारांच्या वर दुकाने थाटली असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून दिसून आले. विशेष म्हणजे या विक्रेत्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे दुर्घटना उद्भवल्यास त्याचा फटका जवळच्या लोकवस्तीला होऊ शकतो. अग्निशामक आणि पोलिसांचा परवाना मिळाल्यावरच फटाके विक्री करण्याचे दुकान थाटता येते. ना हरकत दाखला देताना अग्निशामक विभागातर्फे संबंधित व्यक्तीचे दुकान सुरक्षित ठिकाणी आहे का, याची तपासणी करूनच परवाने दिले जात आहेत. दुकान हे आरसीसी बांधकाम आणि शटर असलेले असावे, पक्के बांधकामचे दुकान नसेल तर मोकळ्या जागेत पत्र्यांच्या शेडमध्ये दुकान उभारावे, दुकानामध्ये आग विझविण्याचे उपकरण बसवावे, तसेच किराणा, इलेक्ट्रिक साहित्य, कपडे आणि स्फोटक रसायने असलेल्या दुकानांच्या शेजारी स्टॉल उभारू नये, अशा सूचनादेखील अग्निशामक विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षातील शहरातील ठिकाणी व गल्लीबोळातील फटाके विक्रत्यांनी नियमांचे पालन न करता विना परवाना स्टॉल उभारले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी झोपडपट्टीचा परिसरदेखील आहे. (प्रतिनिधी)चायनीय फ टाक्यांच्या मागणीत घट- गेल्या काही वर्षांपासून चिनी उत्पादकांनी भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण केले होते़ मात्र, सोशल मीडिया आणि तरुणांच्या आवाहनानंतर राज्यतील बहुतांश शहरांमध्ये चिनी वस्तूंवर नागरिकांनी बहिष्कार घातला असल्याचे चित्र दिसून येत आहे़ दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही बाजारपेठेत चिनी फ टाक्यांना मागणी नसल्याचे दुकानदारांनी सांगितले़ विविध आर्कषक रंगातील कमी आवाजाचे फ टाके, रोषणाई करणारे फुलबाजे, छोटे अ‍ॅटमबॉम्ब यावर वर्चस्व निर्माण करणारी चिनी बाजारपेठ यंदा मात्र भारतीय बनावटीच्या फ टाक्यापुढे तग धरत नसल्याचे आढळून येत आहे़ मागणी अत्यल्प असल्यामुळे आणि तरुणांच्या बहिष्कारामुळे अनेक दुकानदारांनी चिनी मालाची खरेदी केली नसल्याचे सांगितले़ अग्निशामक विभागातर्फे फटाके विक्रीचे दुकान थाटण्यासाठी आतापर्यंत ९२ नागरिकांना ना हरकतीचे दाखले दिले आहेत. ना हरकत दाखला मिळाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला फटाक्यांचे दुकान लावण्याचा अधिकार नाही आणि शहरात ९२च्या वर जादा दुकाने आहेत. त्या बेकायदा दुकानांवर कारवाईचा अधिकार पोलिसांना आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पिंपरी व चिखली या ठिकाणी अग्निशामक विभागाचे वाहने २४ तास हजर राहणार आहेत.- किरण गावडे, अग्निशामक अधिकारी, पिंपरी शहरातील कोणत्याही नागरिकांनी बेकायदा स्टॉल उभारू नये. परवाना घेऊनच स्टॉल उभारणे आवश्यक आहे. बेकायदा स्टॉलवर पोलिसांतर्फे कारवाई केली जाणार आहे. - राम मांडुरके, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग