शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

लालेलाल टोमॅटो एक रुपया किलो

By admin | Updated: January 4, 2017 05:16 IST

३० किलो टोमॅटोचे कॅरेट अवघ्या २५ ते ३० रुपयांना टोमॅटो ज्यूससाठी उत्तर प्रदेशमधील टोमॅटो खरेदी करणाऱ्या भय्यांना पुरंदर तालुक्यातील शेतकरी विकत आहेत.

गराडे : ३० किलो टोमॅटोचे कॅरेट अवघ्या २५ ते ३० रुपयांना टोमॅटो ज्यूससाठी उत्तर प्रदेशमधील टोमॅटो खरेदी करणाऱ्या भय्यांना पुरंदर तालुक्यातील शेतकरी विकत आहेत. म्हणजे १ किलो टोमॅटो अवघ्या १ रुपया किमतीने विकला जातोय. मार्केटला टोमॅटो पाठवायचा म्हटले तर २५ रुपये भाडे द्यावे लागते. तोडणी, उत्पादन खर्चही निघत नाही. यंदा टोमॅटो पिकांच्या घसरलेल्या बाजारभावामुळे पुरंदर तालुक्यातील टोमॅटो शेतीव्यावसायिक आर्थिक संकटात सापडला आहे. लालेलाल झालेले टोमॅटोचे फड शेतकऱ्यांनी तोड्याविना तसेच सोडून दिले आहेत. काही शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या फडात गुरे सोडून दिली आहेत.पुरंदर तालुक्यात टोमॅटोची पिके चांगली आली आहेत. टोमॅटो पिकाची शेतकऱ्यांनी केलेली काळजीपूर्वक देखभाल, स्वच्छ हवामान यामुळे टोमॅटो पिकाचे प्रचंड उत्पादन झाले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे ढासळलेले शेतमालाचे बाजारभाव अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. नोटाबंदीचा थेट फटका टोमॅटो उत्पादकांनाही बसला आहे. आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पुरंदर तालुक्याला खेटून लगतच पुणे शहराची मोठी बाजारपेठ असलेने टोमॅटोची चांगली विक्री होऊन नफा मिळतो. टोमॅटोच्या पिकामुळे शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळतो. जास्त पावसामुळे टोमॅटो खराब होतात. परंतु यंदा पुरंदर तालुक्यात खूपच कमी पाऊस पडला. त्यामुळे टोमॅटोचे फड चांगले येऊन टोमॅटो खराब झाले नाहीत. विक्रमी उत्पादन होऊन जास्त आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव घसरले तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळे टोमॅटो पिकाचे बाजारभाव कोसळलेले आहेत. याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला आहे.टोमॅटो उत्पादक शेतकरी भाऊसाहेब शेंडकर व मनोज शेंडकर म्हणाले, दरवर्षी टोमॅटोचे चांगले पैसे मिळतात. त्यामुळे प्रपंचाला हातभार लागतो. परंतु यंदा मात्र टोमॅटोची पिके खूप चांगली येऊनदेखील बाजारभाव कोसळल्यामुळे उत्पादन खर्चही निघला नाही. सगळा तोटाच झाला आहे. आम्ही ३० किलो टोमॅटोचे कॅरेट २५ ते ३० रुपयाला भय्यांना विकत आहाते. २० गुंठ्यात टोमॅटोचा फड चांगल्यारीतीने आणण्यासाठी ४५ हजार रुपये खर्च झाला. आतापर्यंत टोमॅटो ५५०० रुपये हातात पडले आहेत. आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांची हीच तऱ्हा आहे. खूपच वंगाळ दिवस शेतकऱ्यांवर आले आहेत. (वार्ताहर)