शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

कुल-थोरात यांच्यात कलगीतुरा

By admin | Updated: May 29, 2017 02:09 IST

भीमा सहकारी साखर कारखान्याचा कर्जाचा डोंगर रमेश थोरात यांनी केला असल्याचा आरोप सातत्याने आमदार राहुल कुल करीत

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : भीमा सहकारी साखर कारखान्याचा कर्जाचा डोंगर रमेश थोरात यांनी केला असल्याचा आरोप सातत्याने आमदार राहुल कुल करीत असतात. परंतु, हा आरोप माझ्यावर नसून त्यांचे वडील तत्कालीन भीमा पाटसचे अध्यक्ष सुभाष कुल यांच्यावर करीत असल्याचे रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मी कारखान्याचा उपाध्यक्ष होतो. काही अधिकार मला जरी मिळाले होते तरी कारखान्याचे अध्यक्ष सुभाष कुल होते. त्यावेळी ते तालुक्याचे आमदारदेखील होते. तेव्हा कारखान्यात जे काही निर्णय व्हायचे ते दोघांच्या संगनमताने व्हायचे. मी कारखान्यावर कर्ज करीत असताना सुभाष कुल हे गप्प बसले असते का? तेव्हा त्या वेळी कारखान्याची जी काही जबाबदारी होती. ती आमच्या दोघांवर होती आणि ती जबाबदारी आम्ही दोघांनीही समर्थपणे पार पाडलेली आहे. इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत भीमा पाटसने सभासदांना भाव दिलेला आहे. कामगारांचे पगार आणि बोनस कधीही थकलेले नव्हते. आमच्या कारकिर्दीत कारखान्यावर ३८ कोटी रुपयांचे कर्ज होते. परंतु त्या तुलनेत कारखान्याकडे ७५ कोटींची साखर शिल्लक होती. कुल यांच्याकडे काही वर्षांपासून कारखान्याची सत्ता आहे. तेव्हा कारखान्यावर ४०० कोटींचे कर्ज असून जी काही साखर शिल्लक आहे. तिलादेखील लालसर रंग आला आहे. कामगारांचे पगार व इतर देणी थकली आहेत. सभासदांच्या पेमेंटचाही प्रश्न प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत आर्थिक अडचणीतून मार्ग काढत आहे, असे अनेक वर्षांपासून राहुल कुल सांगत आहेत. मात्र आर्थिक अडचणीतून बाहेर निघाला नाही. कारखान्याचे हे विस्तारीकरण बोगस पद्धतीने केल्यामुळे अडचणीत आला. मात्र गेल्या हंगामात कारखाना बंद राहिला. हा कारखाना सुरू व्हावा, कामगार व सभासदांचीही तसेच माझीदेखील प्रामाणिक इच्छा आहे. मात्र सुरू झाल्यानंतर पुन्हा कर्जाचा डोंगर राहता कामा नये. दौंड शुगर सुरू होऊन ९ वर्षे झाली. रिकव्हरी २ वर्षांत कमी झालेली आहे. परिणामी खासगी कारखान्यामुळे भीमा पाटसला फटका बसला, असे चुकीचे समर्थन राहुल कुल करीत असल्याचे रमेश थोरात म्हणाले.शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवलेदौंड शुगर कारखाना उभारण्यासाठी मी एजंटगिरी केली, असे राहुल कुल म्हणतात. परंतु हा कारखाना उभारणीसाठी शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवले. त्यानुसार त्याचे फलित आज पूर्व भागातील शेतकऱ्यांना मिळत आहे. दौंड शुगर नसता तर पूर्व भागातील शेतकऱ्यांचे हाल झाले असते. त्यामुळे हा कारखाना या भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला आहे. माझे वडील अध्यक्ष होते, मात्र अधिकार कुणाला होते : राहुल कुलदौंड : भीमा पाटस कारखान्याचे माझे वडील सुभाष कुल हे अध्यक्ष होते. परंतु कारखान्याचे अधिकार कोणाला होते, हे तालुक्यातील जनतेला माहित आहे. मी कारखान्याची सत्ता हाती घेतली त्या वेळेस १०० कोटींच्या पुढे कर्ज होते. हे कर्ज फेडता फेडता कारखाना अडचणीत आला. माझी सत्ता नसताना कारखान्यातील पूर्वीचे कर्ज मी प्रामाणिकपणे फेडत आलेलो आहे. सध्याच्या परिस्थितीत काही तांत्रिक अडचणीमुळे कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे. तरीदेखील पुढील हंगामात भीमा पाटस कारखाना सुरू होईल, असा विश्वास करखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांनी पत्रकार परिषेदत केले. एका ट्रॅक्टरवर चार बँकांची कर्जे घेतली, असाही आरोप माझ्यावर होतो. तेव्हा काही ट्रॅक्टरवर चार बँकांचे कर्ज घेतले असतील ते कारखान्याच्या हितासाठी घेतले आणि या कर्जाला गॅरंटी असते. कारखान्याची रिकव्हरी टिकविणे ही कोणा एकट्याची जबाबदारी नसते, तर ती जबाबदारी सर्वांची असते. जर सर्वांचे सहकार्य मिळाले असते तर रिकव्हरीदेखील चांगली झाली असती. रमेश थोरात यांनी भीमा पाटस कारखान्यात त्यांचा स्वत:चा ऊस काही प्रमाणात घातलेला आहे. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी ऊस जर घातला असता तर कारखान्याला मदत झाली असती. मी आमदार होऊन अडीच वर्षे झाली. परंतु या अडीच वर्षांत बरीच विकासकामे केली. जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे झाली. जे रमेश थोरात यांनी त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत पाच वर्षांत कामे केली असतील त्या तुलनेत दुप्पट कामे मी अडीच वर्षांत केलेली आहेत. तेव्हा त्यांनी पाच वर्षांत काय कामे केली, ती कामे प्रसिद्ध करावीत आणि मी अडीच वर्षांत काय केले हेदेखील मी प्र्रसिद्ध करायला तयार आहे, असे राहुल कुल म्हणाले.सर्वांनी हातभार लावावाभीमा पाटस कारखाना सध्याच्या परिस्थितीत अडचणीत आहे, अशा परिस्थितीत कारखान्याच्या संदर्भात कुणीही राजकारण न करता हा कारखाना सुरू होण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा,जेणेकरून ऊसउत्पादक सभासद आणि कामगार यांचे हित जोपासले जाईल आणि कारखाना सुरळीत सुरू राहील, असे राहुल कुल म्हणाले.