शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

पक्षी अभयारण्यावर कुऱ्हाड

By admin | Updated: January 21, 2015 00:39 IST

येरवडा परिसरातील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याची जबाबदारी वनविभाग आणि महापालिका दोघांकडूनही झटकली जात असल्याने येथील वृक्षतोडीवर कोणाचा अंकुशच राहिला नाही.

पुणे : येरवडा परिसरातील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याची जबाबदारी वनविभाग आणि महापालिका दोघांकडूनही झटकली जात असल्याने येथील वृक्षतोडीवर कोणाचा अंकुशच राहिला नाही. त्यामुळे पक्ष्यांचा निवारा हरविला असून, हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. डॉ. सलीम अली अभयारण्यातील झाडे अमानुषपणे तोडल्याने तिथे येणाऱ्या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. येथे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, दर पाच-सहा महिन्यांनी वृक्षतोड होते. क्लिन रिवर सोसायटीचे अध्यक्ष समीर निकम यांनी सांगितले की, उद्यान विभागाकडे तक्रार दिल्यावर अधिकारी फक्त पंचनामा करतात. पोलिसांत तक्रार नोंदवणे आवश्यक असतानाही कारवाई होत नाही. पूर्वी येथे ५० ते ६० पक्ष्यांचे थवे यायचे, पण नदीतील दूषित पाणी, वृक्षतोड अशा अनेक कारणांमुळे आता पक्षी पाहायला मिळत नाहीत, असे त्यांनी सांगितले.पक्षितज्ज्ञ डॉ. संजीव नलावडे म्हणाले, ‘‘अभयारण्याला वाचवायचे असेल तर महानगरपालिका व वनखात्याने एकत्र येऊन योग्य नियोजन करायले हवे. केवळ पैशांमुळे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या कामासाठी निधीची गरज आहे. पक्षिप्रेमी, पक्षितज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मार्ग काढला तर नक्कीच सुधारणा होऊ शकतील.’’ वनखात्याच्या ताब्यात हे अभयारण्य असताना पक्षितज्ज्ञांना आणि ज्येष्ठांना बसण्यासाठी बाक होते. कोणत्या प्रकारचे पक्षी इथे येतात त्यांची माहिती व चित्रे फलकावर लावलेली असायची. तसेच २४ तास वनखात्याचा कर्मचारी असल्याने वृक्षतोड व्हायची नाही. (प्रतिनिधी)महानगरपालिकेने पक्षिनिरीक्षकांचा सल्ला घेऊन काम करावे. जंगलांमधील अनेक पक्षी या अभयारण्यात यायचे, पण आता त्यांचं प्रमाण कमी झालंय. हे अभयारण्य पूर्वी कसे होते आणि त्याचे आता काय झालंय, याबद्दलचा अहवाल व २५० पक्षिमित्र, पक्षितज्ज्ञ यांच्या सह्यांचे निवेदन आयुक्तांकडे देणार आहोत. -अनुज खरे (मानद वन्यजीवरक्षक)विविध पक्ष्यांना पाहता यावे, स्थलांतरित पक्ष्यांची ओळख व्हावी या उद्देशाने आम्ही डॉ. सलीम अली अभयारण्यात जायचो. परंतु अनेक कारणांनी तेथील पक्ष्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. हे अभयारण्य काही प्रमाणात दुलर्क्षित झाल्याने येथे बाहेरून लोक दारूपिण्यास येतात. त्यामुळे असुरक्षितता वाढली आहे. जागा संरक्षित करण्याची गरज आहे.- हेमंत धाडनेकर (पक्षिप्रेमी)