शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी अभयारण्यावर कुऱ्हाड

By admin | Updated: January 21, 2015 00:39 IST

येरवडा परिसरातील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याची जबाबदारी वनविभाग आणि महापालिका दोघांकडूनही झटकली जात असल्याने येथील वृक्षतोडीवर कोणाचा अंकुशच राहिला नाही.

पुणे : येरवडा परिसरातील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याची जबाबदारी वनविभाग आणि महापालिका दोघांकडूनही झटकली जात असल्याने येथील वृक्षतोडीवर कोणाचा अंकुशच राहिला नाही. त्यामुळे पक्ष्यांचा निवारा हरविला असून, हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. डॉ. सलीम अली अभयारण्यातील झाडे अमानुषपणे तोडल्याने तिथे येणाऱ्या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. येथे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, दर पाच-सहा महिन्यांनी वृक्षतोड होते. क्लिन रिवर सोसायटीचे अध्यक्ष समीर निकम यांनी सांगितले की, उद्यान विभागाकडे तक्रार दिल्यावर अधिकारी फक्त पंचनामा करतात. पोलिसांत तक्रार नोंदवणे आवश्यक असतानाही कारवाई होत नाही. पूर्वी येथे ५० ते ६० पक्ष्यांचे थवे यायचे, पण नदीतील दूषित पाणी, वृक्षतोड अशा अनेक कारणांमुळे आता पक्षी पाहायला मिळत नाहीत, असे त्यांनी सांगितले.पक्षितज्ज्ञ डॉ. संजीव नलावडे म्हणाले, ‘‘अभयारण्याला वाचवायचे असेल तर महानगरपालिका व वनखात्याने एकत्र येऊन योग्य नियोजन करायले हवे. केवळ पैशांमुळे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या कामासाठी निधीची गरज आहे. पक्षिप्रेमी, पक्षितज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मार्ग काढला तर नक्कीच सुधारणा होऊ शकतील.’’ वनखात्याच्या ताब्यात हे अभयारण्य असताना पक्षितज्ज्ञांना आणि ज्येष्ठांना बसण्यासाठी बाक होते. कोणत्या प्रकारचे पक्षी इथे येतात त्यांची माहिती व चित्रे फलकावर लावलेली असायची. तसेच २४ तास वनखात्याचा कर्मचारी असल्याने वृक्षतोड व्हायची नाही. (प्रतिनिधी)महानगरपालिकेने पक्षिनिरीक्षकांचा सल्ला घेऊन काम करावे. जंगलांमधील अनेक पक्षी या अभयारण्यात यायचे, पण आता त्यांचं प्रमाण कमी झालंय. हे अभयारण्य पूर्वी कसे होते आणि त्याचे आता काय झालंय, याबद्दलचा अहवाल व २५० पक्षिमित्र, पक्षितज्ज्ञ यांच्या सह्यांचे निवेदन आयुक्तांकडे देणार आहोत. -अनुज खरे (मानद वन्यजीवरक्षक)विविध पक्ष्यांना पाहता यावे, स्थलांतरित पक्ष्यांची ओळख व्हावी या उद्देशाने आम्ही डॉ. सलीम अली अभयारण्यात जायचो. परंतु अनेक कारणांनी तेथील पक्ष्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. हे अभयारण्य काही प्रमाणात दुलर्क्षित झाल्याने येथे बाहेरून लोक दारूपिण्यास येतात. त्यामुळे असुरक्षितता वाढली आहे. जागा संरक्षित करण्याची गरज आहे.- हेमंत धाडनेकर (पक्षिप्रेमी)